इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

 डॉ.बाबासाहेबांनी  आम्हाला अहंकारी  होऊण्या पेक्षा  आत्मविश्वासी होण्याचे तंत्र  दिले - प्रा. माधव रोडे

 बाबासाहेबांनी आम्हा धैर्यने संघर्ष करण्याची शिकवण दिली - प्रा. माधव रोडे

सोनपेठ : - दिं. १४ एप्रिल २०२५ रोजी  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ जयंती महोत्सवात , मौजे. गवळी पिंपरी येथे मोठा उत्साह साजरा करण्यात आला. यावेळी प्रा. डॉ. माधव रोडे यांच्या व्याख्यानाच्या कार्यकमाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच दत्तात्रय पांचाळ होते. तर प्रमुख विशेष उपस्थिती सोनपेठचे पोलिस निरिक्षक एस एन बोलमवाड , गटविकास अधिकारी अजिंक्य सुर्यवंशी , प्रभाकर सिरसाट , माजी सरपंच गोपाळ भोसले , शिवाजी भोसले , नासेरभाई पठाण आदि होते. यावेळी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने ध्वजारोहण प्रमुख पाहुण्याच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. माधव रोडे म्हणाले , हजारो वर्षापासुन भेदा भेद करून मानसांना माणुस म्हणुन त्यांना अस्थितीत्वहिन करून हक्क डावलणाऱ्या अशा लोकांसाठी बाबासाहेबांनी संघर्ष केला. शौर्य म्हणजे धैर्य सामर्थ्यची  क्षमता 

शिकवण आम्हा दिली. बाबासाहेबांनी वंचित गोर गरीब दिन दलितांच्या जीवनातील आत्मविश्वास भरला , त्यासाठी बाबासाहेबांनी आयुष्यभर भेदभाव, सामाजिक अन्यायाविरुद्ध संघर्ष केला. त्यातून त्यांनी आम्हाला संयमाने , धौर्याने संघर्ष करण्यासाठी प्रेरणा देऊन शिका , संघटित व्हा , संघर्ष करा ! मंत्र दिला. अहंकाराने नव्हते तर आत्मविश्वास - आत्मसन्मानाने जगण्याचा तंत्र सूत्री दिले. अहंकारी लोकांना वाटते मला सगळ काही ज्ञान आहे आता घेरण्यासाठी शिकण्यासाठी काही बाकीच राहिलेले नाही. तर आत्मविश्वासी लोक नेहमी शिकण्यास तयार असतात. बाहय साहस असलेली व्यक्ती , मरण्याची हिंमत ठेवते तर आंतरिक साहस असणाऱ्याकडे , जगण्याची हिंमत असते म्हणून बाबासाहेबांनी तथागताचा बौद्ध धम्म मार्ग आम्हाला दाखवला व स्वयंम प्रकाश व्हाला सांगितले.  या कार्यक्रमाचे  संतोष साळवे , सुनिल बोकरे , शाम बोकरे , सोमनाथ बोकरे , संतोष बोकरे सह भिमसागर मित्र मंडळ , गवळी पिंपरी यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या