इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

सौगंद मोहम्मद की खाते है, मंदिर यही बनायेंगे; जीर्णोद्धार वादावर हभप बंडा तात्या कडाडले, मुख्यमंत्र्यांना भेटणार

अहिल्यानंगर : गेल्या काही दिवसांपासून श्रीगोंद्यात (srigonda) संत श्री शेख महंमद महाराज मंदिराच्या ठिकाणी दर्गाह ट्रस्ट स्थापन केल्याने वेगळाच वाद सुरू झाला आहे. त्या दर्गाह ट्रस्टला विरोध करत ग्रामस्थांनी आज आंदोलन सुरू केलं असून हभप बंडा तात्या कराडकर महाराजांनी आंदोलनस्थळी जाऊन येथेील मंदिराचा लवकरात लवकर जीर्णोद्धार करावा, त्यासाठी मी मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे म्हटले. ह.भ.प बंडा तात्या कराडकर (karadkar) यांनी श्रीगोंद्यातील संत श्री शेख महंमद महाराज मंदिरातील वादावर आपला परखड मत मांडलं आहे. "सौगंद मोहम्मद की खाते है, मंदिर यही बनायेंगे" अशी घोषणा देत भाषाणाची बंडा तात्या महाराजांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. सध्या श्रीगोंद्यात संत श्री शेख महाराजांचा समाधी उत्सव साजरा केला जातो, त्याठिकाणी  कोणीही आपल्या समाजात विष कालवू नये. बासुंदी करण्यासाठी अनेक वस्तू लागतात. मात्र, ती बासुंदी खराब करण्यासाठी अमीन शेख सारखा एखादा खडा असतो, असे म्हणत कराडकर महाराजांनी शेख महाराजांचे वंशज असलेल्या अमीन शेख यांच्यावर निशाणा साधला. तसेच, अमीन शेखसारखा खडा बाजूला करणे गरजेचा आहे, असेही कराडकर महाराजांनी म्हटले. 

मी मुख्यमंत्र्यांना भेटून विनंती करणार

श्री संत महंमद महाराज हे हिंदू मुस्लिम समाजाचे ऐक्याचे प्रतीक असून ते कुठल्याही एका समाजाचे नाहीत. संत महंमद महाराज यांची जुनी परंपरा आहे, या ऐक्यात एक समाजकंटक मिठाचा खडा टाकत आहे, हे वारकरी समाज कधीही सहन करणार नाही. शासनाने कुठलाही विलंब न करता चुकीचा ट्रस्ट रद्द करावा अशी मागणी बंडा तात्या कराडकर यांनी शासनाकडे केली आहे. श्रीगोंदा येथे धरणे आंदोलनावेळी ते बोलत होते. श्री संत महंमद महाराज हे आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे. संत शेख महंमद महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे आहेत. त्यामुळे, याबाबत मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे. आम्हाला बेमुदत धरणे आंदोलन करण्याची वेळ आणू नका, अशी विनंती मुख्यमंत्र्यांकडे करेल. तसेच, लवकरात लवकर मंदिर जीर्णोद्धार करावा अशीही विनंती बंडा तात्यांनी ग्रामस्थांना केली.

नेमका वाद काय?

श्री संत तुकाराम महाराजांचे समकालीन संत म्हणून संत शेख महंमद महाराजांची ओळख आहे. मुस्लिम कुटुंबातील जन्म असतानाही संत शेख महंमद महाराज यांनी भागवत धर्म स्वीकारून भागवत धर्माचा प्रचार-प्रसार केला. श्रीगोंदा (ahilyanagar) शहरात त्यांची संजीवन समाधी आहे. मात्र, या संजीवन समाधीच्या ठिकाणी मंदिर उभे राहावे, असे ग्रामस्थ आणि यात्रा कमिटीला वाटते तर शेख महंमद महाराजांचे वंशज म्हणवणारे अमीन शेख यांनी मात्र मंदिर परिसरात "सुफी संत शेख महंमद बाबा दर्गाह" नावाने ट्रस्ट सुरू केल्याचे पाहायला मिळत आहे. त्यावरुन, हे वाद निर्माण झाला आहे. 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!