इमेज
बीड जिल्हयातुन 1599 प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतमध्ये निकाली बीड- आज दिनांक 9 मे 2026 रोजी बीड मुख्यालयात राष्ट्रीय लोकन्यायालयाचेउद्घाटन आनंद एल.यावलकर, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या हस्ते संपन्न झाले.   सदर उदघाटन कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश-1 व्ही.एच. पाटवदकर, जिल्हा न्यायाधीश-2 एस.आर.शिंदे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-2 आर.एम नेरलीकर मुख्य न्यायदंडाधिकारी पी.आर.शिंदे व इतर न्यायिक अधिकारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डाॅ.वहाब ए.सय्यद, बीड मुख्यालयातील सर्व न्यायिक अधिकारी, बीड जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष एस.जी.पिसुरे, उपाध्यक्ष आर.व्ही.देशमुख, सचिव सुभाष काळे तसेच त्यांचे सर्व पदाधिकारी, विधिज्ञ सदर उदघाटन कार्यक्रमास उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशावरूनआनंद एल. यावलकर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. 9 मे 2026 रोजी पार पडलेल्या लोक न्यायालयात बीड जिल्हयातुन एकूण. 1209 प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली आहेत. बीड...

सौगंद मोहम्मद की खाते है, मंदिर यही बनायेंगे; जीर्णोद्धार वादावर हभप बंडा तात्या कडाडले, मुख्यमंत्र्यांना भेटणार

अहिल्यानंगर : गेल्या काही दिवसांपासून श्रीगोंद्यात (srigonda) संत श्री शेख महंमद महाराज मंदिराच्या ठिकाणी दर्गाह ट्रस्ट स्थापन केल्याने वेगळाच वाद सुरू झाला आहे. त्या दर्गाह ट्रस्टला विरोध करत ग्रामस्थांनी आज आंदोलन सुरू केलं असून हभप बंडा तात्या कराडकर महाराजांनी आंदोलनस्थळी जाऊन येथेील मंदिराचा लवकरात लवकर जीर्णोद्धार करावा, त्यासाठी मी मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे म्हटले. ह.भ.प बंडा तात्या कराडकर (karadkar) यांनी श्रीगोंद्यातील संत श्री शेख महंमद महाराज मंदिरातील वादावर आपला परखड मत मांडलं आहे. "सौगंद मोहम्मद की खाते है, मंदिर यही बनायेंगे" अशी घोषणा देत भाषाणाची बंडा तात्या महाराजांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. सध्या श्रीगोंद्यात संत श्री शेख महाराजांचा समाधी उत्सव साजरा केला जातो, त्याठिकाणी  कोणीही आपल्या समाजात विष कालवू नये. बासुंदी करण्यासाठी अनेक वस्तू लागतात. मात्र, ती बासुंदी खराब करण्यासाठी अमीन शेख सारखा एखादा खडा असतो, असे म्हणत कराडकर महाराजांनी शेख महाराजांचे वंशज असलेल्या अमीन शेख यांच्यावर निशाणा साधला. तसेच, अमीन शेखसारखा खडा बाजूला करणे गरजेचा आहे, असेही कराडकर महाराजांनी म्हटले. 

मी मुख्यमंत्र्यांना भेटून विनंती करणार

श्री संत महंमद महाराज हे हिंदू मुस्लिम समाजाचे ऐक्याचे प्रतीक असून ते कुठल्याही एका समाजाचे नाहीत. संत महंमद महाराज यांची जुनी परंपरा आहे, या ऐक्यात एक समाजकंटक मिठाचा खडा टाकत आहे, हे वारकरी समाज कधीही सहन करणार नाही. शासनाने कुठलाही विलंब न करता चुकीचा ट्रस्ट रद्द करावा अशी मागणी बंडा तात्या कराडकर यांनी शासनाकडे केली आहे. श्रीगोंदा येथे धरणे आंदोलनावेळी ते बोलत होते. श्री संत महंमद महाराज हे आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे. संत शेख महंमद महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे आहेत. त्यामुळे, याबाबत मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे. आम्हाला बेमुदत धरणे आंदोलन करण्याची वेळ आणू नका, अशी विनंती मुख्यमंत्र्यांकडे करेल. तसेच, लवकरात लवकर मंदिर जीर्णोद्धार करावा अशीही विनंती बंडा तात्यांनी ग्रामस्थांना केली.

नेमका वाद काय?

श्री संत तुकाराम महाराजांचे समकालीन संत म्हणून संत शेख महंमद महाराजांची ओळख आहे. मुस्लिम कुटुंबातील जन्म असतानाही संत शेख महंमद महाराज यांनी भागवत धर्म स्वीकारून भागवत धर्माचा प्रचार-प्रसार केला. श्रीगोंदा (ahilyanagar) शहरात त्यांची संजीवन समाधी आहे. मात्र, या संजीवन समाधीच्या ठिकाणी मंदिर उभे राहावे, असे ग्रामस्थ आणि यात्रा कमिटीला वाटते तर शेख महंमद महाराजांचे वंशज म्हणवणारे अमीन शेख यांनी मात्र मंदिर परिसरात "सुफी संत शेख महंमद बाबा दर्गाह" नावाने ट्रस्ट सुरू केल्याचे पाहायला मिळत आहे. त्यावरुन, हे वाद निर्माण झाला आहे. 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....