इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

 ◆ जनहिताच्या मागण्या पूर्ण करा- किसान सभा

मागण्या पूर्ण न झाल्यास सिरसाळ्यात निदर्शने

परळी / प्रतिनिधी

पीक विमा, कर्ज माफी व गायरान जमिनीवर राहती घरे नावावर करणे यासह इतर मागण्याकरिता बीड जिल्हा किसान सभेकडून सोमवार दि 2 जून रोजी तालुक्यातील सिरसाळा या ठिकाणी निदर्शने करण्यात येणार आहेत. या निदर्शनाबाबत किसान सभेने परळी येथील उपजिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.


परळी येथील उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात पिकविम्यापासून सर्व वंचित शेतकऱ्यांना ताबडतोब पिक विमा वितरित करण्यात यावा,सर्व शेतकऱ्यांचे सरसकट संपूर्ण पीककर्ज माफ करावे, गायरान जमिनीतील राहती घरे नावावर करणे व कसणाऱ्या जमिनी धारकांच्या नावे करण्या बाबत व गायरान जमिनीतील सोलारसाठी राहती घरे उठवून लोकांना भूमिहीन व बेघर करण्याचा घाट घातला जात आहे तो त्वरित बंद करावा व उलटपक्षी लोकांची घरे व जमिनी त्यांच्या नावावर कराव्यात या मागण्या घेत अखिल भारतीय किसान सभेकडून तालुक्यातील सिरसाळा येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी जाहीर निदर्शने करण्यात येणार आहेत.वरील मागण्या लवकरात लवकर पूर्ण करून जनतेला दिलासा द्यावा अन्यथा निदर्शने दरम्यान उदभवलेल्या कायदा व सुव्यवस्था प्रश्नावर प्रशासन जवाबदार राहील असे किसान सभा बीड कडून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात सांगितले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या