परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

 ◆ जनहिताच्या मागण्या पूर्ण करा- किसान सभा

मागण्या पूर्ण न झाल्यास सिरसाळ्यात निदर्शने

परळी / प्रतिनिधी

पीक विमा, कर्ज माफी व गायरान जमिनीवर राहती घरे नावावर करणे यासह इतर मागण्याकरिता बीड जिल्हा किसान सभेकडून सोमवार दि 2 जून रोजी तालुक्यातील सिरसाळा या ठिकाणी निदर्शने करण्यात येणार आहेत. या निदर्शनाबाबत किसान सभेने परळी येथील उपजिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.


परळी येथील उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात पिकविम्यापासून सर्व वंचित शेतकऱ्यांना ताबडतोब पिक विमा वितरित करण्यात यावा,सर्व शेतकऱ्यांचे सरसकट संपूर्ण पीककर्ज माफ करावे, गायरान जमिनीतील राहती घरे नावावर करणे व कसणाऱ्या जमिनी धारकांच्या नावे करण्या बाबत व गायरान जमिनीतील सोलारसाठी राहती घरे उठवून लोकांना भूमिहीन व बेघर करण्याचा घाट घातला जात आहे तो त्वरित बंद करावा व उलटपक्षी लोकांची घरे व जमिनी त्यांच्या नावावर कराव्यात या मागण्या घेत अखिल भारतीय किसान सभेकडून तालुक्यातील सिरसाळा येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी जाहीर निदर्शने करण्यात येणार आहेत.वरील मागण्या लवकरात लवकर पूर्ण करून जनतेला दिलासा द्यावा अन्यथा निदर्शने दरम्यान उदभवलेल्या कायदा व सुव्यवस्था प्रश्नावर प्रशासन जवाबदार राहील असे किसान सभा बीड कडून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात सांगितले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!