परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

 परळीत ‘ऑपरेशन सिंदूर’च्या सन्मानार्थ आज भव्य तिरंगा रॅली, युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे- अनिष अग्रवाल 

परळीवैजनाथ,प्रतिनिधी...

भारतीय सैन्य दलाने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत दाखवलेल्या अतुलनीय शौर्य आणि पराक्रमाला सलाम करण्यासाठी परळी शहरात गुरुवार, 15 मे रोजी भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. या रॅलीत सर्व युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन सैन्याच्या शौर्याला मानवंदना द्यावी, असे आवाहन भाजपा सोशल मीडिया आय टी सेल प्रदेश उपाध्यक्ष अनिष अग्रवाल यांनी केले आहे.

भारतीय सैन्याने ७ मे २०२५ रोजी पाकिस्तान आणि पाकिस्तान अधिकृत कश्मीर (PoK) मधील नऊ आतंकी ठिकाणांवर ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत केलेल्या सटीक आणि संयमित सैन्य कारवाईत आपल्या सैन्याने मोठे यश मिळवले आहे. जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या आतंकी हल्ल्यात २६ नागरिकांचा बळी गेला होता. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय वायुसेना, थलसेना आणि नौसेनेने एकत्रितपणे ही कारवाई करत आतंकवादाला चोख प्रत्युत्तर दिले. या अभियानात पाकिस्तानातील अनेक आतंकवादी ठिकाणे उद्ध्वस्त करण्यात आली, ज्यामुळे देशभरात सैन्याच्या शौर्याचे कौतुक होत आहे.

अनिष अग्रवाल यांनी सांगितले, “भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून केवळ आतंकवादाला ठेचच नाही, तर देशाच्या स्वाभिमानाला नवा आयाम दिला आहे. परळीतील तिरंगा रॅली हा आपल्या राष्ट्रभक्तीचा उत्सव आहे. प्रत्येक नागरिकाने यात सहभागी होऊन देशप्रेम व्यक्त करावे.”

१५ मे २०२५, गुरुवार रोजी दुपारी 4 वाजता तिरंगा रॅली परळीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मोंढा मार्केट  या प्रमुख मार्गाने काढण्यात येणार असून, यामध्ये युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विविध सामाजिक संघटना सहभागी होणार आहेत. रॅलीदरम्यान ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’ आणि ‘जय हिंद’च्या घोषणा देत सैन्याच्या पराक्रमाला सलाम करणारे फलक आणि तिरंगे झेंडे रॅलीचे मुख्य आकर्षण असतील.

परळीतील युवकांनी या रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी होऊन सैन्याच्या शौर्याला सलाम करावा आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश संपूर्ण देशभर पसरवावा, असे आवाहन भाजपा सोशल मीडिया आय टी सेल प्रदेश उपाध्यक्ष अनिष अग्रवाल यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!