कै.शिवाजीराव खाडे यांच्या तृतीय पुण्यस्मरण: भव्य दिव्य सोहळ्यात दोन दिवस कांदेवाडीत हरिनामाचा गजर !
नरदेहाचा मुख्य उद्देश परमार्थ साधना आहे - ह.भ.प. प्रशांत मोरे महाराज देहुकर
धारूर (प्रतिनिधी) :-
कांदेवाडी ता.धारूर येथील कै.शिवाजीराव रामभाऊ (अण्णा) खाडे यांच्या तृतीय पुण्यस्मरणनिमित्त दि.३० एप्रिल रोजी ह.भ.प.सोपान महाराज कनेरकर व दि.१ मे रोजी ह.भ.प. प्रशांत महाराज मोरे यांचे सुश्राव्य किर्तन झाले. या सुश्राव्य कीर्तन कार्यक्रमास ग्रामस्थ व परिसरातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कै. शिवाजीराव खाडे यांच्या तृतीय पुण्यस्मरनार्थ दोन दिवस कांदेवाडीत हरिनामाचा गजर
झाला.जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे वंशज ह.भ.प.प्रशांत मोरे महाराज देहुकर यांच्या किर्तनाने समारोप झाला.नरदेहाचा मुख्य उद्देश परमार्थ साधना आहे असे ह.भ.प मोरे महाराज देहुकर यांनी सांगितले.
परळी विधानसभा मतदारसंघाचे आ. धनंजय मुंडे यांचे विश्वासू प्रदीप खाडे, विलास खाडे, बालासाहेब खाडे यांचे वडील जेष्ठ नागरिक, शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तीमत्व कै.शिवाजीराव रामभाऊ (अण्णा) खाडे यांच्या पुण्यस्मरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.शुक्रवार दि.१ मे रोजी सकाळी ११ ते १ जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचे वंशज ह.भ.प.मोरे महाराज यांचे सुश्राव्य हरिकिर्तन झाले.प्रदीप खाडे, विलास खाडे, बालासाहेब खाडे यांनी महाराजांचा यथोचित सत्कार केला.कै.शिवाजीराव खाडे हे आदर्श व्यक्तीमत्व होते आणि त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून हे धार्मिक परंपरा जोपासत आहेत. आई - वडीलांच्या सेवेसारखे पुण्य कशातच नाही या गोष्टीकडे लक्ष केंद्रीत करत ते आपले कार्य करित आहेत. आपल्या वडिलांची मनोभावे त्यांनी सेवा केली. आपल्या वडीलांच्या स्मृती कशा जपाव्यात याचे उत्तम उदाहरण हे तिघे भावंड आहेत. त्यांच्यामुळे आज अध्यात्मिक वातावरण वाढत आहे असा गौरव महाराजांनी यावेळी केला.
"नरदेहीचा हाचि मुख्य स्वार्थ" या संत तुकाराम महाराज यांच्या अभंगावर कीर्तनसेवा करतांना महाराजांनी पुढे सांगितले की,नरदेहाचा मुख्य उद्देश परमार्थ साधना आहे म्हणजे आत्मज्ञानाची प्राप्ती. हा देह केवळ भौतिक सुख-दुःखासाठी नाही, तर आत्म-साधनेसाठी आहे. नरदेहाचा अर्थ मानवी जन्म. हा जन्म केवळ सांसारिक सुख-दुःखासाठी नसून, आत्म-ज्ञानासाठी आहे. यात अनेक संधी मिळतात, जसे की, चांगल्या माणसांचा सहवास आणि ज्ञान मिळवणे.
चांगल्या आणि ज्ञानी लोकांचा सहवास आपल्याला परमार्थ साधण्यास मदत करतो.देवाचे नामस्मरण आणि भक्ती आपल्याला आत्म-ज्ञानाकडे नेऊ शकते.देहाची लालसा सोडून, परमार्थ साधनेसाठी जीवन घालवणे हेच मुख्य ध्येय आहे.नरदेहाचा मुख्य उद्देश आत्म-साधना आहे, आणि यासाठी देहाची लालसा सोडून, परमार्थ साधनेकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे हभप मोरे महाराज देहुकर यांनी सांगितले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा