इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

साखरपुड्यातच संपन्न झाला दोन अभियंत्याचा विवाह सोहळा

शिंदे व कांदळकर परिवाराचा आदर्श, गौरवास्पद उपक्रम

अंबाजोगाई -/वसुदेव शिंदे

साखरपुड्यातच दोन अभियंत्यांचा शुभ विवाह सोहळा पुणे जिल्हयातील क्षेत्र आळंदी येथे मोठ्या थाटामाटात नुकताच संपन्न झाला. हा आदर्श दाखविणाऱ्या शिंदे कांदळकर या दोन्ही परिवाराचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. या बाबतची माहिती अशी की पुणे येथील नारायणराव कांदळकर यांची अभियंता असलेली कन्या मनिषा व बिड जिल्यातील केज तालुक्यातील मौजे होळ येथील रहिवासी असलेले संदिपान (काकाजी) नानाभाऊ शिंदे यांचे अभियंता असलेले तृतीय पुत्र रामेश्वर यांचा साखरपुडा नुकताच आळंदी येथे निश्चित करण्यात आला होता. त्यातच दोन्ही कुटुंबातील सदस्य व इतर नातेवाईक साखरपुडा आणि विवाह एकाच वेळी करण्याची इच्छा व्यक्त केली आणि साखर पुड्याच्या कार्यक्रमातच विवाह सोहळा थाटामाटात संपन्न झाला.

भारतीय संस्कृतीमध्ये विवाह सोहळ्याआधी साखरपुडा करण्याची पद्धत आहे ज्यात मुलगा आणि मुलगी एकमेकांना स्वीकारतात आणि विवाहबंधनात बांधले जातात.

साखरपुडा आणि विवाहाचा सोहळा एकाच वेळी करणे हा दुग्ध शर्करा योग असून हा सोहळा दोन्ही परिवाराच्या दृष्टीने सोयीचा व आनंदाचा क्षण ठरला असे कांदळकर  व शिंदे परिवाराने म्हटले आहे.दिनांक 16/05/2025 रोजी शुक्रवारी 

साखरपुड्यातच विवाह संपन्न झाल्याने वधु -वर दोन्ही कडील परिवाराला आनंद झाला परिवारातील सदस्यांना एकाच वेळी साखरपुडा व विवाह सोहळा साजरा झाला हे पाहण्याचे भाग्य लाभले साखर पुड्यातच विवाह सोहळा एकत्र झाल्याने मांडवातआनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.साखरपुडा आणि विवाह एकत्र करणे हे अधुनिक पद्धतीचे एक आदर्शव्रत उदाहरण आहे.यामुळे वेळ,खर्च आणि तयारी कमी लागते हीच बाब या दोन्ही परिवारानी लक्षात घेऊन हे पाऊल उचलले.कांदळकर व शिंदे दोन्ही परिवाराचे याबद्दल अभिनंदन होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या