इमेज
  दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलचा विद्यार्थी दिपक गोविंद गित्ते  इंटरनॅशनल 60 किलो वजन गटामध्ये ज्युडो येथे सिलेक्शन  परळी ( प्रतिनिधी) दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलचा विद्यार्थी चिरंजीव दीपक गोविंदराव गित्ते यांची मध्यप्रदेश भोपाल येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी इंटरनॅशनल 60 किलो वजन गटामध्ये ज्युडो या खेळामध्ये सिलेक्शन झाल्याबद्दल शाळेचे प्रेरणास्थान मार्गदर्शक मा. श्री .किरण गित्ते साहेब IAS सचिव : सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, उद्योग व वाणिज्य विभाग त्रिपुरा सरकार,  विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्षा : सौ.उषाताई किरण गित्ते , शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. श्रीकांत पाटील सर यांनी गोविंद गित्ते कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत .  या स्पर्धा मध्य प्रदेश भोपाल येथे इंटरनॅशनल या स्पर्धा दिनांक 12 मे 2026 रोजी होणार आहेत.           मराठवाड्यातील  नामांकित दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलने आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना खेळामध्ये महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेर विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झाले असून आता दीपक गोविंदराव गित्ते या विद्यार्थ्य...

वैष्णवीच्या जगण्याचा हक्क हिरावून घेणाऱ्यांना कडक शिक्षा होईल

ना.पंकजा मुंडे यांनी पुण्यात कसपटे कुटुंबियांची घेतली भेट ; परिवाराचे सांत्वन करत दिला धीर

वैष्णवीच्या जगण्याचा हक्क  हिरावून घेणाऱ्यांना कडक शिक्षा होईल

पुणे ।दिनांक २४।

वैष्णवी हगवणे वर मोठा अन्याय झाला आहे, ज्यांनी कुणी तिच्या जगण्याचा हक्क हिरावून घेतला आहे त्यांना कडक शिक्षा होईल असं राज्याच्या पर्यावरण व वातारणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांनी येथे सांगितलं.

      ना. पंकजा मुंडे यांनी आज पुण्यात वैष्णवीच्या माहेरी जावून तिचे वडिल अनिल कसपटे व कुटुंबियांची भेट घेतली ,त्यांचे सांत्वन केले तसेच त्यांना धीर दिला, त्यानंतर माध्यमांशी प्रतिक्रिया देताना त्या बोलत होत्या. यासंदर्भात बोलताना ना. पंकजा मुंडे म्हणाल्या, वैष्णवीच्या परिवाराला आज भेटले, त्यांचं म्हणण ऐकून घेतलं, त्यांच्या म्हणण्यानुसार वैष्णवी वर ज्या प्रकारे अन्याय झाला आणि तिचे प्राण गेले ते ऐकून महाराष्ट्रातील सर्व सामान्य माणूस देखील सुन्न झाला. प्रत्येक आई वडील आपल्या मुलीला लाडाने वाढवितात, तिच्या विवाहासाठी सर्वस्व पणाला लावतात, तिच्या सुखासाठी प्रयत्न करतात, पण अशा पध्दतीने मुलीचा प्राण गेला तर त्यांच्यासमोर मोठं प्रश्नचिन्ह उभं रहात. कसपटे कुटुंबाने तिच्या सुखासाठी सर्व केलं  तरी देखील वैष्णवी चे प्राण गेले. ही घटना खरोखरच वेदना देणारी आहे. मी वैष्णवीच्या परिवाराच्या पाठिशी आहे. राज्याची एक  मंत्री व महिला म्हणून मी त्यांना आश्वस्त केले आहे, त्यांच्या मनात कुठलीही शंका राहणार नाही. मुख्यमंत्री महोदयांशी पण त्यांची चर्चा झाली आहे. परिवाराच्या म्हणण्यानुसार ज्यांनी कुणी तिच्या जगण्याचा हक्क हिरावून घेतला आहे त्यांना कडक शासन झाल्याशिवाय राहणार नाही  असं ना. पंकजा मुंडेंनी यावेळी सांगितलं. 

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....