इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

वैष्णवीच्या जगण्याचा हक्क हिरावून घेणाऱ्यांना कडक शिक्षा होईल

ना.पंकजा मुंडे यांनी पुण्यात कसपटे कुटुंबियांची घेतली भेट ; परिवाराचे सांत्वन करत दिला धीर

वैष्णवीच्या जगण्याचा हक्क  हिरावून घेणाऱ्यांना कडक शिक्षा होईल

पुणे ।दिनांक २४।

वैष्णवी हगवणे वर मोठा अन्याय झाला आहे, ज्यांनी कुणी तिच्या जगण्याचा हक्क हिरावून घेतला आहे त्यांना कडक शिक्षा होईल असं राज्याच्या पर्यावरण व वातारणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांनी येथे सांगितलं.

      ना. पंकजा मुंडे यांनी आज पुण्यात वैष्णवीच्या माहेरी जावून तिचे वडिल अनिल कसपटे व कुटुंबियांची भेट घेतली ,त्यांचे सांत्वन केले तसेच त्यांना धीर दिला, त्यानंतर माध्यमांशी प्रतिक्रिया देताना त्या बोलत होत्या. यासंदर्भात बोलताना ना. पंकजा मुंडे म्हणाल्या, वैष्णवीच्या परिवाराला आज भेटले, त्यांचं म्हणण ऐकून घेतलं, त्यांच्या म्हणण्यानुसार वैष्णवी वर ज्या प्रकारे अन्याय झाला आणि तिचे प्राण गेले ते ऐकून महाराष्ट्रातील सर्व सामान्य माणूस देखील सुन्न झाला. प्रत्येक आई वडील आपल्या मुलीला लाडाने वाढवितात, तिच्या विवाहासाठी सर्वस्व पणाला लावतात, तिच्या सुखासाठी प्रयत्न करतात, पण अशा पध्दतीने मुलीचा प्राण गेला तर त्यांच्यासमोर मोठं प्रश्नचिन्ह उभं रहात. कसपटे कुटुंबाने तिच्या सुखासाठी सर्व केलं  तरी देखील वैष्णवी चे प्राण गेले. ही घटना खरोखरच वेदना देणारी आहे. मी वैष्णवीच्या परिवाराच्या पाठिशी आहे. राज्याची एक  मंत्री व महिला म्हणून मी त्यांना आश्वस्त केले आहे, त्यांच्या मनात कुठलीही शंका राहणार नाही. मुख्यमंत्री महोदयांशी पण त्यांची चर्चा झाली आहे. परिवाराच्या म्हणण्यानुसार ज्यांनी कुणी तिच्या जगण्याचा हक्क हिरावून घेतला आहे त्यांना कडक शासन झाल्याशिवाय राहणार नाही  असं ना. पंकजा मुंडेंनी यावेळी सांगितलं. 

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या