मोठ्या संख्येने उपस्थित रहा....

इमेज
द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल व पूजा प्राथमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आज आयोजन परळी वैजनाथ | प्रतिनिधी द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल व पूजा प्राथमिक विद्यालय, परळी वैजनाथ यांच्या वतीने २० वे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. हे स्नेहसंमेलन आज  बुधवार, दि. ५ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता लोकनेते गोपीनाथराव मुंडे  नटराज रंग मंदिर, परळी वैजनाथ येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामलिंग राजनळे सर (माजी मुख्याध्यापक, वैद्यनाथ विद्यालय) राहणार असून उद्घाटन  गणेश गिरी (गटशिक्षणाधिकारी, गटसाधन केंद्र, परळी वै.) यांच्या हस्ते होणार आहे. या काकार्यक्रमास बाजीराव  भैय्या   धर्माधिकारी (माजी नगराध्यक्ष),  कोकणे  (विस्ताराधिकारी),  धनंजय ढोणे  (पोलीस निरीक्षक),  दिवाकर जोशी (गझलकार), प्रा. रविंद्र जोशी सर (पत्रकार,  दैनिक पुढारी),  व्यंकटेश शिंदे (नगरसेवक) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.           स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांचे नृत...

उड्डाणपूलाचे प्रस्तावित दुरुस्ती काम आषाढी एकादशी पर्यंत स्थगित करावे!

निदान आषाढी वारीच्या दिंड्या परळीतून जाईपर्यंत तरी उड्डाणपूलावरील वाहतूक बंद करु नये-गोपाळ आंधळे

परळी वै.(प्रतिनीधी)वारकरी संप्रदायाची सर्वात मोठी आध्यात्मिक पर्वणी म्हणून ओळख असलेली पंढरपूरच्या आषाढी वारीला सुरूवात होत आहे.परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्रात विदर्भ आणी इतर भागातून शेकडो दिंड्या मुक्कामी शहरात दाखल होत असतात.त्या सर्व वारकर्यांची गैरसोय होवू नये. या साठी शामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपूलाचे प्रस्तावित काम आषाढी एकादशी पर्यंत स्थगित करावे. निदान आषाढीवारीच्या दिंड्या परळीतून जाईपर्यंततरी उड्डाणपूलावरील वाहतूक बंद करु नये अशी मागणी न.प.चे माजी शिक्षण सभापती गोपाळ आंधळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

       वारकरी संप्रदायाचे व सबंध महाराष्ट्राचे आराध्य दैवत.पंढरीचा पांडुरंग परमात्मा श्रीविठ्ठलाचा आषाढी वारीचा सोहळा अगदी कांही दिवसांनी सुरू होत आहे.परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र असल्यामुळे खास करून विदर्भातील शेकडो दिंड्या या परळी शहरात मुक्कामी असतात. परंतु प्रस्तावित शामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपूलाच्या दुरुस्तीच्या कामामुळे हा पुल वाहतूकीसाठी दिर्घकाळ बंद ठेवण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे.हा पुल बंद झाल्यावर वारकर्यांची मोठी गैरसोय होणार तर आहेच .परंतु अनादी काळापासून चालत आलेली परळी मुक्कामाची परंपरा बंद होईल.त्यामुळे प्रशासनाकडून हे प्रस्तावित काम आषाढी वारी संपन्न झाल्यावरच पुलाच्या दुरूस्तीचे काम करावे अशी मागणी माजी शिक्षण सभापती गोपाळ आंधळे यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....