परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

उड्डाणपूलाचे प्रस्तावित दुरुस्ती काम आषाढी एकादशी पर्यंत स्थगित करावे!

निदान आषाढी वारीच्या दिंड्या परळीतून जाईपर्यंत तरी उड्डाणपूलावरील वाहतूक बंद करु नये-गोपाळ आंधळे

परळी वै.(प्रतिनीधी)वारकरी संप्रदायाची सर्वात मोठी आध्यात्मिक पर्वणी म्हणून ओळख असलेली पंढरपूरच्या आषाढी वारीला सुरूवात होत आहे.परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्रात विदर्भ आणी इतर भागातून शेकडो दिंड्या मुक्कामी शहरात दाखल होत असतात.त्या सर्व वारकर्यांची गैरसोय होवू नये. या साठी शामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपूलाचे प्रस्तावित काम आषाढी एकादशी पर्यंत स्थगित करावे. निदान आषाढीवारीच्या दिंड्या परळीतून जाईपर्यंततरी उड्डाणपूलावरील वाहतूक बंद करु नये अशी मागणी न.प.चे माजी शिक्षण सभापती गोपाळ आंधळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

       वारकरी संप्रदायाचे व सबंध महाराष्ट्राचे आराध्य दैवत.पंढरीचा पांडुरंग परमात्मा श्रीविठ्ठलाचा आषाढी वारीचा सोहळा अगदी कांही दिवसांनी सुरू होत आहे.परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र असल्यामुळे खास करून विदर्भातील शेकडो दिंड्या या परळी शहरात मुक्कामी असतात. परंतु प्रस्तावित शामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपूलाच्या दुरुस्तीच्या कामामुळे हा पुल वाहतूकीसाठी दिर्घकाळ बंद ठेवण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे.हा पुल बंद झाल्यावर वारकर्यांची मोठी गैरसोय होणार तर आहेच .परंतु अनादी काळापासून चालत आलेली परळी मुक्कामाची परंपरा बंद होईल.त्यामुळे प्रशासनाकडून हे प्रस्तावित काम आषाढी वारी संपन्न झाल्यावरच पुलाच्या दुरूस्तीचे काम करावे अशी मागणी माजी शिक्षण सभापती गोपाळ आंधळे यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!