इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

नागरिकांच्या स्वाक्षरीने नगरपरिषदेला निवेदन सादर!

पुरातन वारसा जपा:पडझड होत असलेल्या ऐतिहासिक राणी लक्ष्मीबाई टॉवरचे जतन करावे - अश्विन मोगरकर

परळी वैजनाथ । प्रतिनिधी....

        परळी शहराची ओळख असलेले ऐतिहासिक वास्तू म्हणून परिचित असलेल्या परळी शहरातील राणी लक्ष्मीबाई टॉवरची देखभाली अभावी पडझड होत असून परळी नगरपरिषदेने या ऐतिहासिक वास्तूची पडझड रोखून मूळ स्वरूपात कुठलाही बदल न करता ही वास्तू जतन करावी अशी मागणी अश्विन मोगरकर यांनी परळी नगरपरिषद प्रशासनाकडे केली आहे.

परळी वैजनाथ शहरात मध्यवर्ती ठिकाणी किमान 50 वर्षांपूर्वी राणी लक्ष्मीबाई टॉवर उभे करण्यात आले होते. या वास्तुशी परळीतील संवेदनशील नागरिकांचे भावनिक नाते जुळलेले आहे. या राणी लक्ष्मीबाई टॉवरच्या देखभाली अभावी पडझड होत आहे. पाच दशकांहुन अधिक वर्षांपूर्वी उभे केलेले टॉवर ही परळीची ओळख आहे. प्रत्येक परळीकर नागरिकाला या वास्तुविषयी आत्मीयता आहे. परळीचा हा वारसा टिकावा व जतन करण्यात यावा यासाठी नगरपरिषदेने त्वरित पाऊले उचलली पाहिजेत. जगात अनेक अश्या जुन्या वास्तुंना हेतुपुरस्सर जपले जाते. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून राणी लक्ष्मीबाई टॉवरच्या मूळ स्वरूपात बदल न करता येऊ शकते. यासाठी नगरपरिषदेने त्वरित याबाबतीत हालचाली कराव्यात अशी मागणी अश्विन मोगरकर यांनी केली आहे.

परळीची ओळख असलेले राणी लक्ष्मीबाई टॉवर संवर्धन व्हावे, टॉवरच्या संवर्धनासाठी तात्काळ कृती करावी, तसेच राणी लक्ष्मीबाई टॉवर वर लावले जाणारे बॅनर, पोस्टर वर बंदी आणावी व टॉवर चे विद्रुपीकरण थांबवावे या मागणीचे निवेदन गुरुवार, दि 29 मे रोजी परळी नगरपरिषद प्रशासनास देण्यात आले. या निवेदनावर अश्विन मोगरकर, कल्पेश बियाणी, रमेश चौंडे, अरुण पाठक, योगेश पांडकर, विजय जोशी, मोहन राजमाने, सतीश अग्रवाल, जयंत अरणकल्ले, ओमप्रकाश सारडा, भारत अग्रवाल, रमाकांत नाना टाक, एकनाथ शिंदे, भरत सोनपेठकर, प्रणव टाक, लक्ष्मणराव भोयटे, नदीम शेख, धनराज कुरील, राधाकिशन कांबळे, श्रीकांत सोळंके, मधुकर गित्ते, प्रवीण फुटके यांच्या स्वाक्षरी आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या