दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

नागरिकांच्या स्वाक्षरीने नगरपरिषदेला निवेदन सादर!

पुरातन वारसा जपा:पडझड होत असलेल्या ऐतिहासिक राणी लक्ष्मीबाई टॉवरचे जतन करावे - अश्विन मोगरकर

परळी वैजनाथ । प्रतिनिधी....

        परळी शहराची ओळख असलेले ऐतिहासिक वास्तू म्हणून परिचित असलेल्या परळी शहरातील राणी लक्ष्मीबाई टॉवरची देखभाली अभावी पडझड होत असून परळी नगरपरिषदेने या ऐतिहासिक वास्तूची पडझड रोखून मूळ स्वरूपात कुठलाही बदल न करता ही वास्तू जतन करावी अशी मागणी अश्विन मोगरकर यांनी परळी नगरपरिषद प्रशासनाकडे केली आहे.

परळी वैजनाथ शहरात मध्यवर्ती ठिकाणी किमान 50 वर्षांपूर्वी राणी लक्ष्मीबाई टॉवर उभे करण्यात आले होते. या वास्तुशी परळीतील संवेदनशील नागरिकांचे भावनिक नाते जुळलेले आहे. या राणी लक्ष्मीबाई टॉवरच्या देखभाली अभावी पडझड होत आहे. पाच दशकांहुन अधिक वर्षांपूर्वी उभे केलेले टॉवर ही परळीची ओळख आहे. प्रत्येक परळीकर नागरिकाला या वास्तुविषयी आत्मीयता आहे. परळीचा हा वारसा टिकावा व जतन करण्यात यावा यासाठी नगरपरिषदेने त्वरित पाऊले उचलली पाहिजेत. जगात अनेक अश्या जुन्या वास्तुंना हेतुपुरस्सर जपले जाते. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून राणी लक्ष्मीबाई टॉवरच्या मूळ स्वरूपात बदल न करता येऊ शकते. यासाठी नगरपरिषदेने त्वरित याबाबतीत हालचाली कराव्यात अशी मागणी अश्विन मोगरकर यांनी केली आहे.

परळीची ओळख असलेले राणी लक्ष्मीबाई टॉवर संवर्धन व्हावे, टॉवरच्या संवर्धनासाठी तात्काळ कृती करावी, तसेच राणी लक्ष्मीबाई टॉवर वर लावले जाणारे बॅनर, पोस्टर वर बंदी आणावी व टॉवर चे विद्रुपीकरण थांबवावे या मागणीचे निवेदन गुरुवार, दि 29 मे रोजी परळी नगरपरिषद प्रशासनास देण्यात आले. या निवेदनावर अश्विन मोगरकर, कल्पेश बियाणी, रमेश चौंडे, अरुण पाठक, योगेश पांडकर, विजय जोशी, मोहन राजमाने, सतीश अग्रवाल, जयंत अरणकल्ले, ओमप्रकाश सारडा, भारत अग्रवाल, रमाकांत नाना टाक, एकनाथ शिंदे, भरत सोनपेठकर, प्रणव टाक, लक्ष्मणराव भोयटे, नदीम शेख, धनराज कुरील, राधाकिशन कांबळे, श्रीकांत सोळंके, मधुकर गित्ते, प्रवीण फुटके यांच्या स्वाक्षरी आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....