कवयित्री अपर्णा कुलकर्णी यांचा अनोखा उपक्रम
यावर्षी अंबाजोगाईला पुस्तकाचे गाव म्हणून सन्मान मिळाला म्हणून महिलांनी हळदी कुंकवाबरोबरच दिले पुस्तक भेट
अंबाजोगाई -(वसुदेव शिंदे)-
हा महिना घरोघरी चैत्र व गौरीचा.... त्या निमित्त महिला मोठ्या प्रमाणात हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवतात त्यानिमित्ताने विचारांची आदान प्रदान होते गौरी समोर आरास केले जातात. अंबाजोगाई शहरातील कल्याणनगर मधील कवयित्री अपर्णा कुलकर्णी यांनी यावर्षी पुस्तकाचे आरास देखावा केला होता गौरी गणपती समोर केला या वर्षी अंबाजोगाईला पुस्तकाचे गाव हा सन्मान मिळाला त्या आनंदा प्रित्यर्थ यावर्षी त्यांनी पुस्तकाची आरास करून विविध महामानवाचे चरित्र ग्रंथ ठेवून पुस्तकाने गौरीला सजविले व त्यानिमित्त महिलांना पुस्तक भेट दिले हा अनोखा उपक्रम राबवुन अंबाजोगाई नगरी पुस्तकाची ही जननी आहे यामुळे पुस्तके जास्तीत जास्त वाचली जावीत पण घराघरात पुस्तकाची जागा मोबाईलने घेतली आहे त्यामुळे वाचन संस्कृती नष्ट होत चालली आहे वाचन नसल्यामुळे समाजात अविवेकीपणा वाढत आहे त्यामुळे समाजात वाढत आहे त्यामुळे समाजात आज वाचन असल्यामुळे चांगले वाईट व्यक्त नाही समाजामध्ये विवेक संपत चालले आहेत तो विवेक जागृत करण्यासाठी पुस्तके एकच मुख्य साधन आहे म्हणून पुस्तकाचे गाव असल्यामुळे प्रत्येकाने घराघरात पुस्तक गेले पाहिजे ते वाचले पाहिजे व समाज निर्मितीसाठी वाचन सांस्कृती जपली पाहिजे आपण प्रत्येक प्रबोधनातून उपक्रम राबवून सामाजिक उपक्रम राबविले पाहिजेत पुस्तकाचे वाचन संस्कृती चळवळ निर्मिती होईल असे अपर्णा कुलकर्णी यांचे मत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा