इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

 जिल्हाधिकाऱ्यांच्या "जनता दरबार" उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद — 280 अर्ज निकाली, 234 प्रलंबित प्रकरणांवर कार्यवाही सुरू

बीड : बीड जिल्ह्यातील सामान्य नागरिकांच्या अडचणी थेट प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आठवड्यातून तीन दिवस जनता दरबाराचे आयोजन करण्यात येत आहे. प्रत्येक सोमवार, मंगळवार आणि गुरुवार दुपारी 12 ते 2 या वेळेत हा दरबार भरतो असून, जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्राप्त तक्रारींवर तातडीने कार्यवाही केली जाते.


सदर उपक्रमाअंतर्गत आतापर्यंत एकूण 534 अर्ज प्राप्त झाले असून, त्यापैकी 280 प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. उर्वरित 234 प्रकरणांवर कार्यवाही सुरू असून, संबंधित विभागांना त्वरीत निकाल लावण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. अर्जांची माहिती व कार्यवाहीची स्थिती नोंदवण्यासाठी गुगल शीटद्वारे संकलन करण्यात येत आहे.


_तालुकास्तरावरील समस्यांमुळे जिल्हा कार्यालयात गर्दी_


जनता दरबारात प्राप्त होणाऱ्या तक्रारी प्रामुख्याने तालुकास्तरावरील असल्याचे निदर्शनास आले आहे. उपविभागीय व तहसील कार्यालयांकडून तक्रारींचे निराकरण न झाल्यामुळे नागरिक जिल्हा कार्यालयात येत असल्याचे स्पष्ट झाले आहे.


_नवीन परिपत्रक जारी — आता तालुका आणि उपविभागीय स्तरावरही जनता दरबार_


ही परिस्थिती लक्षात घेता, दिनांक 28 मे 2025 पासून प्रत्येक सोमवार आणि गुरुवार दुपारी 12 ते 2 या वेळेत उपविभागीय व तालुकास्तरावरही जनता दरबाराचे आयोजन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने दिले आहेत. त्यामुळे आता नागरिकांना त्यांच्या स्थानिक पातळीवरच त्यांच्या तक्रारी सादर करता येणार असून, तालुकास्तरावरील अधिकाऱ्यांनी यावर कार्यवाही करावी, अशा स्पष्ट सूचना उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना देण्यात आलेल्या आहेत.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या