इमेज
  घरकुल लाभार्थ्यांची थट्टा थांबवा, अन्यथा आंदोलन; महादेव गंगणे पाटील यांचा परळी पालिकेला इशारा परळी वैजनाथ (प्रतिनिधी) रमाई घरकुल योजनेंतर्गत १५४ लाभार्थ्यांना १ कोटी १ लाख ८१ हजार २५० रुपयांचा निधी वर्ग केल्याच्या बातम्या प्रसिद्ध करून स्वतःची पाठ थोपवून घेणाऱ्या परळी नगर परिषदेचा फुगा फुटला आहे. प्रत्यक्षात एकाही लाभार्थ्याला रुपया देखील मिळाला नसून, नगर परिषदेने केवळ कागदी घोडे नाचवले असल्याचा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष महादेव गंगणे पाटील यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी प्रशासनाला तीव्र जाब विचारला आहे. प्रसिद्धीचा स्टंट, प्रत्यक्षात लाभार्थी वंचित महादेव गंगणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे नगर परिषदेच्या कारभारावर तीव्र आक्षेप घेतला आहे. नगर परिषदेने काही दिवसांपूर्वी रमाई आवास योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणावर निधी वाटप केल्याचा दावा प्रसिद्धी माध्यमांद्वारे केला होता. मात्र, प्रत्यक्षात जेव्हा लाभार्थ्यांनी त्यांच्या बँक खात्यांची तपासणी केली, तेव्हा त्यांच्या हाती निराशाच आली. अनेक गरीब आणि गरजू लाभार्थी अद्यापही पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्यापासून वंचित आहे...

हार्दिक अभिनंदन!!!!

संत ज्ञानेश्वर माऊली महाराज चाकरवाडीकर रौप्यमहोत्सवी पुण्यस्मरण सोहळा: बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांना "माऊली सेवा समर्पण पुरस्कार" जाहीर

परळी वैजनाथ, जि. बीड (प्रतिनिधी) – अखिल भारतीय वारकरी मंडळ यांच्या वतीने २१ व्या शतकातील महान संत ज्ञानेश्वर माऊली महाराज चाकरवाडीकर यांच्या रौप्यमहोत्सवी पुण्यस्मरणानिमित्त परळीचे माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांना  "माऊलीसेवा समर्पण पुरस्कार" जाहीर करण्यात आला आहे.

        सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांचे दीर्घकालीन योगदान, निस्वार्थी सेवा आणि समर्पण वृत्ती याची दखल घेत अ.भा. वारकरी मंडळाने यावर्षीच्या पुरस्कारासाठी त्यांची  निवड केली असल्याचे अ.भा. वारकरी मंडळाचे प्रदेशाध्यक्ष ह.भ.प. रामेश्वर महाराज कोकाटे यांनी सांगितले आहे.श्री. धर्माधिकारी यांचे कार्य समाजासाठी एक दीपस्तंभ ठरलेले आहे. त्यांनी दाखवलेला सेवाभाव आणि सातत्यपूर्ण प्रयत्न प्रेरणादायी आहेत.हा पुरस्कार संत सेवा, समाजकार्य आणि भक्तिपंथातील सेवा,समर्पण व योगदानासाठी दिला जात असुन, यंदा पुरस्काराचे रौप्यमहोत्सवी वर्ष असल्याने त्याचे महत्त्व अधिकच आहे. पुरस्कार वितरणाचा सोहळा लवकरच परळी येथे होणार असून, मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यामध्ये संतविचार, वारकरी संप्रदाय, आणि समाजसेवेचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या व्यक्तीमत्वाचा गौरव होणार आहे.


     श्री. बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या निवडीचे  सर्वत्र स्वागत होत असुन, विविध संस्था, संघटना आणि नागरिकांकडून त्यांना अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....