इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

हार्दिक अभिनंदन!!!!

संत ज्ञानेश्वर माऊली महाराज चाकरवाडीकर रौप्यमहोत्सवी पुण्यस्मरण सोहळा: बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांना "माऊली सेवा समर्पण पुरस्कार" जाहीर

परळी वैजनाथ, जि. बीड (प्रतिनिधी) – अखिल भारतीय वारकरी मंडळ यांच्या वतीने २१ व्या शतकातील महान संत ज्ञानेश्वर माऊली महाराज चाकरवाडीकर यांच्या रौप्यमहोत्सवी पुण्यस्मरणानिमित्त परळीचे माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांना  "माऊलीसेवा समर्पण पुरस्कार" जाहीर करण्यात आला आहे.

        सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांचे दीर्घकालीन योगदान, निस्वार्थी सेवा आणि समर्पण वृत्ती याची दखल घेत अ.भा. वारकरी मंडळाने यावर्षीच्या पुरस्कारासाठी त्यांची  निवड केली असल्याचे अ.भा. वारकरी मंडळाचे प्रदेशाध्यक्ष ह.भ.प. रामेश्वर महाराज कोकाटे यांनी सांगितले आहे.श्री. धर्माधिकारी यांचे कार्य समाजासाठी एक दीपस्तंभ ठरलेले आहे. त्यांनी दाखवलेला सेवाभाव आणि सातत्यपूर्ण प्रयत्न प्रेरणादायी आहेत.हा पुरस्कार संत सेवा, समाजकार्य आणि भक्तिपंथातील सेवा,समर्पण व योगदानासाठी दिला जात असुन, यंदा पुरस्काराचे रौप्यमहोत्सवी वर्ष असल्याने त्याचे महत्त्व अधिकच आहे. पुरस्कार वितरणाचा सोहळा लवकरच परळी येथे होणार असून, मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यामध्ये संतविचार, वारकरी संप्रदाय, आणि समाजसेवेचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या व्यक्तीमत्वाचा गौरव होणार आहे.


     श्री. बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या निवडीचे  सर्वत्र स्वागत होत असुन, विविध संस्था, संघटना आणि नागरिकांकडून त्यांना अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या