कल्याणी....!!!. ...... पहा: सर्व काही वरील... पंकजाताई चा संपूर्ण पॉडकास्ट

इमेज
"राजकारणाने मला निवडले; बाबांचे जाणे आयुष्याला कलाटणी देणारे ठरले" - पंकजाताई मुंडे  "मला कधीच राजकारणात यायचे नव्हते. माझी स्वतःची वेगळी स्वप्ने होती. बाबा असताना परिस्थिती अशी आली की एका दिवसांत सगळं बदललं आणि मी राजकारणात आले. मात्र ३ जून २०१४ रोजी घडलेल्या एका घटनेने माझे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले. परिस्थिती अशी निर्माण झाली की, मी राजकारण निवडले नाही तर राजकारणानेच मला निवडले," अशी भावनिक प्रतिक्रिया भाजप नेत्या पंकजाते मुंडे यांनी एका विशेष मुलाखतीत व्यक्त केली.    दिवंगत नेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या आठवणींना उजाळा देताना पंकजाताई मुंडे यांनी त्यांच्या निधनानंतरच्या संघर्षाचा, राजकारणातील प्रवासाचा आणि वडिलांकडून मिळालेल्या संस्कारांचा भावनिक प्रवास उलगडला. पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, ३ जून २०१४ हा दिवस त्यांच्या कुटुंबासाठीच नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणासाठीही अत्यंत धक्कादायक ठरला. "त्या दिवशी बाबांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. घरात आनंदाचे वातावरण होते. आईने कार्यक्रमासाठी पैठणी तयार ठेवली होती, मीदेखील नवीन पोशाख काढून ...

 राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा २६ वा वर्धापन दिन पुण्यात; उपस्थित रहा- ॲड.जीवनराव देशमुख

   परळी वैजनाथ — राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा २६ वा वर्धापन दिन मंगळवार, दि. १० जून २०२५ रोजी सकाळी १० वाजता पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिर नाट्यगृह, संभाजी पार्क जवळ, जंगली महाराज रोड, शिवाजीनगर येथे साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मविभूषण  खा. श्री. शरदचंद्र पवार उपस्थित राहणार आहेत.


या महत्त्वाच्या कार्यक्रमात पक्षाच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेण्यात येणार आहे. तसेच पुढील काळासाठी पक्षाच्या कार्ययोजनेवर चर्चा होणार आहे. कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.


        परळी वैजनाथ शहराध्यक्ष ॲड. जीवनराव देशमुख यांनी या निमित्ताने सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून पक्षाचा उत्साहवर्धक वर्धापन दिन साजरा करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २६ वा वर्धापन दिन हा पक्षासाठी तसेच जनतेसाठी नव्या आशा व उमेदिंनी भरलेला दिवस आहे. या कार्यक्रमात आपण एकत्र येऊन पक्षाच्या प्रगतीचा आढावा घेणार आहोत आणि भविष्यासाठी नवीन मार्ग आखणार आहोत. प्रत्येक कार्यकर्त्याने आणि समर्थकाने मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या पक्षाला बळकटी देणे गरजेचे आहे.” त्यामुळे सर्वांनी या कार्यक्रमात उत्साहाने सहभागी व्हावे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा वर्धापन दिन कार्यक्रम पक्षाच्या एकतेचा आणि नव्या संकल्पांचा संदेश देणारा कार्यक्रम ठरणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या