इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

 परळी वैजनाथ नगर परिषदेचा नेहमीप्रमाणेच अंध:कारमय कारभार !

गजानन महाराज पालखी सोहळा अंधारातच मार्गस्थ, भक्तगणांमध्ये संतापाचा सूर

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) –

       संत गजानन महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर संत जगमित्रनागा मंदिर ते आझाद चौक या मार्गावर आज (२१ जून) पहाटे ५ वाजता पालखी मार्गस्थ झाली. मात्र, यावेळी संपूर्ण पालखी मार्गावरील पथदिवे बंद होते. परिणामी, पालखी अंधारात मार्गस्थ होण्याची नामुष्की पालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे ओढवली.

प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने भाविकांनी पहाटे लवकर उठून पालखी सोहळ्यात सहभाग घेतला. मात्र, शहरातील मुख्य पालखी मार्गावरील पथदिवे बंद असल्याने संपूर्ण मार्गावर अंधाराचे साम्राज्य पसरले होते. परिणामी, पालखी अंधारात पुढे जावी लागली. यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटला असून नगर परिषदेविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणि सोहळ्याच्या शिस्तबद्धतेसाठी प्रकाशव्यवस्था अत्यंत आवश्यक असते. तरीदेखील प्रशासनाने याबाबत कोणतीही पूर्वतयारी न करता निष्काळजीपणाच दर्शविला आहे. शहरात धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांना स्थानिक प्रशासनाची मदत मिळावी हीच अपेक्षा असते, मात्र परळी नगर परिषद वारंवार अशीच उदासीनता दाखवत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

स्थानिक नागरिक तसेच भाविकांनी नगर परिषदेच्या या ढिसाळ कारभारावर नाराजी व्यक्त करत जबाबदारी निश्चित करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

या प्रकारामुळे प्रशासनाचा नियोजनशून्य आणि असंवेदनशील कारभार पुन्हा एकदा उजेडात आला आहे.

पालखी अंधारातच मार्गस्थ?

  • संत जगमित्रनागा मंदिर ते आझाद चौक दरम्यान सर्व पथदिवे बंद
  • पालखी मार्गावर पथदिवे चालू नव्हते
  • भाविक भक्तांमध्ये चीड 
  • नगर परिषदेच्या नियोजनाचा अभाव




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या