मोठ्या संख्येने उपस्थित रहा....

इमेज
द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल व पूजा प्राथमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आज आयोजन परळी वैजनाथ | प्रतिनिधी द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल व पूजा प्राथमिक विद्यालय, परळी वैजनाथ यांच्या वतीने २० वे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. हे स्नेहसंमेलन आज  बुधवार, दि. ५ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता लोकनेते गोपीनाथराव मुंडे  नटराज रंग मंदिर, परळी वैजनाथ येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामलिंग राजनळे सर (माजी मुख्याध्यापक, वैद्यनाथ विद्यालय) राहणार असून उद्घाटन  गणेश गिरी (गटशिक्षणाधिकारी, गटसाधन केंद्र, परळी वै.) यांच्या हस्ते होणार आहे. या काकार्यक्रमास बाजीराव  भैय्या   धर्माधिकारी (माजी नगराध्यक्ष),  कोकणे  (विस्ताराधिकारी),  धनंजय ढोणे  (पोलीस निरीक्षक),  दिवाकर जोशी (गझलकार), प्रा. रविंद्र जोशी सर (पत्रकार,  दैनिक पुढारी),  व्यंकटेश शिंदे (नगरसेवक) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.           स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांचे नृत...

 परळी वैजनाथ नगर परिषदेचा नेहमीप्रमाणेच अंध:कारमय कारभार !

गजानन महाराज पालखी सोहळा अंधारातच मार्गस्थ, भक्तगणांमध्ये संतापाचा सूर

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) –

       संत गजानन महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर संत जगमित्रनागा मंदिर ते आझाद चौक या मार्गावर आज (२१ जून) पहाटे ५ वाजता पालखी मार्गस्थ झाली. मात्र, यावेळी संपूर्ण पालखी मार्गावरील पथदिवे बंद होते. परिणामी, पालखी अंधारात मार्गस्थ होण्याची नामुष्की पालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे ओढवली.

प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने भाविकांनी पहाटे लवकर उठून पालखी सोहळ्यात सहभाग घेतला. मात्र, शहरातील मुख्य पालखी मार्गावरील पथदिवे बंद असल्याने संपूर्ण मार्गावर अंधाराचे साम्राज्य पसरले होते. परिणामी, पालखी अंधारात पुढे जावी लागली. यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटला असून नगर परिषदेविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणि सोहळ्याच्या शिस्तबद्धतेसाठी प्रकाशव्यवस्था अत्यंत आवश्यक असते. तरीदेखील प्रशासनाने याबाबत कोणतीही पूर्वतयारी न करता निष्काळजीपणाच दर्शविला आहे. शहरात धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांना स्थानिक प्रशासनाची मदत मिळावी हीच अपेक्षा असते, मात्र परळी नगर परिषद वारंवार अशीच उदासीनता दाखवत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

स्थानिक नागरिक तसेच भाविकांनी नगर परिषदेच्या या ढिसाळ कारभारावर नाराजी व्यक्त करत जबाबदारी निश्चित करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

या प्रकारामुळे प्रशासनाचा नियोजनशून्य आणि असंवेदनशील कारभार पुन्हा एकदा उजेडात आला आहे.

पालखी अंधारातच मार्गस्थ?

  • संत जगमित्रनागा मंदिर ते आझाद चौक दरम्यान सर्व पथदिवे बंद
  • पालखी मार्गावर पथदिवे चालू नव्हते
  • भाविक भक्तांमध्ये चीड 
  • नगर परिषदेच्या नियोजनाचा अभाव




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....