परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

समतोल: उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर यांनी यशस्वी हाताळला प्रश्न !

परळीतील उड्डाणपूल दुरुस्तीची कामे आणि वाहतूक व्यवस्थापनाचा साधला समतोल – प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

परळी वैजनाथ – परळीतील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपुलाच्या दुरुस्तीची कामे सुरू होणार असुन, ही कामे सुरू असतानाही पंढरपूरच्या आषाढी वारीला जाणाऱ्या दिंड्या येउन जाईपर्यंत वाहतूक सुरु ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.  उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर यांनी यशस्वी प्रश्न हाताळला.पार  पडलेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीत या कामांबाबतचा कार्य आराखडा तयार करण्यात आला असुन, आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी घेण्याचे ठरवण्यात आले आहे.

वाहतूक सुरु ठेवण्यावर भर...

परळीतील हा उड्डाणपूल म्हणजेच शहरात येण्यासाठीचा मुख्य प्रवेशद्वार आहे. शहरातील आणि परराज्यातील अनेक भागांतील वाहतूक या पुलावरून होते. त्यामुळे पुलाच्या दुरुस्तीच्या कामांदरम्यान वाहतूक पूर्णपणे बंद ठेवणे शक्य नसल्याने, कामे ही मध्यरात्रीच्या सुमारास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिणामी, दिवसाच्या वेळात सामान्य वाहनचालकांना फारसा त्रास होणार नाही.

जड वाहतुकीसाठी बायपास मार्ग

दुरुस्तीच्या कामादरम्यान जड वाहनांना तात्पुरत्या स्वरुपात बायपास मार्गावर वळविण्यात येणार आहे. यामुळे पुलावरचा भार काहीसा कमी होईल आणि दुरुस्तीची कामे अधिक सुरक्षितपणे पार पडू शकतील.

जनभावनेचा आदर

नागरिकांकडून ‘वाहतूक पूर्णपणे बंद करू नये’ अशी मागणी करण्यात येत होती. ही जनभावना लक्षात घेऊन प्रशासनाने मध्यममार्ग स्वीकारत दुरुस्तीची कामे रात्रीच्या वेळात करण्याचा मार्ग निवडला आहे. यामुळे वाहतूक सुरळीत राहणार असून, पुलाचे देखभाल व मजबुतीकरणही वेळेत पूर्ण होणार आहे.

उड्डाणपूल दुरुस्तीचे महत्त्व

हा उड्डाणपूल अनेक वर्षांपासून वापरात असून, काही ठिकाणी तांत्रिक दोष, गंज व थरांचे नुकसान झाले आहे. भविष्यात कोणताही अपघात होऊ नये यासाठी आणि पुलाचा कालावधी वाढवण्यासाठी ही दुरुस्ती अत्यंत आवश्यक आहे. कामांनंतर पुलाची स्थिती अधिक सुरक्षित व स्थिर होणार असून, वाहनचालकांसाठीही तो निर्धोक होणार आहे.

प्रशासनाची भूमिका

प्रशासनाने या कामांची वेळ, मार्गावरील बदल, वाहतूक पोलिसांची तैनाती, तसेच कामांबाबत जनजागृती यांसाठी नियोजनबद्ध कृती आराखडा तयार केला आहे. स्थानिक नागरिक, व्यापारी, वारीसाठी येणाऱ्या दिंड्या यांना त्रास कमी व्हावा यासाठी विशेष उपाययोजना केल्या जाणार आहेत.

थोडक्यात :

  • उड्डाणपूल दुरुस्तीचे काम मध्यरात्री सुरू होणार
  • दिवसाची वाहतूक सुरु ठेवण्यात येणार
  • जड वाहतूक बायपासवर वळविण्यात येणार
  • आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर विशेष दक्षता
  • नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन निर्णय
  • तुर्तास हलके हलके काम करण्यात येणार आहेत. बेरिंगची कामे केली जाणार असुन दिंड्या येउन गेल्यावर  एक्सपेन्शन जाॅइंट चे काम केले जाणार आहे. याकाळात काही दिवस वाहतूक पुर्णत: बंद करावीच लागणार आहे. 

परळीतील विकासाच्या दृष्टीने आणि भविष्यातील धोके टाळण्यासाठी ही दुरुस्ती अत्यावश्यक आहे. या कामांदरम्यान प्रशासन, स्थानिक नागरिक व वाहनचालक यांच्यात समन्वय साधणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!