इमेज
  घरकुल लाभार्थ्यांची थट्टा थांबवा, अन्यथा आंदोलन; महादेव गंगणे पाटील यांचा परळी पालिकेला इशारा परळी वैजनाथ (प्रतिनिधी) रमाई घरकुल योजनेंतर्गत १५४ लाभार्थ्यांना १ कोटी १ लाख ८१ हजार २५० रुपयांचा निधी वर्ग केल्याच्या बातम्या प्रसिद्ध करून स्वतःची पाठ थोपवून घेणाऱ्या परळी नगर परिषदेचा फुगा फुटला आहे. प्रत्यक्षात एकाही लाभार्थ्याला रुपया देखील मिळाला नसून, नगर परिषदेने केवळ कागदी घोडे नाचवले असल्याचा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष महादेव गंगणे पाटील यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी प्रशासनाला तीव्र जाब विचारला आहे. प्रसिद्धीचा स्टंट, प्रत्यक्षात लाभार्थी वंचित महादेव गंगणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे नगर परिषदेच्या कारभारावर तीव्र आक्षेप घेतला आहे. नगर परिषदेने काही दिवसांपूर्वी रमाई आवास योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणावर निधी वाटप केल्याचा दावा प्रसिद्धी माध्यमांद्वारे केला होता. मात्र, प्रत्यक्षात जेव्हा लाभार्थ्यांनी त्यांच्या बँक खात्यांची तपासणी केली, तेव्हा त्यांच्या हाती निराशाच आली. अनेक गरीब आणि गरजू लाभार्थी अद्यापही पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्यापासून वंचित आहे...

समतोल: उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर यांनी यशस्वी हाताळला प्रश्न !

परळीतील उड्डाणपूल दुरुस्तीची कामे आणि वाहतूक व्यवस्थापनाचा साधला समतोल – प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

परळी वैजनाथ – परळीतील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपुलाच्या दुरुस्तीची कामे सुरू होणार असुन, ही कामे सुरू असतानाही पंढरपूरच्या आषाढी वारीला जाणाऱ्या दिंड्या येउन जाईपर्यंत वाहतूक सुरु ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.  उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर यांनी यशस्वी प्रश्न हाताळला.पार  पडलेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीत या कामांबाबतचा कार्य आराखडा तयार करण्यात आला असुन, आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी घेण्याचे ठरवण्यात आले आहे.

वाहतूक सुरु ठेवण्यावर भर...

परळीतील हा उड्डाणपूल म्हणजेच शहरात येण्यासाठीचा मुख्य प्रवेशद्वार आहे. शहरातील आणि परराज्यातील अनेक भागांतील वाहतूक या पुलावरून होते. त्यामुळे पुलाच्या दुरुस्तीच्या कामांदरम्यान वाहतूक पूर्णपणे बंद ठेवणे शक्य नसल्याने, कामे ही मध्यरात्रीच्या सुमारास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिणामी, दिवसाच्या वेळात सामान्य वाहनचालकांना फारसा त्रास होणार नाही.

जड वाहतुकीसाठी बायपास मार्ग

दुरुस्तीच्या कामादरम्यान जड वाहनांना तात्पुरत्या स्वरुपात बायपास मार्गावर वळविण्यात येणार आहे. यामुळे पुलावरचा भार काहीसा कमी होईल आणि दुरुस्तीची कामे अधिक सुरक्षितपणे पार पडू शकतील.

जनभावनेचा आदर

नागरिकांकडून ‘वाहतूक पूर्णपणे बंद करू नये’ अशी मागणी करण्यात येत होती. ही जनभावना लक्षात घेऊन प्रशासनाने मध्यममार्ग स्वीकारत दुरुस्तीची कामे रात्रीच्या वेळात करण्याचा मार्ग निवडला आहे. यामुळे वाहतूक सुरळीत राहणार असून, पुलाचे देखभाल व मजबुतीकरणही वेळेत पूर्ण होणार आहे.

उड्डाणपूल दुरुस्तीचे महत्त्व

हा उड्डाणपूल अनेक वर्षांपासून वापरात असून, काही ठिकाणी तांत्रिक दोष, गंज व थरांचे नुकसान झाले आहे. भविष्यात कोणताही अपघात होऊ नये यासाठी आणि पुलाचा कालावधी वाढवण्यासाठी ही दुरुस्ती अत्यंत आवश्यक आहे. कामांनंतर पुलाची स्थिती अधिक सुरक्षित व स्थिर होणार असून, वाहनचालकांसाठीही तो निर्धोक होणार आहे.

प्रशासनाची भूमिका

प्रशासनाने या कामांची वेळ, मार्गावरील बदल, वाहतूक पोलिसांची तैनाती, तसेच कामांबाबत जनजागृती यांसाठी नियोजनबद्ध कृती आराखडा तयार केला आहे. स्थानिक नागरिक, व्यापारी, वारीसाठी येणाऱ्या दिंड्या यांना त्रास कमी व्हावा यासाठी विशेष उपाययोजना केल्या जाणार आहेत.

थोडक्यात :

  • उड्डाणपूल दुरुस्तीचे काम मध्यरात्री सुरू होणार
  • दिवसाची वाहतूक सुरु ठेवण्यात येणार
  • जड वाहतूक बायपासवर वळविण्यात येणार
  • आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर विशेष दक्षता
  • नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन निर्णय
  • तुर्तास हलके हलके काम करण्यात येणार आहेत. बेरिंगची कामे केली जाणार असुन दिंड्या येउन गेल्यावर  एक्सपेन्शन जाॅइंट चे काम केले जाणार आहे. याकाळात काही दिवस वाहतूक पुर्णत: बंद करावीच लागणार आहे. 

परळीतील विकासाच्या दृष्टीने आणि भविष्यातील धोके टाळण्यासाठी ही दुरुस्ती अत्यावश्यक आहे. या कामांदरम्यान प्रशासन, स्थानिक नागरिक व वाहनचालक यांच्यात समन्वय साधणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....