इमेज
बीड जिल्हयातुन 1599 प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतमध्ये निकाली बीड- आज दिनांक 9 मे 2026 रोजी बीड मुख्यालयात राष्ट्रीय लोकन्यायालयाचेउद्घाटन आनंद एल.यावलकर, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या हस्ते संपन्न झाले.   सदर उदघाटन कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश-1 व्ही.एच. पाटवदकर, जिल्हा न्यायाधीश-2 एस.आर.शिंदे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-2 आर.एम नेरलीकर मुख्य न्यायदंडाधिकारी पी.आर.शिंदे व इतर न्यायिक अधिकारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डाॅ.वहाब ए.सय्यद, बीड मुख्यालयातील सर्व न्यायिक अधिकारी, बीड जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष एस.जी.पिसुरे, उपाध्यक्ष आर.व्ही.देशमुख, सचिव सुभाष काळे तसेच त्यांचे सर्व पदाधिकारी, विधिज्ञ सदर उदघाटन कार्यक्रमास उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशावरूनआनंद एल. यावलकर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. 9 मे 2026 रोजी पार पडलेल्या लोक न्यायालयात बीड जिल्हयातुन एकूण. 1209 प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली आहेत. बीड...

अष्टांग योगाच्या आचरणाने जगात शाश्वत सुख व शांतता नांदते ! 

"वैद्यनाथ" मधील योगदिनी डॉ. नयनकुमार आचार्य यांचे विचार

    परळी वैजनाथ- (दि.२१) 

सद्य परिस्थितीत वाढत्या शारीरिक, मानसिक विकारांना दूर करण्यासाठी "योग" हा मौलिक उपाय असून अष्टांग योगाच्या आचरणाने जगात शाश्वत सुख व शांतता नांदू शकते, असे प्रतिपादन योग अभ्यासक डॉ. नयनकुमार आचार्य यांनी केले. 

          येथील वैद्यनाथ महाविद्यालयात काल (२१) आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित योगासन, प्राणायाम व ध्यान शिबिरात ते प्रमुख प्रशिक्षक म्हणून बोलत होते. राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना व क्रीडा विभागाच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या या शिबिराचे उद्घाटन प्र. प्राचार्य डॉ .जे.व्ही. जगतकर यांनी केले.

              या शिबिरात श्री आचार्य यांनी उपस्थितांना सूर्यनमस्कार, सर्वांगसुंदर व्यायाम, विविध आसने , भस्त्रिका, कपालभाती, अनुलोम-विलोम, भ्रामरी हे प्राणायाम व ध्यानमुद्रा आदींचे प्रशिक्षण दिले. तसेच योगाच्या यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी या आठ अंगांचे महत्त्व प्रतिपादन केले. यावर्षीच्या "एक पृथ्वी - एक आरोग्यासाठी योग" या संकल्पनेनुसार समग्र भूतळावरील प्रत्येक देशात निवास करणाऱ्या प्रत्येक मानवासाठी "योग" हा खुला असून योगाच्या आचरणाने सर्व प्रकारचे चिंता,नैराश्य, दुःख, वैरभावना लयास जातात. म्हणूनच विश्वकल्याणासाठी अष्टांग योग हे शाश्वत सुखाचे मुख्य द्वार आहे, असेही त्यांनी याप्रसंगी सांगितले. 

            यावेळी या शिबिरात उपप्राचार्य प्रा. डी. के. आंधळे, डॉ. व्ही.बी. गायकवाड, प्रा. हरीश मुंडे, प्रा.डा. पी. एल. कराड, प्रा.डा. माधव रोडे, कॅप्टन प्रा. जी.एस. चव्हाण, साई अकॅडमीचे संचालक प्रा.रमेश  पवार यांच्यासह जवळपास अडीचशे विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले.कार्यक्रमाचे  प्रास्ताविक व सूत्रसंचालन  उपप्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड यांनी केले, तर आभार प्रा.जी.एस.चव्हाण यांनी मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट