दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

जागृती नागरी सहकारी पतसंस्थेत रयतेचे राजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी

परळी (प्रतिनिधी):- 

     परळी वैजनाथ येथील जागृती नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयास लोककल्याणकारी रयतेचे राजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती मान्यवरांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली.


     कार्यक्रमाच्या प्रारंभी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री. मुंदडा सर तसेच जागृती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रा गंगाधर शेळके सर यांच्या हस्ते  छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर नेहमीच सामाजिक न्यायाची भूमिका घेणारे, सर्व समाज घटकांना सोबत घेऊन चालणारे, प्रजाहितदक्ष छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना जयंती निमित्ताने मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले. 

 

   याप्रसंगी बोलताना छत्रपती शाहू महाराजांनी जातीभेद निर्मूलनाच्या कामासोबत सर्व समाजांना न्याय देण्याचे काम काम केले. राजर्षी शाहू महाराज हे लोक कल्याणकारी प्रजाहितदक्ष असे आदर्श राजे होते. छत्रपती शाहू महाराजांनी नेहमीच सामाजिक न्यायाची भूमिका घेऊन समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचे कार्य केले असे प्रतिपादन  प्रा. शेळके सर यांनी केले.

        यावेळी जागृती पतसंस्थेचे ऑडिटर श्री. मुंदडा सर, जागृती पतसंस्थेचे प्रशासकीय अधिकारी हेमंत कुलकर्णी, कार्यालयीन कर्मचारी सुरज काळे, अश्वमेध गिरी, राजेश मगर, बोर्डे, गणेश सावजी मारुती बोबडे, शेख गफार आदींची उपस्थिती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....