कल्याणी....!!!. ...... पहा: सर्व काही वरील... पंकजाताई चा संपूर्ण पॉडकास्ट

इमेज
"राजकारणाने मला निवडले; बाबांचे जाणे आयुष्याला कलाटणी देणारे ठरले" - पंकजाताई मुंडे  "मला कधीच राजकारणात यायचे नव्हते. माझी स्वतःची वेगळी स्वप्ने होती. बाबा असताना परिस्थिती अशी आली की एका दिवसांत सगळं बदललं आणि मी राजकारणात आले. मात्र ३ जून २०१४ रोजी घडलेल्या एका घटनेने माझे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले. परिस्थिती अशी निर्माण झाली की, मी राजकारण निवडले नाही तर राजकारणानेच मला निवडले," अशी भावनिक प्रतिक्रिया भाजप नेत्या पंकजाते मुंडे यांनी एका विशेष मुलाखतीत व्यक्त केली.    दिवंगत नेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या आठवणींना उजाळा देताना पंकजाताई मुंडे यांनी त्यांच्या निधनानंतरच्या संघर्षाचा, राजकारणातील प्रवासाचा आणि वडिलांकडून मिळालेल्या संस्कारांचा भावनिक प्रवास उलगडला. पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, ३ जून २०१४ हा दिवस त्यांच्या कुटुंबासाठीच नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणासाठीही अत्यंत धक्कादायक ठरला. "त्या दिवशी बाबांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. घरात आनंदाचे वातावरण होते. आईने कार्यक्रमासाठी पैठणी तयार ठेवली होती, मीदेखील नवीन पोशाख काढून ...

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कार्यक्रम

एकल प्लास्टिकमुक्त मंत्रालय: सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी सहभाग घ्यावा — पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

मंत्रालयातील सर्व अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना कापडी पिशव्यांचे वाटप


📍 मंत्रालय, मुंबई | दिनांक: ५ जून २०२५

जागतिक पर्यावरण दिन २०२५ च्या निमित्ताने आज मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये मंत्रालयातील विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. या कार्यक्रमाला पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.


कार्यक्रमात बोलताना मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या,“एक दिवसापुरतं नव्हे, तर सातत्याने पर्यावरणपूरक निर्णय घेणे हीच काळाची गरज आहे. मंत्रालय एकल प्लास्टिकमुक्त व्हावे ही केवळ घोषणाच नव्हे, तर प्रत्येक कर्मचाऱ्याचा सहभाग असलेली जबाबदारी आहे. आपण सर्वांनी मिळून यामध्ये योगदान दिले, तर हे उद्दिष्ट नक्कीच साध्य होईल.”


यावेळी मंत्रालयातील सर्व अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले आणि एकल प्लास्टिकच्या वापराच्या विरोधात संकल्प घेण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे शासकीय यंत्रणांमध्ये पर्यावरण संवर्धनाची संस्कृती निर्माण करणे.


कार्यक्रमाला राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, पर्यावरण विभागाच्या सचिव जयश्री भोज, पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव एन. रामस्वामी, अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंगल यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.


कार्यक्रमाच्या समाप्तीनंतर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांचे पर्यावरणासाठी सुरू असलेले उपक्रम जाणून घेतले व त्यांचे कौतुक केले.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या