कल्याणी....!!!. ...... पहा: सर्व काही वरील... पंकजाताई चा संपूर्ण पॉडकास्ट

इमेज
"राजकारणाने मला निवडले; बाबांचे जाणे आयुष्याला कलाटणी देणारे ठरले" - पंकजाताई मुंडे  "मला कधीच राजकारणात यायचे नव्हते. माझी स्वतःची वेगळी स्वप्ने होती. बाबा असताना परिस्थिती अशी आली की एका दिवसांत सगळं बदललं आणि मी राजकारणात आले. मात्र ३ जून २०१४ रोजी घडलेल्या एका घटनेने माझे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले. परिस्थिती अशी निर्माण झाली की, मी राजकारण निवडले नाही तर राजकारणानेच मला निवडले," अशी भावनिक प्रतिक्रिया भाजप नेत्या पंकजाते मुंडे यांनी एका विशेष मुलाखतीत व्यक्त केली.    दिवंगत नेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या आठवणींना उजाळा देताना पंकजाताई मुंडे यांनी त्यांच्या निधनानंतरच्या संघर्षाचा, राजकारणातील प्रवासाचा आणि वडिलांकडून मिळालेल्या संस्कारांचा भावनिक प्रवास उलगडला. पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, ३ जून २०१४ हा दिवस त्यांच्या कुटुंबासाठीच नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणासाठीही अत्यंत धक्कादायक ठरला. "त्या दिवशी बाबांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. घरात आनंदाचे वातावरण होते. आईने कार्यक्रमासाठी पैठणी तयार ठेवली होती, मीदेखील नवीन पोशाख काढून ...

जागतिक पर्यावरण दिन...

 'पर्यावरण संवर्धन हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य' - पंकजा मुंडे

पथनाट्य सादरीकरणातून जनजागृतीसह जागतिक पर्यावरण दिनानिमित्त गिरगाव चौपाटीत  राबवली स्वच्छता मोहीम 


मुंबई।प्रतिनिधी...

पंकजा मुंडे यांनी गिरगाव चौपाटीतील स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊन पर्यावरण संवर्धनाच्या महत्त्वावर भर दिला.  त्यांनी म्हटले की, "पर्यावरणाचे संरक्षण हे केवळ सरकारचे काम नाही, तर प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.  आपण सर्वांनी मिळून पर्यावरणाच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले पाहिजेत.त्यांनी नागरिकांना प्लास्टिकचा वापर टाळण्याचे, झाडे लावण्याचे आणि पाणी वाचवण्याचे आवाहन केले.  "आपण आपल्या दैनंदिन जीवनात छोटे बदल करून मोठा फरक निर्माण करू शकतो," असे त्यांनी सांगितले. 

मोहिमेतील प्रमुख उपक्रम


वृक्षारोपण आणि संवर्धन: मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.  यावेळी उपस्थितांना झाडे लावून त्यांचे संरक्षण करण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. 


जनजागृती कार्यक्रम: "झाडे लावा, प्लास्टिक टाळा, पाणी वाचवा, सौरऊर्जा वापरा, सायकल वापरा" या संदेशांच्या माध्यमातून पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले. 


पथनाट्य सादरीकरण: विविध संस्थांनी एकल वापराच्या प्लास्टिक बंदीबाबत पथनाट्य सादर करून जनजागृती केली.

 विद्यार्थ्यांचा सहभाग: विविध महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी घोषवाक्यांच्या माध्यमातून प्लास्टिकविरोधी जनजागृती केली आणि चौपाटी परिसरातील कचरा स्वच्छ केला. 

उपस्थित मान्यवर

      या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, सदस्य सचिव डॉ. अविनाश ढाकणे, विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी, महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.या मोहिमेच्या माध्यमातून मुंबईतील गिरगाव चौपाटी परिसर स्वच्छ ठेवण्याचे आणि पर्यावरणाच्या संवर्धनाचे महत्त्व नागरिकांना पटवून देण्यात आले. या मोहिमेत विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी, महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी आणि स्थानिक नागरिक सहभागी झाले होते. 




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या