कल्याणी....!!!. ...... पहा: सर्व काही वरील... पंकजाताई चा संपूर्ण पॉडकास्ट

इमेज
"राजकारणाने मला निवडले; बाबांचे जाणे आयुष्याला कलाटणी देणारे ठरले" - पंकजाताई मुंडे  "मला कधीच राजकारणात यायचे नव्हते. माझी स्वतःची वेगळी स्वप्ने होती. बाबा असताना परिस्थिती अशी आली की एका दिवसांत सगळं बदललं आणि मी राजकारणात आले. मात्र ३ जून २०१४ रोजी घडलेल्या एका घटनेने माझे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले. परिस्थिती अशी निर्माण झाली की, मी राजकारण निवडले नाही तर राजकारणानेच मला निवडले," अशी भावनिक प्रतिक्रिया भाजप नेत्या पंकजाते मुंडे यांनी एका विशेष मुलाखतीत व्यक्त केली.    दिवंगत नेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या आठवणींना उजाळा देताना पंकजाताई मुंडे यांनी त्यांच्या निधनानंतरच्या संघर्षाचा, राजकारणातील प्रवासाचा आणि वडिलांकडून मिळालेल्या संस्कारांचा भावनिक प्रवास उलगडला. पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, ३ जून २०१४ हा दिवस त्यांच्या कुटुंबासाठीच नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणासाठीही अत्यंत धक्कादायक ठरला. "त्या दिवशी बाबांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. घरात आनंदाचे वातावरण होते. आईने कार्यक्रमासाठी पैठणी तयार ठेवली होती, मीदेखील नवीन पोशाख काढून ...

नद्यांचे प्रदूषण थांबवण्यासाठी टास्क फोर्स स्थापन करणार – पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची घोषणा




 मुंबई | ५ जून २०२५

जागतिक पर्यावरण दिन २०२५ निमित्त भामला फाऊंडेशनच्या 'The Global Climate Change Campaign' या विशेष उपक्रमात पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी राज्यातील पर्यावरणीय संकटांवर उपाययोजना जाहीर केल्या.


मुंबईतील कार्यक्रमात बोलताना मुंडे म्हणाल्या, “राज्यातील ५५ नद्या प्रदूषित असून या स्थितीला रोखण्यासाठी एक विशेष टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार आहे. पर्यावरण, शहरी आणि ग्रामीण विकास विभाग या उपक्रमात एकत्र काम करणार आहेत.”


याचबरोबर, दूषित पाण्याच्या पुनर्वापरासाठी विस्तृत आराखडा तयार केला जाणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. “मुंबईतील IIT आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सहकार्याने राज्यात जलशुद्धीकरण आणि पुनर्वापर योजनांना गती दिली जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.


प्लास्टिकमुक्त महाराष्ट्रसाठीही त्यांनी एकल वापराच्या प्लास्टिकवर बंदी आणि जनजागृती मोहिमेची माहिती दिली. पुण्यात पायलट प्रोजेक्ट म्हणून कपड्याच्या पिशव्या उपलब्ध करून देणाऱ्या व्हेंडिंग मशीनची संकल्पना राबवली जात आहे.


या कार्यक्रमात अभिनेत्री मलायिका अरोरा, श्रेया घोषाल, इम्तियाज अली, भाजप आमदार राम कदम व भामला फाऊंडेशनचे अध्यक्ष आसिफ भामला आदींची उपस्थिती होती. मुंडेंच्या घोषणांमुळे राज्यात पर्यावरणीय धोरणांमध्ये नवे परिवर्तन अपेक्षित आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या