नद्यांचे प्रदूषण थांबवण्यासाठी टास्क फोर्स स्थापन करणार – पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची घोषणा




 मुंबई | ५ जून २०२५

जागतिक पर्यावरण दिन २०२५ निमित्त भामला फाऊंडेशनच्या 'The Global Climate Change Campaign' या विशेष उपक्रमात पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी राज्यातील पर्यावरणीय संकटांवर उपाययोजना जाहीर केल्या.


मुंबईतील कार्यक्रमात बोलताना मुंडे म्हणाल्या, “राज्यातील ५५ नद्या प्रदूषित असून या स्थितीला रोखण्यासाठी एक विशेष टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार आहे. पर्यावरण, शहरी आणि ग्रामीण विकास विभाग या उपक्रमात एकत्र काम करणार आहेत.”


याचबरोबर, दूषित पाण्याच्या पुनर्वापरासाठी विस्तृत आराखडा तयार केला जाणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. “मुंबईतील IIT आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सहकार्याने राज्यात जलशुद्धीकरण आणि पुनर्वापर योजनांना गती दिली जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.


प्लास्टिकमुक्त महाराष्ट्रसाठीही त्यांनी एकल वापराच्या प्लास्टिकवर बंदी आणि जनजागृती मोहिमेची माहिती दिली. पुण्यात पायलट प्रोजेक्ट म्हणून कपड्याच्या पिशव्या उपलब्ध करून देणाऱ्या व्हेंडिंग मशीनची संकल्पना राबवली जात आहे.


या कार्यक्रमात अभिनेत्री मलायिका अरोरा, श्रेया घोषाल, इम्तियाज अली, भाजप आमदार राम कदम व भामला फाऊंडेशनचे अध्यक्ष आसिफ भामला आदींची उपस्थिती होती. मुंडेंच्या घोषणांमुळे राज्यात पर्यावरणीय धोरणांमध्ये नवे परिवर्तन अपेक्षित आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार