इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

त्या बाळाच्या मृत्यूस जवाबदार कोण?

अखेर "त्या" दुर्दैवी बाळाने रुग्णालयातच घेतला  जगाचा निरोप




जिवंत असतांना मृत घोषित केलेल्या त्या दुर्दैवी बाळाने जन्माच्या चौथ्या दिवशीच घेतला अखेरचा श्वास

अंबाजोगाई (प्रतिनिधी):- 

 अंबाजोगाईच्या स्वा रा ती  रुग्णालयातील चार दिवसापूर्वी जन्मलेले ते बाळ सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरले आहे.कारण ८ जुलै रोजी जन्मलेले बाळ अवघ्या काही तासातच डॉक्टरांनी मृत घोषित करून ते कपड्यात बांधून नातेवाईकांच्या ताब्यात दिले होते. नातेवाईकानी देखील त्या बाळाचा अंत्यविधी आपल्या होळ या गावी करण्याच्यासाठी घेऊन गेले . अंत्यसंस्कारासाठी खड्डा खणत असतांना बाळाच्या आज्जीची त्याचे तोंड पाहण्याची इच्छा झाल्याने कपड्यात बांधलेले ते बाळ खोलून पाहिले असता त्याचा रडण्याचा आवाज ऐकू आला. तात्काळ बाळाच्या आजोबांनी बाळास परत अंबाजोगाई येथील स्वाराती येथे दाखल केले. डॉक्टरांनी त्या बाळास अतिदक्षता विभागात दाखल केले.उपचारादरम्यान आज त्या दुर्दैवी बाळाने अखेर जगाचा निरोप घेतला. या दुर्दैवी तथा दुःखद घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मात्र या बाळाच्या मृत्यूस जवाबदार कोण हा मोठा व निरुत्तरीत प्रश्न निर्माण झाला आहे. त्या बाळास व त्याच्या पालकास न्याय मिळेल का असा प्रश्न  देखील  नागरिकांतून विचारला जात आहे.

            होळ येथील बालिका घुगे या  महिलेच्या बाळाचा जन्म अवघ्या सातव्या महिन्यात झालेला असल्यामुळे अधिकच अशक्त असलेल्या बाळाने या अतिदक्षता विभागातील उपचारांना प्रतिसाद न देता अखेर काल ११ जुलै रात्री अखेरचा श्वास घेत या जगाचा निरोप घेतला. या बाळाच्या जन्माने व निधनाने स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रसुती शास्त्र विभाग व बाल रोग विभागावर प्रश्न चिन्ह निर्माण करून ठेवले आहे. जिवंत असलेल्या बाळास मृत घोषित करणा-या डॉक्टरांचा तपास लागण्यापूर्वीच या बाळाने अखेरचा श्वास घेतला असल्यामुळे आता नेमका या बाळाचा मृत्यू कशामुळे झाला आहे हा ही प्रश्न निर्माण केला आहे?


चौकशी समितीच्या अहवाल केंव्हा येणार?

      अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्री रोग व प्रसुती शास्त्र विभागाच्या बाल रोग विभागाच्या अंतररुग्ण कक्ष विभागात घडलेल्या या लांच्छनास्पद घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. जिवंत असलेल्या बालकास मृत घोषित करणा-या डॉक्टरांच्या हलगर्जीपणाची चौकशी करण्यासाठी तत्कालीन अधिष्ठाता डॉ. राजेश कचरे यांनी तातडीने पाच सदस्यीय समिती नियुक्त करून स्त्री रोग विभागाचे प्रमुख यांचे कडून या संपूर्ण घटनेचा मागितलेला लेखी अहवाल अजून तरी आला नसून येणार तो अहवाल नेमका कोणाच्या बाजूने येणार का डॉक्टर बांधवाना पाठीशी घालणार याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

-----------------------------------------------

Click:● सदगुरुंच्या दर्शनासाठी येवती (लघु आळंदी) येथे भाविकांची गर्दी


Click:■ _गोपाळपूर येथे सद्गुरु श्रीचातुर्मास्ये महाराज परंपरेनुसार दहीहंडी सोहळ्याने आषाढी वारीची सांगता_












टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या