परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

आखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या कार्यक्रमात स्वामी विवेकानंदांच्या विचारांचे स्मरण

परळी वैजनाथ(प्रतिनिधी) : आखिल भारतीय ग्राहक पंचायत परळीच्या वतीने आयोजित विशेष कार्यक्रमात स्वामी विवेकानंद यांच्या जीवनदृष्टीचा नव्या पिढीसाठी आदर्श म्हणून जागर करण्यात आला. या कार्यक्रमात स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा सामाजिक जीवनात कसा उपयोग करता येतो, यावर सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायत च्या अध्यक्षा चित्रा देशपांडे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी डॉ पारगावकर यांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायत, परळी शाखेला विवेकानंदांचा फोटो भेट म्हणून दिला. यावेळी ग्राहक पंचायत च्या संघटन मंत्री विजया दहीवाळ, सामाजिक कार्यकर्त्या सौ. विदया  खिस्ते, उपाध्यक्ष सौ सुनिता बोडखे यांची उपस्थिती होती.तसेच डाॅ. किरण पारगावकर यांचा प्रवेश पण आजच झाला.

स्वामी विवेकानंदांनी दिलेली प्रेरणा म्हणजे देशासाठी कार्यरत राहण्याची शिकवण आहे. त्यांच्या विचारांनी युवकांनी स्वतःचा आत्मविश्वास वाढवून सामाजिक कार्यात सहभागी होणे गरजेचे असल्याचे वक्त्यांनी सांगितले. ग्राहक पंचायत ही संघटनेची भूमिका केवळ ग्राहकहितासाठी मर्यादित न राहता सामाजिक परिवर्तनाच्या दिशेनेही महत्त्वाची आहे, असे मत यावेळी मांडण्यात आले.


या कार्यक्रमात ग्राहक पंचायत परळीच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून विवेकानंदांच्या विचारांवर भाष्य केले. कार्यक्रमाचे संयोजन परळी शाखेचे प्रमुख यांनी केले. कार्यक्रमात अनेक युवक, विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!