दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

रस्त्यावर कोंबड्यांचा बळी देणे आले अंगलट !

देवीच्या मिरवणुकीत अघोरी  प्रकार; परळी शहरात जादूटोणा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल


परळी (प्रतिनिधी) | 

      परळी शहरात देवीच्या मिरवणुकीदरम्यान  आघोरी विधी करीत कोंबड्याचा बळी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी परळी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार माजी नगराध्यक्ष व आयोजक दिपक देशमुख (रा. गणेशपार, परळी वै.) यांच्यावर भारतीय न्याय संहिता 2023 (BNS) चे कलम 325 आणि महाराष्ट्र जादूटोणा कायदा 2013 चे कलम 3(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, दिनांक 4 जुलै 2025 रोजी, परळी शहरात सप्तश्रृंगी देवीच्या मूर्तीस्थापनेनिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. दुपारी 12.30 ते 1 च्या सुमारास, राणी लक्ष्मीबाई टॉवर परिसरात या मिरवणुकीमध्ये रस्त्याच्या मधोमध कोंबडा कापून बळी दिला, तसेच हळद, कुंकू, लिंबू व नागवेलीची पाने टाकून अघोरी विधी केला, असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.हा प्रकार समाजात भीती आणि अंधश्रद्धा पसरवणारा असुन, त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे, असे फिर्यादीत नमूद आहे. ही तक्रार बालाजी रानबा ढगे (वय 41, रा. रामनगर, परळी वै.) यांनी दिली असून ते अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. त्यांच्या सोबत अंनिसचे सुकेशनी नाईकवाडे, विकास वाघमारे, प्रा. दासु वाघमारे आणि रानबा गायकवाड हे देखील  उपस्थित होते. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी BNS 2023 कलम 325 – धार्मिक आस्थेच्या नावाखाली हिंसक, अमानुष व अघोरी कृती तसेच महाराष्ट्र नरबळी आणि जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम 2013, कलम 3(2) – बळी देणे व इतर अघोरी प्रथांवर बंदी  कायद्यांअंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.   

          या घटनेवर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. "अशा अघोरी प्रकारांमुळे समाजात अंधश्रद्धा वाढते आणि शोषणास खतपाणी मिळते. समाजाने सजग राहून याविरोधात उभं राहणं आवश्यक आहे," असे मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....