इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

अंबाजोगाई येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय


कॅन्सर विभाग पुर्ववत सुरु करा:आ. नमिता मुंदडा यांनी केली अधिवेशनात मागणी


अंबाजोगाई ( वसुदेव शिंदे )--

अंबाजोगाई येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात कॅन्सर विभाग पुर्ववत सुरु करण्यात यावा अशी मागणी आ. नमिता मुंदडा यांनी विधीमंडळाच्या अधिवेशनात केली आहे.

       राज्यातील विविध प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सध्या राज्य विधीमंडळाचे अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात राज्यातील प्रत्येक आमदार आपल्या मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न अधिवेशनात विधिमंडळ सभापतींच्या समोर मांडुन ते मार्गी लावण्याचा प्रयत्न करीत असतात.

अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय हे आशिया खंडातील एकमेव ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय आहे. या वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या माध्यमातून मराठवाड्यातील ग्रामीण भागातील रुग्णांना अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचा राज्य शासन सातत्याने प्रयत्न करीत असते. याच उद्देशाने या वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात या विभागातील कॅन्सर रोगाने ग्रस्त झालेले अनेक रुग्ण आढळून येत असल्यामुळे सुमारे पंचेवीस वर्षांपूर्वी या वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालय विभागात कोट्यवधी रुपये खर्चून स्वतंत्र कॅन्सर विभाग निर्माण करण्यात येवून या विभागात रोग निदान आणि उपचारांची सुरुवात करण्यात आली होती. मात्र हा विभाग कालांतराने पुरेसे तंत्रज्ञ आणि अनुभवी तज्ञ डॉक्टर मिळत नसल्याने बंद करण्यात आला.

सदरील विभाग बंद होवून ही आता पंचेवीस वर्षांचा कालावधी उलटून गेला असतांनाच या विभागाच्या आ. नमिता मुंदडा यांनी विधीमंडळाच्या अधिवेशनात मा. सभापती महोदयांसमोर बोलताना या विभागात अजून ही मोठ्या प्रमाणावर कॅन्सर चे रुग्ण आढळून येत असून या रुग्णांना आर्थिक परिस्थिती नसतांनाही संभाजी नगर अथवा मुंबई येथील टाटा मेमोरियल हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी जावे लागते असे सांगत या रुग्णांची हेळसांड थांबवण्यासाठी अंबाजोगाई येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालय विभागात पुन्हा नव्याने कॅन्सर विभाग सुरु करण्यात यावा अशी मागणी केली आहे. 

राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनात आमदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांच्या वेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री व संबंधित खात्याचे मंत्री उपस्थित असल्यामुळे या प्रश्नावर तातडीने उपाययोजना करण्यात येते. या आ. नमिता मुंदडा यांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नांवर संबंधित मंत्री काय निर्णय घेतात याकडे मतदार संघातील नागरीकांचे लक्ष लागून राहिले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या