इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS:धार्मिक वृत्त / अमोल जोशी....

सदगुरुंच्या दर्शनासाठी येवती (लघु आळंदी) येथे भाविकांची गर्दी

हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

   धार्मिक वृत्त / अमोल जोशी

नांदेड ः गुरुपौर्णिमेच्या निमित्त गुरुवारी (दि. 10) येवती (लघु आळंदी)ता. मुखेड) येथे श्री प.पू.सद्गुरु नराश्याम महाराज यांच्या दर्शनासाठी व गुरुमंत्र घेण्यासाठी भाविकांचा सागर लोटला होता. यावेळी महाप्रसादाचा लाभ शेकडो भाविकांनी घेतला.



दरवर्षी गुरु पौर्णिमेच्या दिवशी लघु आळंदी म्हणून ख्यातकिर्त असलेल्या  येवती येथे श्री प.पू.सद्गुरु नराश्याम महाराज यांचे दर्शन व आशीर्वाद घेण्यासाठी मराठवाडा व कर्नाटकाच्या सीमावर्ती भागातून भाविक मोठ्या संख्येने येत असतात. यावेळी इच्छुक भाविकांना गुरुमंत्र देऊन दीक्षा दिली जाते. त्यासाठी भाविक लांबवरुन प्रवास करुन येत असतात.


मठ परिसरात अलीकडे चांगल्या पैकी भौतिक सुविधा झाल्याने भाविकांची सोय झाली आहे. यावर्षी सुद्धा गुरुवारी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यानिमित्त  पांडुरंग गोविंदराव यन्नावार पाळेकर, रा. देगलूर व भास्कर पाटील शिरूरकर यांच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा लाभ शेकडो भाविकांनी घेतला. श्री.प.पू सद्गुरु नराश्याम महाराज यांनी सर्वांना दर्शन देत आशीर्वाद दिला व इच्छुक भविकांना गुरुमंत्र दिला. असंख्य तरुण भाविकांनी व्यवस्था अबाधित ठेवत भाविकांना त्रास होणार नाही, याची खबरदारी घेतली.गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

Click:■ _गोपाळपूर येथे सद्गुरु श्रीचातुर्मास्ये महाराज परंपरेनुसार दहीहंडी सोहळ्याने आषाढी वारीची सांगता_











टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या