दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

बीड जिल्ह्यात मोठी उपलब्धी.....

ना.पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश – बीड जिल्ह्यातील दोन मोठ्या कामांना मंत्रिमंडळाची मंजुरी



सिंदफणा नदीवरील तीन बंधाऱ्यांचा होणार विस्तार व बॅरेजमध्ये रुपांतर ; आष्टीत नवीन दिवाणी न्यायालय स्थापनेचाही मार्ग मोकळा

मुंबई ।दिनांक २६। 

बीड जिल्ह्यासाठी आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असुन राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जलसंपदा व विधी विभागांतर्गत बीडसाठी दोन मोठ्या निर्णयांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये सिंदफणा नदीवरील तीन बंधाऱ्यांचा विस्तार व बॅरेजमध्ये रुपांतर होणार आहे.तर आष्टी येथे नवीन दिवाणी न्यायालयाची स्थापना होणार आहे.


     सिंदफणा नदीवरील तीन बंधाऱ्यांचा विस्तार व बॅरेजमध्ये रुपांतर याबाबतच्या जलसंपदा विभागाच्या प्रस्तावाला मान्यता देत, बीड जिल्ह्यातील शिरूर (कासार) तालुक्यातील निमगाव व ब्रम्हनाथ येळंब आणि गेवराई तालुक्यातील टाकळगाव (हिंगणी) येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचा विस्तार करण्यास तसेच त्यांचे बॅरेजमध्ये रुपांतर करण्याचा निर्णय मंत्रीमंडळ घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे पाणीसाठवण क्षमता वाढून शेतीसाठी पाणी उपलब्ध होणार असून, स्थानिक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच 

आष्टी येथे नवीन दिवाणी न्यायालयाची स्थापना याबाबत विधी व न्याय विभागाच्या प्रस्तावासही मान्यता देण्यात आली आहे. जिल्ह्यातील आष्टी येथे दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) यांचे नवीन न्यायालय स्थापन करण्यात येणार आहे. या न्यायालयासाठी आवश्यक न्यायिक अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या पदांची निर्मिती तसेच त्यासंबंधित खर्चासही मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे आष्टी व परिसरातील नागरिकांना न्यायासाठी जिल्हा मुख्यालयावर जाण्याची गरज भासणार नाही. ना.पंकजाताई मुंडे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे मंत्रीमंडळात हे दोन मोठे निर्णय झाल्याने जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....