मोठ्या संख्येने उपस्थित रहा....

इमेज
द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल व पूजा प्राथमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आज आयोजन परळी वैजनाथ | प्रतिनिधी द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल व पूजा प्राथमिक विद्यालय, परळी वैजनाथ यांच्या वतीने २० वे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. हे स्नेहसंमेलन आज  बुधवार, दि. ५ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता लोकनेते गोपीनाथराव मुंडे  नटराज रंग मंदिर, परळी वैजनाथ येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामलिंग राजनळे सर (माजी मुख्याध्यापक, वैद्यनाथ विद्यालय) राहणार असून उद्घाटन  गणेश गिरी (गटशिक्षणाधिकारी, गटसाधन केंद्र, परळी वै.) यांच्या हस्ते होणार आहे. या काकार्यक्रमास बाजीराव  भैय्या   धर्माधिकारी (माजी नगराध्यक्ष),  कोकणे  (विस्ताराधिकारी),  धनंजय ढोणे  (पोलीस निरीक्षक),  दिवाकर जोशी (गझलकार), प्रा. रविंद्र जोशी सर (पत्रकार,  दैनिक पुढारी),  व्यंकटेश शिंदे (नगरसेवक) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.           स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांचे नृत...

बीड जिल्ह्यात मोठी उपलब्धी.....

ना.पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश – बीड जिल्ह्यातील दोन मोठ्या कामांना मंत्रिमंडळाची मंजुरी



सिंदफणा नदीवरील तीन बंधाऱ्यांचा होणार विस्तार व बॅरेजमध्ये रुपांतर ; आष्टीत नवीन दिवाणी न्यायालय स्थापनेचाही मार्ग मोकळा

मुंबई ।दिनांक २६। 

बीड जिल्ह्यासाठी आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असुन राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जलसंपदा व विधी विभागांतर्गत बीडसाठी दोन मोठ्या निर्णयांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये सिंदफणा नदीवरील तीन बंधाऱ्यांचा विस्तार व बॅरेजमध्ये रुपांतर होणार आहे.तर आष्टी येथे नवीन दिवाणी न्यायालयाची स्थापना होणार आहे.


     सिंदफणा नदीवरील तीन बंधाऱ्यांचा विस्तार व बॅरेजमध्ये रुपांतर याबाबतच्या जलसंपदा विभागाच्या प्रस्तावाला मान्यता देत, बीड जिल्ह्यातील शिरूर (कासार) तालुक्यातील निमगाव व ब्रम्हनाथ येळंब आणि गेवराई तालुक्यातील टाकळगाव (हिंगणी) येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचा विस्तार करण्यास तसेच त्यांचे बॅरेजमध्ये रुपांतर करण्याचा निर्णय मंत्रीमंडळ घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे पाणीसाठवण क्षमता वाढून शेतीसाठी पाणी उपलब्ध होणार असून, स्थानिक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच 

आष्टी येथे नवीन दिवाणी न्यायालयाची स्थापना याबाबत विधी व न्याय विभागाच्या प्रस्तावासही मान्यता देण्यात आली आहे. जिल्ह्यातील आष्टी येथे दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) यांचे नवीन न्यायालय स्थापन करण्यात येणार आहे. या न्यायालयासाठी आवश्यक न्यायिक अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या पदांची निर्मिती तसेच त्यासंबंधित खर्चासही मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे आष्टी व परिसरातील नागरिकांना न्यायासाठी जिल्हा मुख्यालयावर जाण्याची गरज भासणार नाही. ना.पंकजाताई मुंडे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे मंत्रीमंडळात हे दोन मोठे निर्णय झाल्याने जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....