परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

श्रावणी वेदसप्ताह......परळी वैजनाथ.

 विवेक जागृतीशिवाय दुःखमुक्ती व आनंदप्राप्ती शक्य नाही !



श्रावणी वेदसप्ताहात आचार्य पं. चंद्रदेवजींचे विचार

परळी- वैजनाथ,दि.६- 

      आजकाल माणूस भौतिक साधने व सुख- सुविधांमध्ये गुरफटत चालला आहे. अविवेक व अनिष्ट विचारांमुळे वाढत चाललेली त्याची बहिर्मुख वृत्ती ही त्याला शाश्वत सुख व आनंदापासून वंचित ठेवत आहे. याकरिता आत्मज्ञानाच्या माध्यमातून विवेक जागृत होणे गरजेचे आहे. त्याशिवाय दुःखमुक्ती आणि आनंदप्राप्ती होऊ शकत नाही, असे विचार प्रसिद्ध वैदिक विद्वान आचार्य पं. चंद्रदेव जी शास्त्री यांनी मांडले. 

              महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभेच्या वतीने येथील आर्य समाजात सुरू असलेल्या श्रावणी वेदज्ञान प्रचार सप्ताहात ते प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते. गेल्या ३ तारखेपासून त्यांची आध्यात्मिक सामाजिक धार्मिक व राष्ट्रीय विषयांवर प्रवचने होत आहेत. 

       कालच्या सायंकालीन सत्रात त्यांनी "सुखी जीवनासाठी अध्यात्मज्ञान!"या विषयावर आपले मौलिक विचार मांडले. ते म्हणाले - परमेश्वराची अमृतवाणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वेदांचे तत्वज्ञान  जगातील प्रत्येक मानवासाठी अतिशय उपयुक्त आहे. वैदिक ज्ञानाच्या आश्रय घेतल्याने सर्व प्रकारची दुःखे नाहीशी होतात.  वेदात प्रतिपादित विचार आणि निसर्गाचे नियम  सर्वांसाठी एकसारखेच आहेत. या ज्ञानाला अध्यात्म व विज्ञान या दोन्हींचा आधार आहे. म्हणूनच वैश्विक स्तरावरील सर्व प्रकारच्या समस्या दूर करण्यासाठी वैदिक ज्ञान हे सद्यस्थितीत फारच प्रासंगिक ठरते. 

    तत्पूर्वी भजनगायक पं. राजेश आर्य यांनी "सुखी व समृद्ध कुटुंब" या विषयावर विचार मांडले.  घरातील आई- वडील व  थोरां - मोठ्यांचा आदर सत्कार केल्याने आणि त्यांच्याशी आत्मीयतेने वागल्याने परस्परातील प्रेम वाढत जाते. त्यामुळे घर हे स्वर्गासमान बनते. अशा संस्कारशील कुटुंबातूनच आदर्श संतती जन्माला येते. त्यांद्वारे सामाजिक व राष्ट्रीय कल्याण साधले जाते,असे ते म्हणाले.   

   दरम्यान दररोज सकाळी पं. वीरेंद्र शास्त्री यांच्या पौरोहित्याखाली वैदिक यज्ञ संपन्न होतो. यात सहभागी यजमान मोठ्या श्रद्धेने आहुत्या प्रदान करतात. त्यानंतर अध्यात्मिक विषयावर भजन संगीत व प्रवचने  होत आहेत . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे प्रधान श्री जुगल किशोर लोहिया मंत्री उग्रसेन राठौर, कोषाध्यक्ष देविदासराव कावरे, लक्ष्मण आर्य गुरुजी, रंगनाथ तिवार, जयपाल लाहोटी व इतर कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. या कार्यक्रमाची सांगता शनिवारी होणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!