इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

श्रावणी वेदसप्ताह......परळी वैजनाथ.

 विवेक जागृतीशिवाय दुःखमुक्ती व आनंदप्राप्ती शक्य नाही !



श्रावणी वेदसप्ताहात आचार्य पं. चंद्रदेवजींचे विचार

परळी- वैजनाथ,दि.६- 

      आजकाल माणूस भौतिक साधने व सुख- सुविधांमध्ये गुरफटत चालला आहे. अविवेक व अनिष्ट विचारांमुळे वाढत चाललेली त्याची बहिर्मुख वृत्ती ही त्याला शाश्वत सुख व आनंदापासून वंचित ठेवत आहे. याकरिता आत्मज्ञानाच्या माध्यमातून विवेक जागृत होणे गरजेचे आहे. त्याशिवाय दुःखमुक्ती आणि आनंदप्राप्ती होऊ शकत नाही, असे विचार प्रसिद्ध वैदिक विद्वान आचार्य पं. चंद्रदेव जी शास्त्री यांनी मांडले. 

              महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभेच्या वतीने येथील आर्य समाजात सुरू असलेल्या श्रावणी वेदज्ञान प्रचार सप्ताहात ते प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते. गेल्या ३ तारखेपासून त्यांची आध्यात्मिक सामाजिक धार्मिक व राष्ट्रीय विषयांवर प्रवचने होत आहेत. 

       कालच्या सायंकालीन सत्रात त्यांनी "सुखी जीवनासाठी अध्यात्मज्ञान!"या विषयावर आपले मौलिक विचार मांडले. ते म्हणाले - परमेश्वराची अमृतवाणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वेदांचे तत्वज्ञान  जगातील प्रत्येक मानवासाठी अतिशय उपयुक्त आहे. वैदिक ज्ञानाच्या आश्रय घेतल्याने सर्व प्रकारची दुःखे नाहीशी होतात.  वेदात प्रतिपादित विचार आणि निसर्गाचे नियम  सर्वांसाठी एकसारखेच आहेत. या ज्ञानाला अध्यात्म व विज्ञान या दोन्हींचा आधार आहे. म्हणूनच वैश्विक स्तरावरील सर्व प्रकारच्या समस्या दूर करण्यासाठी वैदिक ज्ञान हे सद्यस्थितीत फारच प्रासंगिक ठरते. 

    तत्पूर्वी भजनगायक पं. राजेश आर्य यांनी "सुखी व समृद्ध कुटुंब" या विषयावर विचार मांडले.  घरातील आई- वडील व  थोरां - मोठ्यांचा आदर सत्कार केल्याने आणि त्यांच्याशी आत्मीयतेने वागल्याने परस्परातील प्रेम वाढत जाते. त्यामुळे घर हे स्वर्गासमान बनते. अशा संस्कारशील कुटुंबातूनच आदर्श संतती जन्माला येते. त्यांद्वारे सामाजिक व राष्ट्रीय कल्याण साधले जाते,असे ते म्हणाले.   

   दरम्यान दररोज सकाळी पं. वीरेंद्र शास्त्री यांच्या पौरोहित्याखाली वैदिक यज्ञ संपन्न होतो. यात सहभागी यजमान मोठ्या श्रद्धेने आहुत्या प्रदान करतात. त्यानंतर अध्यात्मिक विषयावर भजन संगीत व प्रवचने  होत आहेत . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे प्रधान श्री जुगल किशोर लोहिया मंत्री उग्रसेन राठौर, कोषाध्यक्ष देविदासराव कावरे, लक्ष्मण आर्य गुरुजी, रंगनाथ तिवार, जयपाल लाहोटी व इतर कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. या कार्यक्रमाची सांगता शनिवारी होणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या