इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

मी माझ्या वडिलांची सुधारित आवृत्ती

 'इक आह भरी होगी, हमने न सुनी होगी, जाते जाते तुमने आवाज तो दी होगी'

लातुरात ना. पंकजा मुंडे यांनी  जागवलेल्या लोकनेते मुंडे साहेबांच्या आठवणीने वातावरण भारावले !

लातूर ।दिनांक ११।

'इक आह भरी होगी, हमने न सुनी होगी, जाते जाते तुमने आवाज तो दी होगी' अशा शब्दांत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांनी जागवलेल्या लोकनेते मुंडे साहेबांच्या आठवणीने वातावरण भारावून गेले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज लातूर येथे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण झाले.त्यावेळी बोलताना पंकजा मुंडे चांगल्याच भावूक झाल्या. 

      मी त्यांच्यावर मी एक डॉक्युमेंट्री बनवली होती. त्यावेळी काय ओळी म्हणाव्या ते मला सुचत नव्हते. 'इक आह भरी होगी, हमने न सुनी होगी, जाते जाते तुमने आवाज तो दी होगी,' असे म्हणताच त्यांना हुंदका दाटून आला.

     पंकजा मुंडे म्हणाल्या, आज माझे वडील तथा आपल्या सर्वाचे लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची कर्मभूमी असलेल्या लातूर येथील जिल्हा परिषदेच्या प्रांगणात त्यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित आहेत. कदाचित त्यांनीच या पुतळ्व्याचे उद्धाटन करावे, अशी गोपीनाथ मुंडेंचीच इच्छा असेल. आज काय बोलावे हे मला कळत नाही. ज्या दिवशी माझे वडील गेले त्यादिवशी आम्हाला जबर धक्का बसला होता, मी रुग्णालयात गेले तेव्हा दिल्लीत मला कुणीही ओळखीचे वाटत नव्हते. त्यावेळी देवेंद्र फडणवीस गोपीनाथ मुंडेच्या मृतदेहाजवळ उभे होते, दिल्लीत तेव्हा मला कुणीच ओळखत नव्हते.यावेळी मी त्यांना हाक मारत टाहो फोडला होता, मला नितीन गडकरी यांनी फोन करून नेमके काय घडले हे सांगितले, मी रुग्णालयात जाईपर्यत ते थांबतील अशी माझी भाबडी अपेक्षा होती. पण काही कामानिमित्त त्यांना जावे लागले, मला माझ्या वडिलांचा मृत्यू स्वीकारण्यासाठी खूप दिवस लागले असे त्या म्हणाल्या.

मुंडे साहेबांनी जिवंतपणीच मला वारस घोषित केले

    पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या, मुंडे साहेबांनी मला जिवंतपणी आपला वारस घोषित केले होते, हा वारसा संपत्ती, जमीन, पैसा यांच्या पलिकडला होता, माझे वडील माझे गुरू होते. त्यांनी मला काय करायचे हे कधीच शिकवले नाही 

पण काय करायचे नाही हे मात्र शिकवले. त्यांनी मला बेरजेचे राजकारण करण्याचा सल्ला दिला. तसेच स्वाभिमान गहाण न ठेवण्याचीही शिकवण दिली. ते म्हणायचे कुणी टाकलेले तुकडे उचलू नका. परिस्थितीपुढे कधीही झुकायचे नाही. राजकारणात काम करताना कुणाविषयीही द्वेष बाळगायचा नाही. नेहमी बेरजेचे राजकारण करायचे. तेच राजकारण आज फडणवीस तंतोतंत करत आहेत. म्हणून आज ते सत्तेत आहेत.


मी माझ्या वडिलांची सुधारित आवृत्ती

       पंकजा मुंडे यांनी यावेळी आपण आपल्या वडिलांची सुधारित आवृत्ती असल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या, अनेकजण माझी कार्यपद्धती मुंडेसाहेबांसारखी नसल्याचा आरोप करतात. ते खरे आहे. माझी कार्यपद्धती त्यांच्यासारखी नाही. पण त्यांना अपेक्षित अशीच आहे. तुला गोपीनाथ मुंडे व्हायचे आहे, पण सुधारित आवृत्ती वहायचे आहे असे मला मुंडे साहेबांनीच सांगितले होते. त्यामुळे मी कधीही स्वाभिमान गहाण न ठेवता राजकारण करण्याचे वचनत्यांना दिले, मी त्याच्याशी कधीही प्रतारणा करणार नाही असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या