जिल्ह्यात एकाच दिवशी ३० लाख वृक्षलागवड मोहीम.

 अंबाजोगाई व परळीत वनविभागाकडून २ लाख मिश्र उपवनाची लागवड

परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

           बीड जिल्ह्यात आज ७ ऑगस्ट रोजी हरित बीड अभियान राबवण्यात आले. त्यानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बीड येथे वृक्षारोपण करुन शुभारंभ करण्यात आला. तर आजच्याच दिवशी जिल्हाभरात तब्बल ३० लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठरवण्यात आले होते. या अनुषंगाने अंबाजोगाई व परळी येथे वन विभागाकडून जोरदार प्रतिसाद देत दोन लाख मिश्र उपवनांची लागवड करण्यात आली.

  परळी वैजनाथ वन विभागाअंतर्गत अंबाजोगाई व  परळी या ठिकाणी वन विभागाच्या वतीने 'हरित बीड' अभियानात हिरिरीने सक्रिय सहभाग घेत विविध ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात आली. यामध्ये मिश्र रोपवनांची लागवड करण्यात आलख.बीड जिल्ह्यात तीस लाख वृक्षाची लागवड करण्याच्या पहिल्या टप्प्यात परळी वनविभागाने अंबाजोगाई व परळी या ठिकाणी दोन लाख मिश्र रोपवन लागवड केली. वसंतनगर येथील वन विभागाच्या जंगलात वृक्ष लागवड अभियानाचा मान्यवरांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करून शुभारंभ करण्यात आला.यावेळी परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे,परळी वनक्षेत्र अधिकारी मनोहर पुंड यांच्या हस्ते उपवन लागवड करण्यात आली. यावेळी वसंत नगरचे सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, परळी वनपाल अनिल मालेवार, वनरक्षक बाळासाहेब नागरगोजे, वनकर्मचारी, पत्रकार आदी बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !