इमेज
‘या’ तारखेला जाहीर होणार बारावीचा निकाल महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी- मार्च २०२६ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी ( २ मे) ला जाहीर हाेणार आहे. निकालाच्या (Career) प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांची प्रतिक्षा आता संपणार असून शनिवारी दुपारी १ वाजता निकाल जाहीर केला जाणार आहे. यंदा १५ लाख ३२ हजार ४८७ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली हाेती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सुमारे २५ हजाराने वाढ झाली हाेती. राज्यातील ७ लाख ९९,७७३ विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेच्या परीक्षेसाठी नोंदणी केली असून ३ लाख ८० हजार ६८२ विद्यार्थ्यांनी कला शाखेच्या परीक्षेसाठी नोंदणी केली हाेती. तर वाणिज्य शाखेच्या परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ३ लाख २० हजार १५२ एवढी आहे. यंदा बारावीच्या परीक्षेसाठी ८ लाख २० हजार २२९ मुलांनी तर ७ लाख १२ हजार २४० मुलींनी नोंदणी करण्यात आली हाेती. त्याचप्रमाणे १८ ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांनी नोंदणी करण्यात आली हाेती.

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

परळी वैजनाथ: शेतघरातील मृत्यू प्रकरणात नवराच निघाला त्याला हत्यारा;परभणीतून केले अटक





 परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

    परळी तालुक्यातील डाबी येथे काल दिनांक 13 रोजी सकाळच्या सुमारास शेत घरामध्ये एका  गृहिणीचा रक्तरंजित मृतदेह आढळून आला होता. तिच्या मृतदेहावरील शस्त्राच्या घावांमुळे ही हत्याच असल्याचे निदर्शनास येत होते. मात्र याप्रकरणी कोणीही ठामपणे पुढे न आल्याने गुढ वाढले होते. आता या प्रकरणात मयतेच्या मुलाने फिर्याद दिली असुन यानुसार मयत महिलेचा नवराच हत्यारा असल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोपीला परभणी येथून पोलिसांनी अटकही केली आहे.

     याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, डाबी गावाजवळील आखाड्यावर असलेल्या शेतघरात मयत शोभा मुंडे या आपले पती तुकाराम मुंडे व मुलांसह राहत होत्या. मात्र पती-पत्नीमध्ये नेहमीच किरकिर्या व वाद होत असायचे. या अनुषंगाने यापूर्वीही या महिलेने आपल्या पतविरुद्ध पोलिसात धाव घेतलेली होती. त्यानंतर सामंजस्याने पती-पत्नीतील वाद नातेवाईकांनी मिटवले होते. त्यानंतर ते सुखाने संसार करत होते. मात्र गेल्या काही महिन्यांत त्यांच्यात पुन्हा वैमनस्य आले व पुन्हा पहिल्यासारखीच वादावादी सुरू झाले. या वादातूनच रागाच्या भरात आरोपी पती तुकाराम मुंडे याने धारदार सुरा पोटात खुपसुस खुपसुन  शोभा हिची हत्या केली आणि घरातून निघून गेला. पती गायब असल्याने प्रथमदर्शनी त्याने तिची हत्या केल्याचा कयास बांधला जात होता. या दृष्टीने पोलिसांनी तातडीने शोध घेतला व रात्री उशिरा आरोपीला परभणी येथून अटक केली आहे. याप्रकरणी मयत महिलेच्या मुलाने फिर्याद दाखल केली असुन अधिक तपास परळी ग्रामीण पोलीस करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....