दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

परळी वैद्यनाथ तालुक्यातील अतिवृष्टी व पुराने झालेल्या नुकसानीची धनंजय मुंडे यांनी केली पाहणी

 परळी मतदारसंघासह संपूर्ण बीड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी करणार - धनंजय मुंडे

परळी वैद्यनाथ तालुक्यातील अतिवृष्टी व पुराने झालेल्या नुकसानीची धनंजय मुंडे यांनी केली पाहणी


अनेक ठिकाणी पुराचे पाणी शेतात, नदीतील दगड गोट्यांचे पंचनामे कसे करणार?


स्थानिक आपत्ती मदत, सुरळीत वीज पुरवठा यांसह विविध कामे प्राधान्याने करण्याच्या स्थानिक प्रशासनास सूचना

परळी वैद्यनाथ तालुक्यातील अतिवृष्टी व पुराने झालेल्या नुकसानीची धनंजय मुंडे यांनी केली पाहणी


परळी वैद्यनाथ (दि. १६) - परळी वैद्यनाथ मतदारसंघासह बीड जिल्ह्यात सर्वदूर अतिवृष्टी व पावसाने मोठे नुकसान केले आहे. ५०% पेक्षा अधिक खरीप पिके पाण्याने नासून गेली आहेत. बहुतांश भागात शेतात गुडघाभर पाणी साचलेले आहे, तर अनेक ठिकाणी पुराचे पाणी शेतात शिरल्याने शेतात दगड गोट्यांचे खच साचले आहेत, अनेक गावांमध्येही पुराचे पाणी शिरून नुकसान झाले असून, घरांची पडझड, संसारोपयोगी साहित्याचे नुकसान, धान्याचे नुकसान, पशू धनाची हानी, ग्रामीण भागातील रस्ते - पुल तुटणे किंवा वाहून जाणे, संरक्षक भिंती खचने असे अनेक प्रकारचे नुकसान झाले असून, परळी सह संपूर्ण बीड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून, त्या निकषानुसार मदत जाहीर करावी, अशी मागणी आपण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा पवार यांच्या कडे पत्राद्वारे करणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. 


अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे परळी तालुक्यात झालेल्या नुकसानीची आज धनंजय मुंडे यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी तालुक्यातील वाण टाकळी, बोधेगाव, मोहा, कावळे वाडी, वंजारवाडी, गर्देवाडी इत्यादी गावांना भेटी देऊन शेती पिकांच्या तसेच अन्य नुकसानीची पाहणी केली. वाण टाकळी गावात नदीचे पाणी शिरल्याने प्रचंड नुकसान झाले असून, स्थानिक आपत्ती निवारण निधीतून संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले असल्यास त्या ठिकाणी तातडीची मदत करण्याच्या सूचना धनंजय मुंडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. 


काही ठिकाणी पुराचे पाणी शेतात शिरल्याने शेतात दगड गोटे तसेच रस्त्याचे डांबर वाहून आले आहे, अशा परिस्थितीत नेमका कसा पंचनामा करणार, असा प्रश्न मुंडेंनी उपस्थित केला.


दरम्यान नुकसान झालेले रस्ते, पुल इत्यादींच्या दुरुस्तीचे प्रस्ताव तातडीने दखल करण्याबाबत धनंजय मुंडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. 


दरम्यान या भागातील सोयाबीन, कापूस, तूर, मूग, ऊस यांसह पिकांचे मोठे नुकसान झाले असून, खरिपात शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आता ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करणार असल्याचे श्री मुंडे म्हणले. 


यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष वैजनाथ सोळंके, बालाजी (पिंटू) मुंडे, विष्णुपंत सोळंके, विष्णुपंत देशमुख, मोहन सोळंके, प्रदीप (बबलू) मुंडे, माऊली तात्या गडदे, माऊली मुंडे, भानुदास डीघोळे, ज्ञानोबा सलगर, अंगद मुंडे, राजाभाऊ हांगे, तुकाराम मुंडे, अभिमन्यु गडदे, अशोकराव दिघोळे, फुलचंद चाटे, बलभीम शेरकर, नमाजी गडदे त्याचबरोबर उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर, तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांसह तालुका कृषी अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता, महावितरणचे अभियंता यांसह मंडळ अधिकारी आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....