मोठ्या संख्येने उपस्थित रहा....

इमेज
द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल व पूजा प्राथमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आज आयोजन परळी वैजनाथ | प्रतिनिधी द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल व पूजा प्राथमिक विद्यालय, परळी वैजनाथ यांच्या वतीने २० वे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. हे स्नेहसंमेलन आज  बुधवार, दि. ५ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता लोकनेते गोपीनाथराव मुंडे  नटराज रंग मंदिर, परळी वैजनाथ येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामलिंग राजनळे सर (माजी मुख्याध्यापक, वैद्यनाथ विद्यालय) राहणार असून उद्घाटन  गणेश गिरी (गटशिक्षणाधिकारी, गटसाधन केंद्र, परळी वै.) यांच्या हस्ते होणार आहे. या काकार्यक्रमास बाजीराव  भैय्या   धर्माधिकारी (माजी नगराध्यक्ष),  कोकणे  (विस्ताराधिकारी),  धनंजय ढोणे  (पोलीस निरीक्षक),  दिवाकर जोशी (गझलकार), प्रा. रविंद्र जोशी सर (पत्रकार,  दैनिक पुढारी),  व्यंकटेश शिंदे (नगरसेवक) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.           स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांचे नृत...

ना. पंकजा मुंडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला नुकसानीचा आढावा

अतिवृष्टीमुळे बाधित झालेला एकही शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्या



ना. पंकजा मुंडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला नुकसानीचा आढावा

बीड।दिनांक२१।

जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे अथवा पुरांमुळे बाधित झालेला एकही शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी अशी सूचना राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांनी आज आढावा बैठकीत बोलतांना केली.

        जिल्हयात नुकत्याच झालेल्या नैसर्गिक आपत्ती व अतिवृष्टीत शेतकऱ्यांचे तसेच जिवीत व मालमत्तेचे मोठे नुकसान झाले, यासंदर्भात झालेले नुकसान व पंचनाम्याची सद्यस्थिती याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात ना. पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली आज आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी विवेक जाॅन्सन, जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहेमान तसेच सर्व उप विभागीय अधिकारी, तहसीलदार, कृषी अधिकारी यावेळी उपस्थित होते.

    ना. पंकजा मुंडे यांनी बैठकीत जिल्हा प्रशासनाकडून झालेल्या नुकसानीची संपूर्ण माहिती जाणून घेतली जिल्हाधिकारी विवेक जाॅन्सन यांनी जिल्ह्यात  १४ ते १६ सप्टेंबर या कालावधीत झालेल्या नुकसानीची सविस्तर माहिती सादर केली. त्यामध्ये शेती पिक नुकसान, मनुष्य मृत्यु जनावरे मृत्यु याबाबतचा तालुकानिहाय आढावा सादर केला.

मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहू नये

बैठकीत प्रशासनाला सूचना करताना ना. पंकजाताई म्हणाल्या, शेत पिक नुकसान पंचनामा करताना ज्या ठिकाणी अतिवृष्टी नाही, परंतू शेती पिकांचे नुकसान आहे त्या ठिकाणचे सविस्तर पंचनामा सर्व्हे करुन अहवाल शासनास सादर करावा, जमीन खरडून गेलेल्या क्षेत्राचे वस्तुनिष्ठ व अचूक पंचनामा करुन एकही बाधीत शेतकरी वंचित राहणार याची दक्षता घ्यावी,जनावरे मृत्यू झालेल्या प्रकरणी (वाहून गेलेल्या) त्यांचे इअर टॅगिंग क्रमांक किंवा खरेदी पावती किंवा दवाखान्यामध्ये नेलेली नोंद याचा वापर करुन मदत देण्याची कार्यवाही करावी, बुजलेल्या/पडलेल्या/खचलेल्या विहीरींचे पंचनामे करुन सविस्तर अहवाल शासनास सादर करावा.ज्या पुलांची उंची कमी आहे त्यांची उंची वाढविण्याचा प्रस्ताव व वाहून गेलेल्या पुलांची दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव सर्व्हे करुन शासनास आठ दिवसात सादर करावा असे आदेश त्यांनी दिले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....