इमेज
बीड जिल्हयातुन 1599 प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतमध्ये निकाली बीड- आज दिनांक 9 मे 2026 रोजी बीड मुख्यालयात राष्ट्रीय लोकन्यायालयाचेउद्घाटन आनंद एल.यावलकर, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या हस्ते संपन्न झाले.   सदर उदघाटन कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश-1 व्ही.एच. पाटवदकर, जिल्हा न्यायाधीश-2 एस.आर.शिंदे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-2 आर.एम नेरलीकर मुख्य न्यायदंडाधिकारी पी.आर.शिंदे व इतर न्यायिक अधिकारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डाॅ.वहाब ए.सय्यद, बीड मुख्यालयातील सर्व न्यायिक अधिकारी, बीड जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष एस.जी.पिसुरे, उपाध्यक्ष आर.व्ही.देशमुख, सचिव सुभाष काळे तसेच त्यांचे सर्व पदाधिकारी, विधिज्ञ सदर उदघाटन कार्यक्रमास उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशावरूनआनंद एल. यावलकर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. 9 मे 2026 रोजी पार पडलेल्या लोक न्यायालयात बीड जिल्हयातुन एकूण. 1209 प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली आहेत. बीड...

नवरात्रोत्सव विशेष: वैशिष्ट्यपूर्ण मंदिर...

नवरात्रोत्सव:अंबाबाई,रेणूकामाता व तुळजाभवानीचे इथे एकत्रित घडते दर्शन




 परळीजवळील तीन शक्तीपीठांचा अद्वितीय संगम असलेले मंदिर 

परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

       सध्या नवरात्रोत्सव सुरु असुन शक्तीची आराधना करत विविध देवींच्या मंदिरांमध्ये दर्शनाला मोठी गर्दी होत आहे. विविध भागात विविध देवींची ठिकाणे असतात त्यापद्धतीनेच त्या त्या ठिकाणची वेगवेगळी वैशिष्ट्ये बघायला मिळतात. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग वैद्यनाथाच्या पंचक्रोशीत पौराणिक व ऐतिहासिक महत्त्व असलेली विविध देवदेवतांची ठिकाणे आहेत. मात्र परळीजवळील एक देवी मंदिर हे वैशिष्ट्यपूर्ण आहे.हे मंदिर पुरातन नसले तरी याठिकाणी अंबाबाई,रेणूकामाता व तुळजाभवानी असे एकत्रित दर्शन घडते.तीन शक्तीपीठांचा अद्वितीय संगम असलेले एक मंदिर गोपीनाथगडावर आहे. त्रिमुर्ती शक्तीपीठांचा अनोखा धार्मिक संगम हे याठिकाणचे वैशिष्ट्य ठरले आहे.

             गोपीनाथगड हे ठिकाण परळीपासुन काही अंतरावरच आहे. दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे समाधीस्थळ गोपीनाथगड म्हणून नावारुपाला आलेले आहे.आज एक उर्जा,एक आस्था व एक प्रेरणाकेंद्र म्हणून गोपीनाथगडावर दररोज राज्यभरातील लोक दाखल होत असतात.दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीस्थळाच्या परिसरात एक दैवी व अध्यात्मिक अधिष्ठानही असावे या दृष्टिकोनातून पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी तीन प्रमुख शक्तीपीठांच्या देवींचं एकत्रित मंदिर निर्माण करण्यात आलेलं आहे.

वैशिष्ट्यपूर्ण ठिकाण:

       गोपीनाथगडाचा विस्तीर्ण परिसर १६ एकरमध्ये विकसित करण्यात आलेला आहे. हे ठिकाण आज एक परळी परिसरातील प्रमुख केंद्र बनलेले आहे. त्याचबरोबर एक अत्यंत अद्वितीय त्री शक्तीपीठ मंदिरही वैशिष्ट्यपूर्ण ठरत आहे. कोल्हापूरची अंबाबाई, माहूरची रेणुकादेवी आणि तुळजापूरची तुळजाभवानी या तीन शक्तीपीठांच्या देवींचं मंदिर एकत्रितपणे येथे आहे. तीन शक्तीपीठांचं एकाच ठिकाणी दर्शन मिळणं हे अनोखं आणि आकर्षक ठिकाण भक्तांसाठी एक विशेष महत्व अधोरेखित करीत आहे. यामुळे पर्यटक आणि भक्तांना एका ठिकाणी तीन शक्तीपीठांच्या महिमा आणि आशीर्वादाचा अनुभव घेता येत आहे.

         नवरात्रोत्सवाच्या काळात या मंदिरात परिसरातील भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत आहे.हे मंदिर पुरातन नाही, परंतु एकत्रित तीन शक्तीपीठ असणारे हे अनोखं मंदिर झालेलं आहे. त्यामुळेच याठिकाणी नवरात्रोत्सवाच्या दरम्यान दर्शनासाठी आलेल्या भक्तांसाठी एक अत्यंत अध्यात्मिक अनुभव घेता येत आहे.पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या संकल्पनेतून या त्रिमुर्ती शक्तीपीठाचे मंदिर निर्माण करण्यात आले. त्यांचा या मंदिराच्या स्थापनेसाठी असलेला दृढ विश्वास, त्यांच्या आध्यात्मिक व धार्मिक दृष्टीकोनानेच हे ठिकाण साकारले गेले आहे. त्यांनी आपले पिता आणि नेता गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीस्थळाबरोबरच असे एक अनोखं मंदिर स्थापन करुन श्रद्धा आणि भक्तीला एक अध्यात्मिक अधिष्ठानाची नवीन दिशाही यामाध्यमातून दिली आहे.गोपीनाथगड आज राज्यातील एक अत्यंत महत्त्वाचे ठिकाण बनले आहे. त्याबरोबरच एकाच ठिकाणी तीन शक्तीपीठांच्या देवींचं एकत्रित मंदिर हे एक गोपीनाथगडाच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक वैशिष्ट्य ठरले आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....