इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

संभाव्य पूर परिस्थिती : नागरिकांनी काळजी घ्यावी...

जायकवाडी धरणातून विक्रमी विसर्ग; परळी तालुक्यातील पाच गावांतील नदीकाठच्या नागरिकांचे स्थलांतर

परळीवैजनाथ: प्रतिनिधी...

    जायकवाडी धरण पाणलोट क्षेत्रात शनिवारी दिवसरात्र झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणात आवक २ लाख ७५ हजार १६८ क्युसेक सुरू आहे .पुढील धोका टाळण्यासाठी जायकवाडी धरणाचे आपत्कालीन दरवाजे उघडून २७ दरवाज्यातून टप्प्याटप्प्याने २ लाख २७ हजार क्युसेक विसर्ग वाढविण्यात आला आहे. या अनुषंगानेच संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेता नदीकाठावरील नागरिकांचे स्थलांतर करण्यात येत आहे.परळी तालुक्यातील पाच गावांतील नदीकाठच्या नागरिकांचे स्थलांतर करण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

पाच गावांतील नदीकाठावरील नागरिकांचे स्थलांतर....

परळी तालुक्यातील  पोहनेर/डिग्रस/तेलसमुख/बोरखेड, ममदापुर या गावांतील नागरिकांचे स्थलांतर करण्याबाबत तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी संबंधित ग्रामपंचायत व प्रशासनाला एका पत्राद्वारे निर्देश दिले आहेत. दिनांक २२.९.२०२५ रोजी पासून तालुक्यात अतिवृष्टी व पुरजन्य परिस्थिती झाली आहे, तसेच आज दिनांक २८२८.९.२०२रोजी माजलगाव / जायकवाडी धरणातील पाणी गोदावरी नदीत सोडण्यात आल्याने सदर नदीला मोठया प्रमाणात पुराचे पाणी आलेले असून त्यात आज रात्री व उद्या दिनांक २९.९.२०२५ रोजी व त्यानंतर ३०.९.२०२५ रोजी पुरस्थिती गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे  तालुक्यातील नदी‌काठची गावे मौजे पोहनेर डिग्रस, तेलसमुख, ममदापुर, बोरखेड या ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्याअनुषंगाने दिनांक २२,२३ व २४ सप्टेंबर, २०२५ च्या गोदावरीच्या पुरामुळे निर्माण झालेल्या बॅक वॉटरमुळे मौजे पोहनेर, डिग्रस, तेलसमुख, बोरखेड व ममदापुर या गावातील जी घरे, कुटुंब बाधीत झालेली आहेत  तसेच लगत अजून काही घरे/कुटूंब बाधित होऊ शकतात अशी कुटूंब तात्काळ वस्तीचा/गावाचा संपर्क तुटण्यापुर्वी सुरक्षीत वेळेत स्थलांतरीत करावेत असे देण्यात आले आहेत.पोहनेर : जिल्हा परिषद शाळा पोहनेर तर डिग्रस, तेलसमुख,बोरखेड,ममदापुर :जिल्हा परिषद शाळा रामेवाडी/कासारवाडी व दत्त मंदीर या ठिकाणी हे स्थलांतर करण्यात येणार आहेत. 





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या