दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

संपूर्ण आयुष्य राष्ट्रसेवेला अर्पण करणारे तपस्वी हरवले !

 राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक मधुभाई कुलकर्णी यांचे निधन – पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला शोक




संपूर्ण आयुष्य राष्ट्रसेवेला अर्पण करणारे तपस्वी  हरवले !

परळीवैजनाथ, प्रतिनिधी– 

       राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक आणि संपूर्ण आयुष्य राष्ट्रसेवेला अर्पण करणारे तपस्वी कार्यकर्ते मधुभाई कुलकर्णी यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने संघपरिवारासह सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी मधुभाई कुलकर्णी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले.संपूर्ण आयुष्य राष्ट्रसेवेला अर्पण करणारे तपस्वी  हरवले असल्याची शोकभावना त्यांनी व्यक्त केली.


         आपले संपूर्ण आयुष्य राष्ट्रसेवेला अर्पण करणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक मधुभाई कुलकर्णी यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने एका तपस्वी व्यक्तिमत्त्वाला आपण मुकलो आहोत. त्यांच्या त्याग, समर्पण आणि सेवा कार्याला विनम्र अभिवादन. 

मधुभाई कुलकर्णी यांनी अनेक दशकं संघाच्या प्रचार आणि विस्तार कार्यात आपले योगदान दिले होते. त्यांच्या कार्यशैलीमध्ये सादगी, शिस्त आणि सेवाभाव यांचा संगम होता. त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे.असे ना.पंकजा मुंडे यांनी आपल्या शोकसंवेदनांमध्ये  म्हटले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....