युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

आपला दसरा हा कार्यक्रम नसून आपली परंपरा....

राष्ट्रसंत भगवान बाबांचे आशीर्वाद व जनशक्तीचे विराट दर्शन घेण्यासाठी मी भगवान भक्तीगडावर येतेयं - ना. पंकजा मुंडे




श्वासात श्वास असेपर्यंत दसरा मेळाव्याची परंपरा खंडित होऊ देणार नाही


संकटात सापडलेल्या पूरग्रस्तांना भगवान भक्ती गडावरून देणार मदतीचा हात

बीड।दिनांक ३०। 

राष्ट्रसंत भगवान बाबांनी सुरू केलेली दसऱ्याच्या सिमोल्लंघनाची परंपरा गेल्या अनेक दशकांपासून अविरतपणे सुरू आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी आयुष्यभर ही परंपरा श्रद्धा व निष्ठेने जपण्याचा प्रयत्न केला. मुंडे साहेबांच्या पश्चात सर्वांच्या आग्रहास्तव आपण ही परंपरा सुरू ठेवली आहे. श्वासात श्वास असेपर्यंत आपण ही परंपरा खंडित होऊ देणार नाही. राष्ट्रसंत भगवान बाबांचे आशीर्वाद  आणि आपल्या विराट रूपाचे दर्शन घेण्यासाठी मी येत आहे, आपणही या असे आवाहन राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांनी केले आहे.

     अठरापगड जातीसह  गोरगरीब, वंचित, उपेक्षित घटकांतील लाखोंचा जनसमुदाय दरवर्षी भगवान भक्तीगडावर दसरा मेळाव्यात हजेरी लावत असतो. सध्या पूर परिस्थितीने व अतिवृष्टीने शेती व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आपण प्रत्यक्ष डोळ्याने ही परिस्थिती पाहिली आहे. मात्र पूरग्रस्तांचा आधार होण्याचे काम हे सरकार निश्चित करणार आहे.  भगवान भक्ती गडावर दरवर्षी होणाऱ्या परंपरेला आपण दसरा मेळावा म्हणत असलो तरी ही काही कोणती राजकीय सभा किंवा राजकीय- सामाजिक असे व्यासपीठ नाही. अठरापगड जाती धर्मातील लाखो जनसमुदायाच्या भावना व श्रद्धेची गेल्या अनेक दशकांची परंपरा दर्शविणारे हे व्यासपीठ आहे. भगवान बाबांनी सुरू केलेल्या या परंपरेला आयुष्यभर लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी आयुष्यभर जपले होते. मी देखील माझ्या श्वासात श्वास असेपर्यंत ही परंपरा खंडित होऊ देणार नाही. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आपण भगवान भक्ती गडावर येणार आहे असं पंकजाताई मुंडे यांनी म्हटले आहे.


_यापेक्षा आणखी साधेपणा काय असतो?_

--------------

पूर परिस्थितीमुळे यंदा मेळावा घेणार का?कसा घेणार? असे प्रश्न काहींच्या मनात आहेत. तसेच हा मेळावा साधेपणाने करणार का? असेही काहीजण विचारतात. परंतु दरवर्षीच हा कार्यक्रम साधेपणानेच असतो. इथे कोणताही मंडप उभारला जात नाही, कोणत्या व्यवस्था नसतात, खाण्याची व्यवस्था नसते, तरीही उन पावसाची तमा न बाळगता,या ठिकाणी येणारा प्रत्येक जण आपापल्या घरची शिदोरी घेऊन या ठिकाणी उपस्थित असतो. आठरापगड जातीतील गोरगरीब ,वंचित, उपेक्षित समाज घटक या ठिकाणी मोठ्या श्रद्धेने आणि स्वयंस्फूर्तीने येत असतो. यापेक्षा आणखी साधेपणा नेमका कसा असतो? असेही पंकजाताई मुंडे यांनी म्हटले आहे. त्यामुळे ही परंपरा आपण खंडित होऊ देणार नाही. दरवर्षीप्रमाणे सावरगाव घाट येथे भगवान भक्ती गडावर भगवान बाबांचे दर्शन व आशीर्वाद घेण्यासाठी २ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता आपण येणार आहोत असे पंकजाताई मुंडे यांनी स्पष्ट केले आहे.


*संकटात सापडलेल्या पूरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन* 

----------

सध्याच्या पूर व अतिवृष्टीच्या संकटात सुरुवातीपासूनच मी सर्वांना धीर देण्याचा व मदत करण्याचा प्रयत्न करत आहे.  स्वतः बांधावर जाऊन डोळ्यांनी सर्व परिस्थिती बघितली आहे. पूरग्रस्तांना धीर देण्याचे काम केले आहे. हे सरकार सर्व नुकसानग्रस्तांना निश्चितपणाने आधार देईल. संकटात सापडलेल्या पुरग्रस्तांना भगवान भक्तीगड देखील मदत करेल. यावेळी दसऱ्याच्या सणाला जे पुरणपोळी खाऊ शकणार नाहीत त्यांच्यासाठी भगवान भक्ती गडावर येताना प्रत्येकाने आपल्या यथाशक्ती नुसार चना डाळ, गुळ व गहू किंवा गव्हाचे पीठ घेऊन येण्याचे आवाहन पंकजाताई मुंडे यांनी केले आहे. भगवान भक्ती गडावर या सर्व साहित्याचे संकलन करून गरजू पूरग्रस्त गावांना व नागरिकांना भगवान बाबाचा प्रसाद म्हणून आपण ते वितरित करू. अशा प्रकारचा रचनात्मक व सामाजिक भान जपणारा उपक्रमही या माध्यमातून पंकजाताई मुंडे यांनी जाहीर केला आहे.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या