दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

काळजी करु नका, आपत्तीसदृश परिस्थितीत शासन आपल्या पाठिशी- पंकजा मुंडे

जालना आणि बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती: नागरिकांनी सतर्क राहण्याचे पंकजा मुंडे यांचे आवाहन

काळजी करु नका, आपत्तीसदृश परिस्थितीत शासन आपल्या पाठिशी- पंकजा मुंडे

मुंबई | प्रतिनिधी

         जालना आणि बीड जिल्ह्यांत मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुरासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. नद्या, नाले आणि कालवे भरून वाहत असुन अनेक ठिकाणी पाणी रस्त्यांवर आल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. काळजी करु नका, आपत्तीसदृश परिस्थितीत शासन आपल्या पाठिशी असल्याची ग्वाही पंकजाताई मुंडे यांनी दिली आहे.

या पार्श्वभूमीवर पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री तथा जालना पालकमंत्री  पंकजाताई मुंडे यांनी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी दोन्ही जिल्ह्यांच्या प्रशासनाशी सातत्यानं संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला असून मदतकार्य तत्काळ राबविण्याचे निर्देशही दिले आहेत.

नागरिकांनी घ्यावी काळजी......

-----------------------

    पंकजाताई मुंडे यांनी सांगितले की, "या आपत्तीसदृश परिस्थितीत शेतकरी बांधव आणि नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. ज्या भागांत रस्ते बंद आहेत, तेथून प्रवास करू नये. पूरग्रस्त भागांपासून लांब राहावे आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. नागरिकांची गैरसोय होणार नाही यासाठी प्रशासन सज्ज असून, बेघर झालेल्यांना तात्पुरता निवारा देण्यात येत आहे. तसेच नुकसान झालेल्या ठिकाणी पंचनामे करून शासकीय मदत पुरविण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

बीड जिल्ह्यातील आष्टी,परळी, शिरूर व अन्य तालुक्यांतील गंभीर पूरस्थिती लक्षात घेता तिथल्या प्रशासनाशीही संपर्क सुरू असून आवश्यक ती सर्व मदत पोहोचवली जात आहे.

काळजी करु नका, शासन पाठीशी

------------------

      या नैसर्गिक संकटाचा धीराने सामना करावा. शेतकरी बांधवांनी काळजी करू नये. शासन तुमच्या पाठीशी ठाम उभं आहे असा विश्वास पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....