इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

काळजी करु नका, आपत्तीसदृश परिस्थितीत शासन आपल्या पाठिशी- पंकजा मुंडे

जालना आणि बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती: नागरिकांनी सतर्क राहण्याचे पंकजा मुंडे यांचे आवाहन

काळजी करु नका, आपत्तीसदृश परिस्थितीत शासन आपल्या पाठिशी- पंकजा मुंडे

मुंबई | प्रतिनिधी

         जालना आणि बीड जिल्ह्यांत मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुरासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. नद्या, नाले आणि कालवे भरून वाहत असुन अनेक ठिकाणी पाणी रस्त्यांवर आल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. काळजी करु नका, आपत्तीसदृश परिस्थितीत शासन आपल्या पाठिशी असल्याची ग्वाही पंकजाताई मुंडे यांनी दिली आहे.

या पार्श्वभूमीवर पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री तथा जालना पालकमंत्री  पंकजाताई मुंडे यांनी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी दोन्ही जिल्ह्यांच्या प्रशासनाशी सातत्यानं संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला असून मदतकार्य तत्काळ राबविण्याचे निर्देशही दिले आहेत.

नागरिकांनी घ्यावी काळजी......

-----------------------

    पंकजाताई मुंडे यांनी सांगितले की, "या आपत्तीसदृश परिस्थितीत शेतकरी बांधव आणि नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. ज्या भागांत रस्ते बंद आहेत, तेथून प्रवास करू नये. पूरग्रस्त भागांपासून लांब राहावे आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. नागरिकांची गैरसोय होणार नाही यासाठी प्रशासन सज्ज असून, बेघर झालेल्यांना तात्पुरता निवारा देण्यात येत आहे. तसेच नुकसान झालेल्या ठिकाणी पंचनामे करून शासकीय मदत पुरविण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

बीड जिल्ह्यातील आष्टी,परळी, शिरूर व अन्य तालुक्यांतील गंभीर पूरस्थिती लक्षात घेता तिथल्या प्रशासनाशीही संपर्क सुरू असून आवश्यक ती सर्व मदत पोहोचवली जात आहे.

काळजी करु नका, शासन पाठीशी

------------------

      या नैसर्गिक संकटाचा धीराने सामना करावा. शेतकरी बांधवांनी काळजी करू नये. शासन तुमच्या पाठीशी ठाम उभं आहे असा विश्वास पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या