इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

Namo Yojana Hapta......

Namo Installment : नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जमा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते वितरण


Namo Yojana Hapta : अखेर राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर मंगळवारी (ता.९) नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरीत करण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर एक कळ दाबून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात आली आहे. मागील दोन महिन्यापासून शेतकरी नमोच्या सातव्या हप्त्याची प्रतिक्षा करत होते.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना या निधीची शेतकऱ्यांना मदत होईल असे सांगितले. ते म्हणाले, "मंत्रिमंडळ बैठकीनंतर आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता जमा करण्याकरिता कार्यक्रम करून एका क्लिकवर पैसे जमा झाले आहेत. यामध्ये ९१ लाख ६५ लाख १५६ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये १८९२ कोटी ६१ लाख रुपये जमा केले आहेत." असे मुख्यमंत्री म्हणाले.
पुढे ते म्हणाले, "पंतप्रधान मोदींनी किसान सन्मान योजना सुरु केली. राज्यातील महायुती सरकारने नमो शेतकरी महासन्मान योजना सुरु केली. केंद्र सरकारच्या ६ हजारांप्रमाणे या योजनेतून राज्य सरकार ६ हजार रुपये शेतकऱ्यांना देते. नुकताच पीएम किसानचा २० वा हप्ता पंतप्रधानांच्या हस्ते जमा करण्यात आला. त्याप्रमाणे आज नमोचा हप्ता जमा करण्यात आला आहे." अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
यावेळी शेतकऱ्यांना शेतीच्या कामात छोटे-मोठे खर्च येतात. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना मदत व्हावी, या उद्देशाने ही योजना सुरु करण्यात आली आहे. शेतकरी देखील या योजनेचं स्वागत करतात, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या