इमेज
प्रशासकीय गतिमानता, सुसूत्रतेसाठी मंत्रालयीन विभागांची पुनर्रचना उपविभागांचे स्वतंत्र विभाग; विभागांची संख्या ४५ होणार सामान्य प्रशासन विभाग प्रशासकीय कामकाजात गतिमानता आणि सुसूत्रता येण्यासाठी मंत्रालयीन विभागांच्या पुनर्रचना करण्यास आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. यामुळे सध्या अस्तित्वात असणाऱ्या ३३ प्रशासकीय विभागांची संख्या ४५ होणार आहे.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ईज ऑफ डुईंग बिझनेस आणि ईज आँफ लिव्हिंग संकल्पनेवर भर देण्याचे धोरण निश्चित केले आहे. त्यानुसार मंत्रालयीन विभागात सुसूत्रता आणण्यासाठी पुनर्रचना करण्यात आली. यामुळे निर्णय घेण्याची प्रक्रिया वेगवान होईल, योजनांची अंमलबजावणी आणि क्षेत्रीय यंत्रणांशी प्रभावी समन्वय साधणे शक्य होणार आहे. सध्या मंत्रालयात ३३ प्रशासकीय विभाग होते. यामध्ये एकाच विभागात दोन अथवा तीन उपविभाग होते. उपविभाग दोन किंवा तीन असले तरी विभागाची आस्थापना एकाच विभागप्रमुखांकडे असते. यामुळे मनुष्यबळाच्या वितरणात अडचणी निर्माण होत असत. त्याचबरोबर उपविभागाचे कामकाजाचे स्वरूप भिन्...

Namo Yojana Hapta......

Namo Installment : नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जमा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते वितरण


Namo Yojana Hapta : अखेर राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर मंगळवारी (ता.९) नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरीत करण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर एक कळ दाबून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात आली आहे. मागील दोन महिन्यापासून शेतकरी नमोच्या सातव्या हप्त्याची प्रतिक्षा करत होते.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना या निधीची शेतकऱ्यांना मदत होईल असे सांगितले. ते म्हणाले, "मंत्रिमंडळ बैठकीनंतर आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता जमा करण्याकरिता कार्यक्रम करून एका क्लिकवर पैसे जमा झाले आहेत. यामध्ये ९१ लाख ६५ लाख १५६ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये १८९२ कोटी ६१ लाख रुपये जमा केले आहेत." असे मुख्यमंत्री म्हणाले.
पुढे ते म्हणाले, "पंतप्रधान मोदींनी किसान सन्मान योजना सुरु केली. राज्यातील महायुती सरकारने नमो शेतकरी महासन्मान योजना सुरु केली. केंद्र सरकारच्या ६ हजारांप्रमाणे या योजनेतून राज्य सरकार ६ हजार रुपये शेतकऱ्यांना देते. नुकताच पीएम किसानचा २० वा हप्ता पंतप्रधानांच्या हस्ते जमा करण्यात आला. त्याप्रमाणे आज नमोचा हप्ता जमा करण्यात आला आहे." अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
यावेळी शेतकऱ्यांना शेतीच्या कामात छोटे-मोठे खर्च येतात. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना मदत व्हावी, या उद्देशाने ही योजना सुरु करण्यात आली आहे. शेतकरी देखील या योजनेचं स्वागत करतात, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या