इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

हिंद की चादर ' गुरु तेग बहादूर यांच्या शहीदी शताब्दी क्षत्रिय अशासकीय समितीच्या बीड जिल्हा सदस्यपदी घमंडसिंग सुरज सिंग जुनी  निवड





परळीवैजनाथ / बाबा शेख...

महाराष्ट्र शासनातर्फे 'हिंद की चादर' गुरु तेग बहादुर साहिब यांच्या 350 व्या शहीदी शताब्दीनिमित्त कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने समिती गठीत करुन अशासकी सदस्यांची निवड केली जात आहे.यात बीड जिल्हा सदस्यपदी घमंड सिंग सुरज सिंग जुनी  निवड करण्यात आली आहे.


गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या शहादत व त्यागाला आदरांजली वाहण्यासाठी विविध कार्यक्रम, जसे की नगर कीर्तन, कथा आणि किर्तन, यांच नियोजन करण्यासाठी अशासकीय सदस्यांची निवड करण्यात आली आहे. या साठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन मीटिंग घेण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील सदस्य या बैठकीसाठी उपस्थित होते. मुख्य मार्गदर्शक मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

यासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत भेटी देऊन मार्गदर्शन करण्यात आले. त्याबरोबरच नांदेड सही नागपुर, मुंबई येथे संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित केले असून देश विदेशातील समाजबांधव कार्यक्रमाला उपस्थिती लावणार आहेत. असल्याची माहिती घमंड सिंग सुरज सिंग जुनी यांनी दिली.

श्री गुरु तेग बहादुर यांचे सन २०२५ हे ३५० व शहीद समागम शताब्दी वर्ष असल्याने त्यांचा गौरवशाली इतिहास सर्वांना माहित व्हावा, तसेच त्यांनी केलेला प्रचार व दिलेले बलिदान याचे स्मरण होण्याकरीता विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. "हिंद की चादर श्री गुरु तेग बहादुर साहिब - - जी ३५० वी शहीद समागम शताब्दी तसेच गुरु गोविंदसिंग, गुरु-ता-गद्दी समागम समिती यांनी मा. मुख्यमंत्री यांना विनंती केली. कार्यक्रमाचे आयोजन सिख, शिकल करी, बंजारा, लबांना,मोहियल, सिंधी समाज बांधव एकत्रितपणे करीत आहेत. यासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील एकत्रित येऊन करीत आहेत. यासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील अशासकीय सदस्यांची निवड करण्यात आली. यामध्ये बीड जिल्ह्यातील जिल्ह्यामधून सामाजिक कार्यकर्ते तथा परळी शहरातील सर्व समाज बांधव यांची समितीच्या सहसचिव पदी निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल घमंड सिंग सुरज सिंग यांच्या वर सर्व स्तरातुन शुभेच्छा तसेच अभिनंदन होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या