इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

पत्रकारांचे कौटुंबिक स्नेहमिलन

विपरीत वातावरणीय बदलांना विविध गोष्टी कारणीभूत; सकारात्मक बदलांची नितांत गरज - मयंक गांधी

पत्रकार परिषद घेऊन ग्लोबल विकास ट्रस्टकडून श्वेतपत्रिकेचे विमोचन

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)

    मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाल्याने जागतिक तापमानात वाढ झाली असल्याने विपरीत पर्यावरणीय बदल दिसून येत आहेत. मराठवाडा किंवा अनेक भागांमध्ये झालेली अतिवृष्टी किंवा पावसाची अनियमितता याला अनेक गोष्टी कारणीभूत असून, या सर्व बाबींचा अंतर्भाव असलेली श्वेतपत्रिका ग्लोबल विकास ट्रस्टच्या वतीने प्रकाशित करण्यात आली. सिरसाळा येथील कृषिकुल शेतकरी प्रशिक्षण केंद्र येथे बुधवार (15) रोजी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेस जलनायक मयंक गांधी यांनी संबोधित केले. यावेळी डॉ.हरिश्चंद्र वंगे यांच्यासह भूगर्भ शास्त्रज्ञ देवेंद्र जोशी यांची उपस्थिती होती.

    यू.एन.डी.आर.आर, आराईझ, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी, तृप्त धारा निर्मल आणि ग्लोबल विकास ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने "मराठवाडा अतिवृष्टी श्वेतपत्रिका - आपत्तीचे विश्लेषण आणि भविष्यकालीन उपाययोजना" ही पत्रिका जाहीर करण्यात आली. याबाबत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलतांना जलनायक मयंक गांधी म्हणाले की, पर्यावरणीय बदलांचा समतोल बदलत गेल्याने पावसाची अनियमितता तसेच अतिवृष्टीसाखे आपत्तीचे प्रसंग सतत ओढवत आहेत. यंदाच्या ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीने मराठवाड्याला बेचिराख केले, मोठ्या प्रमाणावर हानी झाली. असा प्रसंग पहिल्यांदाच घडतोय असे नाही तर यापूर्वीही अनेकवेळा घडले आहेत. त्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत असून मुख्यतः वृक्षतोड, जागतिक तापमानवाढ, पावसाचे असमान वाटप आणि जलसंधारणाच्या कामांचा अभाव अशा प्रमुख कारणांचा समावेश आहे. भौगोलिक परिस्थितीही कारणीभूत असून अनेकवेळा त्यामुळेही पूरपरिस्थिती निर्माण होते. हे भविष्यात घडू नये याच्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड व्हायला हवी, जलसंधारणाची कामे होणे गरजेचे असल्याचे मयंक गांधी यांनी म्हटले आहे.

पत्रकारांचे कौटुंबिक स्नेहमिलन

पत्रकारांना आणि त्यांच्या कुटुंबियांना सिरसाळा येथील जागतिक दर्जाचे कृषिकुल पाहता यावे यासाठी दीपावली स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी 12 ते 03 दरम्यान आयोजित कार्यमात सहभागी झालेल्या पत्रकार कुटुंबियांनी कृषिकुल येथे असलेल्या सर्व उपलब्ध सोयी - सुविधांची पाहणी केली. माती परीक्षण प्रयोगशाळा, जलसंधारण कक्ष, देवराई, यंत्रसामुग्री कक्ष, गोशाळा तसेच विविध प्रकारच्या फळबाग प्लॉटची पाहणी केली व कृषिकुल परिसरात उभारण्यात आलेल्या कृषी महादेव मंदिरातील प्रभूंचे दर्शन घेतला. सर्वांनी एकमेकांना दीपावली निमित्त शुभेच्छांची आदान - प्रदान केली. सिरसाळा व परळी वैजनाथ येथील सर्व पत्रकारांची कुटुंबीयांसह उपस्थिती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या