दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

पत्रकारांचे कौटुंबिक स्नेहमिलन

विपरीत वातावरणीय बदलांना विविध गोष्टी कारणीभूत; सकारात्मक बदलांची नितांत गरज - मयंक गांधी

पत्रकार परिषद घेऊन ग्लोबल विकास ट्रस्टकडून श्वेतपत्रिकेचे विमोचन

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)

    मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाल्याने जागतिक तापमानात वाढ झाली असल्याने विपरीत पर्यावरणीय बदल दिसून येत आहेत. मराठवाडा किंवा अनेक भागांमध्ये झालेली अतिवृष्टी किंवा पावसाची अनियमितता याला अनेक गोष्टी कारणीभूत असून, या सर्व बाबींचा अंतर्भाव असलेली श्वेतपत्रिका ग्लोबल विकास ट्रस्टच्या वतीने प्रकाशित करण्यात आली. सिरसाळा येथील कृषिकुल शेतकरी प्रशिक्षण केंद्र येथे बुधवार (15) रोजी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेस जलनायक मयंक गांधी यांनी संबोधित केले. यावेळी डॉ.हरिश्चंद्र वंगे यांच्यासह भूगर्भ शास्त्रज्ञ देवेंद्र जोशी यांची उपस्थिती होती.

    यू.एन.डी.आर.आर, आराईझ, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी, तृप्त धारा निर्मल आणि ग्लोबल विकास ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने "मराठवाडा अतिवृष्टी श्वेतपत्रिका - आपत्तीचे विश्लेषण आणि भविष्यकालीन उपाययोजना" ही पत्रिका जाहीर करण्यात आली. याबाबत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलतांना जलनायक मयंक गांधी म्हणाले की, पर्यावरणीय बदलांचा समतोल बदलत गेल्याने पावसाची अनियमितता तसेच अतिवृष्टीसाखे आपत्तीचे प्रसंग सतत ओढवत आहेत. यंदाच्या ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीने मराठवाड्याला बेचिराख केले, मोठ्या प्रमाणावर हानी झाली. असा प्रसंग पहिल्यांदाच घडतोय असे नाही तर यापूर्वीही अनेकवेळा घडले आहेत. त्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत असून मुख्यतः वृक्षतोड, जागतिक तापमानवाढ, पावसाचे असमान वाटप आणि जलसंधारणाच्या कामांचा अभाव अशा प्रमुख कारणांचा समावेश आहे. भौगोलिक परिस्थितीही कारणीभूत असून अनेकवेळा त्यामुळेही पूरपरिस्थिती निर्माण होते. हे भविष्यात घडू नये याच्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड व्हायला हवी, जलसंधारणाची कामे होणे गरजेचे असल्याचे मयंक गांधी यांनी म्हटले आहे.

पत्रकारांचे कौटुंबिक स्नेहमिलन

पत्रकारांना आणि त्यांच्या कुटुंबियांना सिरसाळा येथील जागतिक दर्जाचे कृषिकुल पाहता यावे यासाठी दीपावली स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी 12 ते 03 दरम्यान आयोजित कार्यमात सहभागी झालेल्या पत्रकार कुटुंबियांनी कृषिकुल येथे असलेल्या सर्व उपलब्ध सोयी - सुविधांची पाहणी केली. माती परीक्षण प्रयोगशाळा, जलसंधारण कक्ष, देवराई, यंत्रसामुग्री कक्ष, गोशाळा तसेच विविध प्रकारच्या फळबाग प्लॉटची पाहणी केली व कृषिकुल परिसरात उभारण्यात आलेल्या कृषी महादेव मंदिरातील प्रभूंचे दर्शन घेतला. सर्वांनी एकमेकांना दीपावली निमित्त शुभेच्छांची आदान - प्रदान केली. सिरसाळा व परळी वैजनाथ येथील सर्व पत्रकारांची कुटुंबीयांसह उपस्थिती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....