इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

कोणत्या मागण्यांसाठी आंदोलन....

मागणी एक,मदत दुसरीच-किसान सभा आक्रमक



कर्जमाफीसह इतर मागण्याकरिता किसान सभेचे निदर्शने

बीड / प्रतिनिधी....

      निसर्गाचा लहरीपणा, सरकारचे शेती विरोधी आयात-निर्यात धोरण आणि शेतमालाला न मिळालेल्या हमीभाव या तिहेरी संकटात सापडलेल्या बळीराजावर यंदाच्या खरिपात होत्याच नव्हतं करून ठेवलं आहे. नैतिक जवाबदारी असलेल्या सरकारने पोकळ आकड्यांचा खेळ करत मदतीची वलग्ना करत शेतकऱ्यांचा भ्रमनिरास केला असून शेतकऱ्यांची मागणी वेगळीच असताना मदत मात्र वेगळी केल्याने शेतकरी पुन्हा एकदा आपल्या मागण्याकरिता आज शुक्रवार दि 10 रोजी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या तहसील कार्यालयावर निदर्शने करणार असल्याची माहिती बीड किसान सभेने दिली आहे.

      यंदाच्या खरिपात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच प्रचंड नुकसान झाले असून निवडणूक पूर्वी सत्तेत येण्यापूर्वी केलेली कर्ज माफीचे आश्वासन पूर्ण करण्याची ही रास्त वेळ असताना सत्ताधारी केवळ आकड्यांचा खेळ करत शेतकऱ्यांच्या हाती भोपळा देण्याचा प्रकार सुरू आहे.पंजाब, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यात यावेळीच्या अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना ज्या पद्धतीने मदत करण्यात आली त्याच प्रमाणे राज्यातील सरकारने शेतकऱ्यांना मदत करून आपले उत्तरदायित्व निभवावे. संपूर्ण कर्ज माफी करत एक्करी 50 हजार रु मदत, शेतमजुरांच्या हाताला काम नसल्याने त्यांना श्रमनुकसान भरपाई म्हणून 30 हजार रु प्रतिमाह, पीक विमा तात्काळ मंजूर करावा, खरवडून गेलेल्या शेतीचा संपूर्ण पंचनामा करत नुकसान भरपाई देण्यात यावी या मागण्याला घेत बीड जिल्हा किसान सभा, सिटू कामगार संघटना व शेत मजूर युनियन यांचे संयुक्तरित्या आज शुक्रवार दि 10 रोजी जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा किसान सभेकडून देण्यात आली आहे.

या मागण्यांसाठी आंदोलन

     शेतकऱ्यांना प्रति एकर 50 हजार रुपये पीक नुकसान भरपाई द्या, शेतमजुरांना श्रम नुकसान भरपाई म्हणून 30 हजार रुपये द्या, शेतकऱ्यांचे व शेतमजुरांचे संपूर्ण कर्ज माफ करा, कर्जमाफी योजनेत पीक व शेती कर्जा बरोबरच बचत गट, सावकारी व मायक्रो फायनान्स कर्जाचाही समावेश करा, विद्यार्थ्यांची फी माफ करा, पीक विम्याचे काढून टाकलेले ट्रिगर पुन्हा लागू करा, शेती, जनावरे, घरे, गोठे यांचे झालेले नुकसान सरकारी खर्चाने रोजगार हमी योजनेतून कामे काढत भरून द्या यासारख्या १० मागण्यांसाठी ही निदर्शने करण्यात येणार आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या