इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

 परळी रेल्वे स्थानकावर मानवतेचा सुंदर आदर्श 



सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांतून हरवलेली अल्पवयीन मुलगी सुखरूप घरी पोहोचली

पुणेहून दिनांक 10 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री पनवेल–नांदेड एक्सप्रेसने प्रवास करणारी एक अल्पवयीन मुलगी प्रवासादरम्यान एकटीच आढळली. त्या वेळी एका संशयास्पद व्यक्तीने तिला फूस लावण्याचा प्रयत्न केला. हे दृश्य ताईबाई रोहिदास मुंडे या जागरूक महिलेच्या नजरेस पडताच त्यांनी तत्काळ त्या व्यक्तीस हटकले व मुलीला आपल्या जवळ घेत विचारपूस केली.


यानंतर त्या मुलीसह त्या परळी वैजनाथ येथे उतरल्या आणि सामाजिक कार्यकर्ते राजन वाघमारे यांच्या सहकार्याने परळी रेल्वे पोलिस ठाण्यात मुलीस सुरक्षित सुपूर्द केले.


सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष ॲड. अरुण पाठक यांनी मुलीशी संवाद साधून संपूर्ण परिस्थिती जाणून घेतली. चौकशीतून समजले की सदर मुलगी मूळची हुसेनियाबाद, जिल्हा बलिया (उत्तर प्रदेश) येथील असून तिचे नाव उषा सुनील तिवारी आहे. ती आपल्या बहिणीकडे दापोडी (पुणे) येथे राहण्यासाठी आली असता घरातील किरकोळ वादामुळे रागाच्या भरात घर सोडून निघून गेली होती.


ॲड. पाठक यांनी त्वरित पुण्यातील भा.ज.यु.मो. प्रदेश सचिव अजित कुलथे यांच्याशी संपर्क साधून संबंधित पोलिस स्टेशनमार्फत मुलीच्या कुटुंबाशी संवाद साधला. त्यानंतर मुलीची बहीण व भाऊजी परळी वैजनाथ येथे येऊन परळी रेल्वे पोलिस ठाण्यात पोहोचले.


सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री. संजय काळे यांच्या उपस्थितीत कायदेशीर कारवाई पूर्ण करून मुलीला तिच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. आपल्या बहिणीस सुखरूप पाहून कुटुंबीय भावुक झाले व सर्वांनी सामाजिक कार्यकर्ते तसेच पोलिसांचे मनःपूर्वक आभार मानले.


या घटनेत ताईबाई मुंडे, राजन वाघमारे, ॲड. अरुण पाठक, अजित कुलथे आणि परळी रेल्वे पोलिस ठाणे यांनी दाखवलेली तत्परता आणि संवेदनशीलता खरंच प्रशंसनीय आहे.ही घटना समाजात जागरूक नागरिकत्वाचे आणि मानवतेचे उत्तम उदाहरण ठरली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या