दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

भारतीय जनता पक्षाचा पाया हा संघर्षातूनच उभा......

 भाजपचे कार्यालय कार्यकर्त्यांसाठी ऊर्जा व प्रेरणेचे केंद्र बनेल - ना. पंकजा मुंडे

छत्रपती संभाजीनगर येथे भाजपच्या कार्यालयाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते थाटात लोकार्पण

छत्रपती संभाजी नगर 

।दिनांक १६। 

भारतीय जनता पक्षाचा पाया हा संघर्षातूनच उभा आहे. अटलजींनी त्या काळामध्ये "ना हार मे, ना जीत मे, ना भयभीत किंचित में" असे म्हणत ही संघर्षाची बीजं पेरली. त्या संघर्षमय वाटचालीला नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून यश मिळवून देत सुवर्ण सुवर्णकाळ आणला आहे असे प्रतिपादन राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना पंकजा मुंडे यांनी केले.

          भारतीय जनता पक्षाच्या छत्रपती संभाजीनगर येथील कार्यालयाचे उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आले. त्यावेळी ना पंकजा मुंडे बोलत होत्या. यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघर्षातून सुवर्णकाळाकडे झालेल्या वाटचालीची थोडक्यात प्रभावी मांडणी केली. यावेळी पंकजा मुंडे यांनी सांगितले की,भारतीय जनता पक्षाने त्या दशकांमध्ये पक्ष वाढीसाठी मोठा संघर्ष केला. मात्र आज तोच पक्ष संपूर्ण भारतात यशस्वी झालेला आहे. त्या दशकातील पक्ष वाढीसाठी खस्ता खाल्लेल्या सर्व नेत्यांचे हे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खरे करून दाखवले आहे. बिहारमध्येही आपल्याला प्रचंड यश मिळाले आहे. आता कोणतेच राज्य असे राहणार नाही जिथे भाजपाची पूर्ण सत्ता नसेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातूनही भाजपाला तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपद मिळाले आहे. प्रत्येक कार्यकर्त्याचे स्वप्न होते की तिसऱ्यांदा भाजपचा मुख्यमंत्री झाला पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी ते पूर्ण केले आहे. आज प्रत्येक जिल्ह्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचे कार्यालय उभी राहत आहेत. ही कार्यालय केवळ कार्यालये न राहता ती निश्चितच प्रत्येक कार्यकर्त्याला ऊर्जा देणारी केंद्रे होणार आहेत. मराठवाड्यातील एक कार्यालय भाजप कार्यकर्त्यांसाठी ऊर्जा केंद्र होणार असून या ठिकाणाहून प्रत्येकाला निश्चित ऊर्जा मिळेल भाजपा रुजवण्यासाठी वाढवण्यासाठी त्या दशकातील आपल्या प्रमोद महाजन असो किंवा मुंडे साहेब असो यांनी पक्षाच्या बाबतीत पाहिलेले स्वप्न पूर्ण होत आहे याचा प्रचंड आनंद होत आहे. येणाऱ्या काळात नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषदांमध्येही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला भरघोस यश मिळवायचे आहे. त्यासाठी सर्वांनी काम कामाला लागावे असे आवाहनही यावेळी पंकजा मुंडे यांनी केले.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....