प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

सर्व स्तरातून अभिनंदन!!!!

 बोरखेडच्या अविनाश मिसाळ याची ‘गरुडझेप’




एमपीएससी २०२४ मध्ये क्लास-वन अधिकारी म्हणून यशस्वी पात्रता


 परळी, (प्रतिनिधी):- परिस्थिती लहान असली तरी स्वप्नं मोठी असावीत असे आपल्याकडे म्हण आहे.  ही म्हण बोरखेडच्या सुपुत्राने खऱ्या अर्थाने सार्थ ठरवली आहे. परळी तालुक्यातील गोदाकाठी वसलेल्या छोट्याशा बोरखेड गावातील अविनाश विक्रम मिसाळ याने एमपीएससी २०२४ च्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करून क्लास-वन अधिकारीपदासाठी पात्रता मिळवली आहे.


   अविनाशचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा बोरखेड येथे तर माध्यमिक शिक्षण अहमदपूर येथे झाले. बारावी लातूर येथून तर इंजिनिअरिंगची पदवी कराड  येथून मिळवली. ग्रामीण भागात वाढलेला, पण स्वप्न मात्र राज्यसेवेतील मानाचे अधिकारी होण्याचे आणि तेच स्वप्न अविनाशने पूर्णत्वास नेले. अविनाश हा आंबेडकरी चळवळीतील धडाडीचे कार्यकर्ते व भाजप मागासवर्गीय सेलचे परळी तालुका अध्यक्ष विक्रम मिसाळ यांचा सुपुत्र आहे. प्रतिकूल परिस्थितीतून पुढे आलेल्या विक्रम मिसाळ यांनी शिक्षणाच्या जोरावर घराण्याचे नशीबच बदलून दाखवले आहे. त्यांचा छोटा मुलगा दिलीप मिसाळ सध्या भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून देशसेवा बजावत आहे. तर आता अविनाशने राज्यसेवेत झेप घेत देश-राज्यसेवेची नवी पायरी गाठली आहे.

      पूर्वी दोन वेळा एमपीएससीच्या मुख्य परीक्षा व मुलाखतीपर्यंत पोहोचलेला अविनाश आपल्या तिसऱ्या प्रयत्नात यशाच्या शिखरावर पोहोचला. त्याच्या या धडाडी, जिद्दी आणि सातत्याला परळी तालुक्यासह संपूर्ण बीड जिल्हा सलाम करत आहे. बोरखेडसारख्या सीमेवरील गावातून उभा राहिलेला हा तरुण आता अनेकांसाठी प्रेरणास्त्रोत ठरत आहे.  शेतकऱ्याचा मुलगा आकाशालाही गवसणी घालू शकतो. हे अविनाशने आपल्या कर्तृत्वाने सिद्ध करून दाखवले आहे.

     अविनाश मिसाळ यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, बोरखेडसह संपूर्ण परळी तालुका आपला मुलगा क्लास-वन अधिकारी झाला या अभिमानाने उजळून निघाला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या