इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

छाननीत ‘या’ उमेदवारांना बसणार फटका...

उमेदवारी अर्ज छाननीच्या दिवशीच निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय !




         राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत सोमवारी संपली. त्यानंतर आज अर्जांची छाननी सुरू आहे. या छाननीनंतर पात्र उमेदवारांची यादी प्रसिध्द केली जाईल. पण त्याआधीच राज्य निवडणूक आयोगाने 17 नोव्हेंबरचे पत्र रद्द करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.

       आज उमेदवारी अर्जांची छाननी होत आहे. या छाननीमध्ये अपूर्ण माहिती, कागदपत्रे असलेले अर्ज बाद करण्यात येतील. यापार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व जिल्ह्याधिकाऱ्यांना तातडीने पत्र धाडले आहे. या पत्रानुसार नोंदणीकृत पक्षाशी संबंधित नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याबाबतच्या विषयान्वये देण्यात आलेले ता. १७ नोव्हेंबर रोजीचे पत्र रद्द करण्यात येत असून सुधारित सूचना करण्यात येत आहेत.

     निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, नोंदणीकृत राजकीय पक्षाच्या वतीने नामनिर्देशन अर्ज सादर केलेल्या डमी उमेदवाराच्या नामनिर्देशन अर्जात एकच सूचक असल्यास छाननी अंती अशा डमी उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात यावा, असे आयोगाने म्हटले आहे. त्यामुळे एकच सूचक असल्यास असे अर्ज अवैध ठरविले जाणार आहेत.

       मात्र, डमी उमेदवाराने पाच सूचकांच्या स्वाक्षरीसह नामनिर्देशन अर्ज सादर केला असल्यास आणि तो डमी उमेदवार इतर कागदपत्रे व अटी शर्तीची पूर्तता करीत असल्यास त्याचा नामनिर्देशन अर्ज अपक्ष उमेदवार म्हणून पात्र ठरिवण्यात यावा, असे राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त राजेंद्र पाटील यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या