दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

दोन दिवसीय अधिवेशनात विविध ठराव मंजुर

आशांना किमान वेतनाचा लाभ सरकारनी द्यावा. कॉ डॉ डी एल कराड


दोन दिवसीय अधिवेशनात विविध ठराव मंजुर

परळी वै ता 9 प्रतिनिधी 

       आरोग्य विभागातील महत्वाचा घटक असलेल्या आशा व गटप्रवर्क यांना सरकारने कायम सेवेत सामावून घ्यावे व सामाजिक सुरक्षा प्रदान करावी यासाठी CITU कायम आशा व गटप्रवर्क फेडरेशन च्या सोबत राहुन आंदोलनात सहभागी होत असल्याचे मत CITU चे राष्ट्रीय उपाध्यक्ष कॉ डॉ डी एल कराड यांनी केले आहे.

      परळी येथे 8 व 9 नोव्हेंबर रोजी आशा व गटप्रवर्क फेडरेशन चे 4 थे राज्य अधिवेशन उत्साहात पार पडले. यावेळी अधिवेशनाच्या समारोपाच्या भाषणात कॉ डॉ डी एल कराड बोलत होते. पुढे बोलताना कॉ कराड म्हणाले की देशातल्या 35 टक्के लोकांना घर बांधण्यासाठी स्वतः ची जागा नाही. देशातील 4.5 कोटी लोक अल्पशा उत्पन्नावर काम करतात त्यांना पेन्शन नाही. 

योजना कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेतले पाहिजे. आशांना सामाजिक सुरक्षा असली पाहिजे. सरकारनी आशांना किमान वेतनाचा लाभ दिला पाहिजे. आशा व गटप्रवर्क संघटना मजबूत करावी लागेल. त्याशिवाय सरकार आपल्या मागण्या मान्य करणार नाही. त्यामुळे यापुढे आशां नी एकत्र येऊन संघटना बळकट करण्याचे आवाहन कराड यांनी केले. यावेळी आशा वर्कर्स यूनियनच्या राज्याध्यक्ष कॉ आनंदी आवघडे, सरचिटणीस कॉ पुष्पा पाटील, सिटु चे राज्याध्यक्ष कॉ एच एम शेख, जिल्हाध्यक्ष कॉ शिवाजी कुरे, सचिव कॉ किरण सावजी, कॉ अशोक थोरात, कॉ प्रभाकर नागरगोजे यांची प्रमुख उपस्थिती होती. दोन दिवस चाललेल्या अधिवेशनात संघटनात्मक बांधनी व सरकारकडे प्रलंबित असलेल्या मागण्यांबाबत विविध ठराव पारित करण्यात आले. आभार प्रदर्शन कॉ सुवर्णा रेवले यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आशा लांडगे, हेमा काळे, अनिता गिराम, छाया रणदिवे, सारिका मुंडे, अनिता चाटे, भाग्यश्री थावरे, उमा वाघमारे, भारती राख, सुवर्णमाला मुंडे, जालिंदर गिरी, शेख जावेद, प्रकाश वाघमारे, बाबासाहेब रोडे, शुभम काकडे आदींनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....