इमेज
  गर्भवती महिला हेळसांड: उपचारातील हलगर्जी प्रकरणी गित्ते हाॅस्पिटल मधील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्याची मागणी परळी वैजनाथ, प्रतिनिधी:        शहरातील गित्ते हाॅस्पिटल या खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात आता पुरावे सुरक्षित ठेवण्याची मागणी पुढे आली आहे. तक्रारदाराने शहर पोलीस ठाण्यात निवेदन देऊन संबंधित रुग्णालय तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि डीव्हीआर तात्काळ जप्त करून सुरक्षित ताब्यात घेण्याची मागणी केली आहे.          तक्रारदार वैजनाथ संभाजी मुंडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांच्या पत्नीवर उपचार करताना डाॅ.कल्पना सचिन गित्ते यांच्याविरुद्ध हलगर्जीपणा झाल्याचा आरोप यापूर्वीच लेखी तक्रार करुन करण्यात आला आहे. या प्रकरणात सत्य समोर येण्यासाठी रुग्णालयातील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाचे ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.२३ एप्रिल ते २४ एप्रिलदरम्यान रुग्णालयातील केबिन, कॉरिडॉर तसेच बाहेरील परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच रु...

उम्मीद पोर्टलवरील वक्फ नोंदणीची अंतिम तारीख वाढवावी: मौलाना इलियास खान फलाही

परळी, प्रतिनिधी : 2009 ते 2025 या सोळा वर्षांच्या कालावधीत वक्फ नोंदी डिजिटल करण्यास सरकार अपयशी ठरले आहे. आतापर्यंत वेबसाइटवर अपलोड केलेला डेटा अपूर्ण, चुकाांनी भरलेला असून त्यात जिओ-टॅगिंगचाही अभाव आहे. म्हणजेच, सर्व प्रशासकीय यंत्रणा असूनही सरकार स्वतः रेकॉर्ड अपलोड करू शकलेले नाही, आणि उलट जनतेला काही महिन्यांत हे काम पूर्ण करण्यास सांगितले जात आहे. त्यामुळे सरकारने वक्फ नोंदणीची अंतिम तारीख वाढवावी, अशी मागणी जमाअत-ए-इस्लामी हिंद, महाराष्ट्रचे अध्यक्ष मौलाना इलियास खान फलाही यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या निवेदनात केली.


आपल्या निवेदनात मौलानांनी म्हटले आहे की भारत सरकारच्या 'उम्मीद पोर्टल'वर वक्फ नोंदणीची अंतिम तारीख 6 डिसेंबर दर्शवली जात आहे, आणि अजूनही मोठ्या प्रमाणात नोंदणीचे काम शिल्लक आहे. जमाअत-ए-इस्लामी हिंद, महाराष्ट्रचे अध्यक्ष यांच्या मते, पोर्टलची गती अत्यंत मंद असल्याने नोंदणी पूर्ण होत नाही आहे. अनेक दिवसांपासून पोर्टल खूपच धीमे चालत असल्यामुळे वक्फ मालमत्तांच्या नोंदणीमध्ये अडचणी येत आहेत आणि त्यामुळे नोंदणी प्रक्रिया पूर्ण होऊ शकलेली नाही.


मौलाना इलियास खान फलाही यांनी सांगितले की महाराष्ट्रातील 80 टक्के वक्फ मालमत्तांची नोंदणी झाली आहे, तर 20 टक्के मालमत्ता अद्यापही नोंदणीसाठी शिल्लक आहेत. मात्र, सत्यापन केवळ 20 टक्के प्रकरणांचेच झाले असून उर्वरित 80 टक्के मालमत्तांचे सत्यापन अजूनही अपूर्ण आहे. त्यामुळे 100 टक्के वक्फ मालमत्तांची नोंदणी अपेक्षित असेल तर केंद्र सरकारने नोंदणीची अंतिम तारीख वाढवावी, अशी आमची विनंती आहे. अंतिम तारीख वाढवण्याबरोबरच पोर्टलमधील तांत्रिक त्रुटीदेखील त्वरित दुरुस्त कराव्यात, जेणेकरून हे काम लवकरात लवकर पूर्ण होऊ शकेल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....