परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
उम्मीद पोर्टलवरील वक्फ नोंदणीची अंतिम तारीख वाढवावी: मौलाना इलियास खान फलाही
परळी, प्रतिनिधी : 2009 ते 2025 या सोळा वर्षांच्या कालावधीत वक्फ नोंदी डिजिटल करण्यास सरकार अपयशी ठरले आहे. आतापर्यंत वेबसाइटवर अपलोड केलेला डेटा अपूर्ण, चुकाांनी भरलेला असून त्यात जिओ-टॅगिंगचाही अभाव आहे. म्हणजेच, सर्व प्रशासकीय यंत्रणा असूनही सरकार स्वतः रेकॉर्ड अपलोड करू शकलेले नाही, आणि उलट जनतेला काही महिन्यांत हे काम पूर्ण करण्यास सांगितले जात आहे. त्यामुळे सरकारने वक्फ नोंदणीची अंतिम तारीख वाढवावी, अशी मागणी जमाअत-ए-इस्लामी हिंद, महाराष्ट्रचे अध्यक्ष मौलाना इलियास खान फलाही यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या निवेदनात केली.
आपल्या निवेदनात मौलानांनी म्हटले आहे की भारत सरकारच्या 'उम्मीद पोर्टल'वर वक्फ नोंदणीची अंतिम तारीख 6 डिसेंबर दर्शवली जात आहे, आणि अजूनही मोठ्या प्रमाणात नोंदणीचे काम शिल्लक आहे. जमाअत-ए-इस्लामी हिंद, महाराष्ट्रचे अध्यक्ष यांच्या मते, पोर्टलची गती अत्यंत मंद असल्याने नोंदणी पूर्ण होत नाही आहे. अनेक दिवसांपासून पोर्टल खूपच धीमे चालत असल्यामुळे वक्फ मालमत्तांच्या नोंदणीमध्ये अडचणी येत आहेत आणि त्यामुळे नोंदणी प्रक्रिया पूर्ण होऊ शकलेली नाही.
मौलाना इलियास खान फलाही यांनी सांगितले की महाराष्ट्रातील 80 टक्के वक्फ मालमत्तांची नोंदणी झाली आहे, तर 20 टक्के मालमत्ता अद्यापही नोंदणीसाठी शिल्लक आहेत. मात्र, सत्यापन केवळ 20 टक्के प्रकरणांचेच झाले असून उर्वरित 80 टक्के मालमत्तांचे सत्यापन अजूनही अपूर्ण आहे. त्यामुळे 100 टक्के वक्फ मालमत्तांची नोंदणी अपेक्षित असेल तर केंद्र सरकारने नोंदणीची अंतिम तारीख वाढवावी, अशी आमची विनंती आहे. अंतिम तारीख वाढवण्याबरोबरच पोर्टलमधील तांत्रिक त्रुटीदेखील त्वरित दुरुस्त कराव्यात, जेणेकरून हे काम लवकरात लवकर पूर्ण होऊ शकेल.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा