परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

किसान सभेचा आंदोलनाचा प्रवित्रा...

कापूस, सोयाबीन जाचक अटी दूर करत तात्काळ खरेदी करा-किसान सभा


परळी / प्रतिनिधी....

अतिवृष्टीमुळे व सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या कापूस आणि सोयाबीन शेत मालाची खरेदी हमीभावाने खरेदी करताना जाचक अटी टाकून केंद्र आणि राज्य सरकारने बाजार पेठेतील शेत मालाच्या समतोल राखण्यापेक्षा, शासकीय हमीभावाने खरेदी करण्यास सरकार असमर्थ असल्याने हमीभावाने खरेदी टाळण्यासाठी जाचक अटी घालत आहे. उत्पादन खर्चापेक्षा कमी भावात खुल्या बाजारात व्यापा-याकडे विक्री करण्याचे हे षडयंत्र सरकार करत असून शासकीय खरेदी करताना येणाऱ्या अडचणी दूर करून कापूस, सोयाबीन शेतमाल हमीभावाने खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अथवा याकरिता किसान सभेकडून आंदोलनाचा प्रवित्रा घेण्यात येईल असा इशारा किसान सभेच्या पदाधिकारी यांनी मंगळवार दि 16 रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन करत मागणी केली.

          यंदाच्या खरिपात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख पीक असलेल्या सोयाबीन आणि कापूस उत्पादनात कमालीची घट झाली आहे. वारंवार मागणी करून शासनाने सीसीआय, पणन महासंघ यांनी उशिरा खरेदी केंद्र सुरू केली मात्र मुदतीत नोंदणी न करणे,  सातबारावर कापूस पिकाचा पीक पेरा नसणे, हेक्टरी 21 क्विंटलची मर्यादा, कापसातील जास्त आर्द्रता तर सोयाबीन खरेदी करण्यासाठी बारदाने नसणे, शेतकऱ्यांना बायोमेट्रिक बंधनकारक असणे, प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर उपस्थित असणे आदी जाचक अटी शासकीय खरेदी केंद्रावर सुरू आहेत. सर्व जाचक अटी दूर करून खरेदी केंद्र मोठ्या संख्येने सुरू करून शेतकऱ्यांच्या कापूस, सोयाबीन तात्काळ खरेदी करावी या मागणीसाठी बीड किसान सभेने मंगळवार दि 16 रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून याबाबत योग्य ती कार्यवाही न झाल्यास किसान सभेकडून आंदोलन करण्यात येईल असा इशारा एड.अजय बुरांडे, कॉ.मुरलीधर नागरगोजे, कॉ.दत्ता डाके यांच्यासह शिष्टमंडळाने यावेळी दिला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!