मोठ्या संख्येने उपस्थित रहा....

इमेज
द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल व पूजा प्राथमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आज आयोजन परळी वैजनाथ | प्रतिनिधी द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल व पूजा प्राथमिक विद्यालय, परळी वैजनाथ यांच्या वतीने २० वे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. हे स्नेहसंमेलन आज  बुधवार, दि. ५ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता लोकनेते गोपीनाथराव मुंडे  नटराज रंग मंदिर, परळी वैजनाथ येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामलिंग राजनळे सर (माजी मुख्याध्यापक, वैद्यनाथ विद्यालय) राहणार असून उद्घाटन  गणेश गिरी (गटशिक्षणाधिकारी, गटसाधन केंद्र, परळी वै.) यांच्या हस्ते होणार आहे. या काकार्यक्रमास बाजीराव  भैय्या   धर्माधिकारी (माजी नगराध्यक्ष),  कोकणे  (विस्ताराधिकारी),  धनंजय ढोणे  (पोलीस निरीक्षक),  दिवाकर जोशी (गझलकार), प्रा. रविंद्र जोशी सर (पत्रकार,  दैनिक पुढारी),  व्यंकटेश शिंदे (नगरसेवक) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.           स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांचे नृत...

किसान सभेचा आंदोलनाचा प्रवित्रा...

कापूस, सोयाबीन जाचक अटी दूर करत तात्काळ खरेदी करा-किसान सभा


परळी / प्रतिनिधी....

अतिवृष्टीमुळे व सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या कापूस आणि सोयाबीन शेत मालाची खरेदी हमीभावाने खरेदी करताना जाचक अटी टाकून केंद्र आणि राज्य सरकारने बाजार पेठेतील शेत मालाच्या समतोल राखण्यापेक्षा, शासकीय हमीभावाने खरेदी करण्यास सरकार असमर्थ असल्याने हमीभावाने खरेदी टाळण्यासाठी जाचक अटी घालत आहे. उत्पादन खर्चापेक्षा कमी भावात खुल्या बाजारात व्यापा-याकडे विक्री करण्याचे हे षडयंत्र सरकार करत असून शासकीय खरेदी करताना येणाऱ्या अडचणी दूर करून कापूस, सोयाबीन शेतमाल हमीभावाने खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अथवा याकरिता किसान सभेकडून आंदोलनाचा प्रवित्रा घेण्यात येईल असा इशारा किसान सभेच्या पदाधिकारी यांनी मंगळवार दि 16 रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन करत मागणी केली.

          यंदाच्या खरिपात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख पीक असलेल्या सोयाबीन आणि कापूस उत्पादनात कमालीची घट झाली आहे. वारंवार मागणी करून शासनाने सीसीआय, पणन महासंघ यांनी उशिरा खरेदी केंद्र सुरू केली मात्र मुदतीत नोंदणी न करणे,  सातबारावर कापूस पिकाचा पीक पेरा नसणे, हेक्टरी 21 क्विंटलची मर्यादा, कापसातील जास्त आर्द्रता तर सोयाबीन खरेदी करण्यासाठी बारदाने नसणे, शेतकऱ्यांना बायोमेट्रिक बंधनकारक असणे, प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर उपस्थित असणे आदी जाचक अटी शासकीय खरेदी केंद्रावर सुरू आहेत. सर्व जाचक अटी दूर करून खरेदी केंद्र मोठ्या संख्येने सुरू करून शेतकऱ्यांच्या कापूस, सोयाबीन तात्काळ खरेदी करावी या मागणीसाठी बीड किसान सभेने मंगळवार दि 16 रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून याबाबत योग्य ती कार्यवाही न झाल्यास किसान सभेकडून आंदोलन करण्यात येईल असा इशारा एड.अजय बुरांडे, कॉ.मुरलीधर नागरगोजे, कॉ.दत्ता डाके यांच्यासह शिष्टमंडळाने यावेळी दिला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....