इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

त्वरित कारवाई करून सक्षम व कर्तव्यदक्ष अधिकारी नेमावेत अशी मागणी

 परळीच्या पक्षपाती निवडणूक अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार : दीपक  देशमुख


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे माजी नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे उमेदवार दीपक नाना देशमुख यांनी निवडणूक अधिकाऱ्यांच्या पक्षपाती भूमिकेबाबत गंभीर मुद्दे जनतेसमोर मांडले आहेत. सध्या सुरू असलेल्या येथील नगर परिषद निवडणुकीत अधिकाऱ्यांनी घेतलेली जगजाहीर पक्षपाती भूमिका सर्व राज्य बघत आहे. अर्ज छाननी प्रक्रियेत निवडणूक अधिकारी अरविंद लाटकर, व्यंकटेश मुंडे, त्र्यंबक कांबळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयां विरोधात आमचे सहकारी कोर्टात गेले होते. 


कोर्टाने निवडणूक अधिकाऱ्यांचे पाच पैकी चार निर्णय फेटाळले आणि एक प्रकरण उच्च न्यायालयात सुरू आहे. या सर्व जागांची निवडणूक सध्याच्या निवडणूक कार्यक्रमानुसार २० डिसेंबर रोजी होणार आहे. दिवसाढवळ्या निवडणूक अधिकाऱ्यांचे प्रताप जनता बघत आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. संध्या दीपक नाना देशमुख यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करूनही दोषी अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई झालेली नाही.


त्यामुळे येऊ घातलेल्या पाच जागांच्या निवडणुका आणि मतमोजणीत मोठी हेराफेरी होऊ शकते. लोकशाहीच्या रक्षणासाठी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र सरकारने व जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विवेक जॉन्सन यांनी येथील पक्षपाती निवडणूक अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करून सक्षम व कर्तव्यदक्ष अधिकारी नेमावेत अशी मागणी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दीपक नाना देशमुख यांनी केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या