दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

त्वरित कारवाई करून सक्षम व कर्तव्यदक्ष अधिकारी नेमावेत अशी मागणी

 परळीच्या पक्षपाती निवडणूक अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार : दीपक  देशमुख


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे माजी नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे उमेदवार दीपक नाना देशमुख यांनी निवडणूक अधिकाऱ्यांच्या पक्षपाती भूमिकेबाबत गंभीर मुद्दे जनतेसमोर मांडले आहेत. सध्या सुरू असलेल्या येथील नगर परिषद निवडणुकीत अधिकाऱ्यांनी घेतलेली जगजाहीर पक्षपाती भूमिका सर्व राज्य बघत आहे. अर्ज छाननी प्रक्रियेत निवडणूक अधिकारी अरविंद लाटकर, व्यंकटेश मुंडे, त्र्यंबक कांबळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयां विरोधात आमचे सहकारी कोर्टात गेले होते. 


कोर्टाने निवडणूक अधिकाऱ्यांचे पाच पैकी चार निर्णय फेटाळले आणि एक प्रकरण उच्च न्यायालयात सुरू आहे. या सर्व जागांची निवडणूक सध्याच्या निवडणूक कार्यक्रमानुसार २० डिसेंबर रोजी होणार आहे. दिवसाढवळ्या निवडणूक अधिकाऱ्यांचे प्रताप जनता बघत आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. संध्या दीपक नाना देशमुख यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करूनही दोषी अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई झालेली नाही.


त्यामुळे येऊ घातलेल्या पाच जागांच्या निवडणुका आणि मतमोजणीत मोठी हेराफेरी होऊ शकते. लोकशाहीच्या रक्षणासाठी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र सरकारने व जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विवेक जॉन्सन यांनी येथील पक्षपाती निवडणूक अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करून सक्षम व कर्तव्यदक्ष अधिकारी नेमावेत अशी मागणी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दीपक नाना देशमुख यांनी केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....