इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

बीड-अंबाजोगाई - लातूर रोडवरील जिल्हा सरहद्दीवर भीषण अपघात

 भरधाव वाहनांची समोरासमोर धडक;तीन ठार तर आठ जण गंभीर जखमी


बीड-
अंबाजोगाई - लातूर रोडवरील जिल्हा सरहद्दीवर  भीषण अपघात





अंबाजोगाई, प्रतिनिधी...बीड-अंबाजोगाई - लातूर रोडवरील जिल्हा सरहद्दीवर स्कार्पिओ व हुंडाई एक्सेंट या वाहनांच्या झालेल्या भीषण अपघातात तीन जण ठार तर आठ जण गंभीररित्या जखमी झाल्याची घटना सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. सर्व जखमीवर लातूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बीड - लातूर महामार्गावर लातूर जिल्ह्याच्या सीमेजवळ काल सोमवारी रात्री हा भीषण अपघात झाला आहे. स्कार्पिओ गाडी आणि कारची समोरासमोर धडक झाली आहे. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये स्कॉर्पिओ गाडीच्या समोरील भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला. तर कारचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार झाले आहेत.तर आठ जण गंभीररित्या जखमी झाले आहेत.घटनास्थळी स्थानिकांनी धाव घेऊन कारमधील अडकलेल्या लोकांना बाहेर काढलं. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्कॉर्पिओ आणि अपघातग्रस्त कार महामार्गावरून बाजूला करण्यात आली. अपघातातील जखमींना तातडीने लातूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 15 डिसेंबर सोमवार च्या रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास लातूरहून (अंबाजोगाई) सायगाव च्या दिशेने निघालेली MH12 CY 7022 क्रमांकाची होंडाई एक्सेंट ही कार लातूर- बीड जिल्हा सरहद्दी वरील बर्दापूर नजीक आली असता समोरून अंबाजोगाई होऊन लातूरच्या दिशेने निघालेल्या MH24 V 7771 स्कार्पिओ गाडीची समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात घडला. बर्दापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक कांबळे व त्यांची टीम तात्काळ घटनास्थळी धावली व अपघातातील मयत अमित सुभाष राऊत वय 36 वर्ष रा. सोमवंशी नगर ,आर्वी ता.जि. लातूर, पृथ्वी रमाकांत जाधव वय 20 वर्ष रा. खानापूर ता. रेणापुर जि. लातूर, निजामुद्दीन फसीयुद्दीन शेख व 37 वर्ष रा. सोमवंशीनगर, आर्वी ता.जि. लातूर या तीन जणांचा मृतदेह उपस्थित जनसमुदायाच्या मदतीने बाजूला काढला. उर्वरित अश्विनी गंगासागर स्वामी वय 28 वर्ष, प्राची गंगासागर स्वामी वय 07 वर्ष, वीरभद्र उमाकांत स्वामी वय 40 वर्ष, सरस्वती वीरभद्र स्वामी वय 32 वर्ष, महेश रमाकांत स्वामी वय 31 वर्ष, गणेश रमाकांत स्वामी वय 25 वर्ष सर्व रा. आरजखेडा ता. रेणापूर जि. लातूर, दिशान इस्माईल सय्यद वय 20 वर्ष रा. काळेगल्ली लातूर, अरबाज रहमत शेख वय 21 वर्ष रा. रेणुकानगर लातूर या आठ गंभीर जखमीला सरकारी दवाखाना लातूर येथे उपचारासाठी रवाना केले.सर्व मयतांचे मृतदेह अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात शवविच्छेदना साठी पाठविण्यात आले असल्याची माहिती बर्दापूर येथील पोलीस उपनिरीक्षक कांबळे यांनी दिली आहे.




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या